शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

५० लाख टन साखर निर्यात करावी : हर्षवर्धन पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 02:21 IST

शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी १८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सकाळी कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते झाला.

बावडा : देशामध्ये गरजेपेक्षा अधिक साखर शिल्लक असल्याने व आगामी काळातही साखरेचे उत्पादन मुबलक प्रमाणावर होणार असल्याने साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी शासनाने ५० लाख मे.टन साखर तातडीने निर्यात करावी, अशी मागणी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी येथे केली.शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी १८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सकाळी कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यानिमित्ताने सत्यनारायणाची महापूजा व होमपूजा कारखान्याचे संचालक प्रताप पाटील व त्यांच्या पत्नी कीर्ती पाटील या उभयताच्या हस्ते करण्यात करण्यात आली. क ार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार हे होते.नीरा-भीमा कारखान्याने मागील गळीत हंगामात गाळपाचे झालेल्या उसाला २४०० रुपयांचा दर जाहीर केलेला आहे. यापैकी २२०० रुपये शेतकऱ्यांना यापूर्वी दिलेले आहेत. बिलाची उर्वरित रक्कम शेतकºयांना लवकरच दिली जाईल. आगामी गळीत हंगामात सुमारे ७ लाख मे.टन ऊस गाळप उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवलेले आहे. तसेच, साखर उताºयाचे १२ टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे पाटील यांनी सांगितले.प्रास्ताविक कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी केले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विलास वाघमोडे, विकास पाटील, मंगेश पाटील, किरण पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, मनोज पाटील, संग्राम पाटील, महादेव घाडगे, तानाजी देवकर, सुरेश मेहेर, श्रीमंत ढोले, दत्तात्रय शिर्के, रणजित रणवरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने