शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

बाह्यवळणाचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:38 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शहराच्या बाह्यवळणाबाबत तिढा सुटला असून जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही शेतकºयांच्या सात-बारा अडचणींमुळे नुकसानभरपाई

राजगुरुनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शहराच्या बाह्यवळणाबाबत तिढा सुटला असून जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही शेतकºयांच्या सात-बारा अडचणींमुळे नुकसानभरपाई देण्यात वेळ जात आहे. रस्त्याच्या कामात अडथळा नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १३ धनाजी पाटील यांनी दिली.बाह्यवळणबाधित शेतकºयांची बैठक शनिवारी खेड पंचायत समितीच्या सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिक कदम, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक सागर पाटोळे, लक्ष्मण कोकणे, मच्छिंद्र राक्षे, भास्कर जगदाळे, निवृत्ती होले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजगुरुनगर, चांडोली, होलेवाडी, ढोरे भांबुरवाडी व राक्षेवाडी या गावातील १०१ शेतकºयांचे मिळून २३.३९ हेक्टर क्षेत्र बाह्यवळण कामासाठी संपादित होणार आहे. चांडोली येथे संभाव्य बिनशेती क्षेत्राच्या गुंठ्याला ७ लाख ४७ हजार रुपये व खरेदी-विक्री व्यवहारानुसार ठरलेल्या क्षेत्रातील गुंठ्याला ५ लाख ४६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. राजगुरुनगरला प्रतिगुंठा ४ लाख ५८ हजार रुपये, तर ढोरेभांबुरवाडी, राक्षेवाडी, होलेवाडी या गावांमध्ये प्रतिगुंठा ४ लाख ४३ हजार रुपये नुकसानभरपाई मिळणारआहे. संपादनाची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत १२ टक्के व्याजाने ही रककम शेतकºयांना दिली जाणार आहे.७/१२ तील गुंतागुंती : भरपाई मिळण्यास अडचणी७/१२ तील गुंतागुंत आणि प्रलंबित नोंदी यामुळे नुकसानभरपाई घेण्यात शेतकºयांना अडचणी येत आहेत. काही शेतकºयांना नुकसानभरपाई मिळाली आहे. काही शेतकºयांनी सात-बारा उतारे व त्यामध्ये असणाºया त्रुटींमुळे शेतकºयांना नुकसानीचा मोबदला मिळण्यास अडचणी येत असल्याने भूसंपादन विभागाने ही बैठक बोलावली होती. फाळणी बारा न झाल्याने ७/१२ वर पूर्वीचे खातेदार आहेत. वहिवाट अनेक वर्षांची असली तरी नुकसानभरपाईला त्यामुळे अडचणी येत आहेत. सामाईक क्षेत्राबाबतही शेतकºयांमध्ये वादविवाद होत आहेत.पुणे-नाशिक महामार्ग चौपदरीकरण कामातील राजगुरुनगर बाह्यवळण क्षेत्रात संपादित होणाºया जमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. या वेळी अडचण असलेल्या शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पाटील यांच्याकडून करण्यात आला.तडजोड होऊ न शकणाºया, तसेच वादविवाद असलेल्या अनेक शेतकºयांना पुढील सुनावणीसाठी पुण्यातील कार्यालयात पुराव्यासहउपस्थित राहावे, असे अधिकाºयांनी बाधित शेतकºयांना सांगितले.