शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बाह्यवळणाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:38 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शहराच्या बाह्यवळणाबाबत तिढा सुटला असून जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही शेतकºयांच्या सात-बारा अडचणींमुळे नुकसानभरपाई

राजगुरुनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शहराच्या बाह्यवळणाबाबत तिढा सुटला असून जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही शेतकºयांच्या सात-बारा अडचणींमुळे नुकसानभरपाई देण्यात वेळ जात आहे. रस्त्याच्या कामात अडथळा नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १३ धनाजी पाटील यांनी दिली.बाह्यवळणबाधित शेतकºयांची बैठक शनिवारी खेड पंचायत समितीच्या सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिक कदम, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक सागर पाटोळे, लक्ष्मण कोकणे, मच्छिंद्र राक्षे, भास्कर जगदाळे, निवृत्ती होले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजगुरुनगर, चांडोली, होलेवाडी, ढोरे भांबुरवाडी व राक्षेवाडी या गावातील १०१ शेतकºयांचे मिळून २३.३९ हेक्टर क्षेत्र बाह्यवळण कामासाठी संपादित होणार आहे. चांडोली येथे संभाव्य बिनशेती क्षेत्राच्या गुंठ्याला ७ लाख ४७ हजार रुपये व खरेदी-विक्री व्यवहारानुसार ठरलेल्या क्षेत्रातील गुंठ्याला ५ लाख ४६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. राजगुरुनगरला प्रतिगुंठा ४ लाख ५८ हजार रुपये, तर ढोरेभांबुरवाडी, राक्षेवाडी, होलेवाडी या गावांमध्ये प्रतिगुंठा ४ लाख ४३ हजार रुपये नुकसानभरपाई मिळणारआहे. संपादनाची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत १२ टक्के व्याजाने ही रककम शेतकºयांना दिली जाणार आहे.७/१२ तील गुंतागुंती : भरपाई मिळण्यास अडचणी७/१२ तील गुंतागुंत आणि प्रलंबित नोंदी यामुळे नुकसानभरपाई घेण्यात शेतकºयांना अडचणी येत आहेत. काही शेतकºयांना नुकसानभरपाई मिळाली आहे. काही शेतकºयांनी सात-बारा उतारे व त्यामध्ये असणाºया त्रुटींमुळे शेतकºयांना नुकसानीचा मोबदला मिळण्यास अडचणी येत असल्याने भूसंपादन विभागाने ही बैठक बोलावली होती. फाळणी बारा न झाल्याने ७/१२ वर पूर्वीचे खातेदार आहेत. वहिवाट अनेक वर्षांची असली तरी नुकसानभरपाईला त्यामुळे अडचणी येत आहेत. सामाईक क्षेत्राबाबतही शेतकºयांमध्ये वादविवाद होत आहेत.पुणे-नाशिक महामार्ग चौपदरीकरण कामातील राजगुरुनगर बाह्यवळण क्षेत्रात संपादित होणाºया जमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. या वेळी अडचण असलेल्या शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पाटील यांच्याकडून करण्यात आला.तडजोड होऊ न शकणाºया, तसेच वादविवाद असलेल्या अनेक शेतकºयांना पुढील सुनावणीसाठी पुण्यातील कार्यालयात पुराव्यासहउपस्थित राहावे, असे अधिकाºयांनी बाधित शेतकºयांना सांगितले.