शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रायोगिक एकांकिकांचे प्रमाण कमी : राजेंद्र ठाकूरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:23 IST

ते म्हणाले, ‘पुरुषोत्तम’ ही सलग पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली अशी एक स्पर्धा आहे, ज्यातून अनेक गुणी आणि प्रतिभावंत कलाकारांच्या पिढ्या घडल्या. सृजनशील कलाविष्कार सादर करण्यासाठीची हक्काची जागा म्हणूनही महाविद्यालयीन जीवनात या स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

ते म्हणाले, ‘पुरुषोत्तम’ ही सलग पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली अशी एक स्पर्धा आहे, ज्यातून अनेक गुणी आणि प्रतिभावंत कलाकारांच्या पिढ्या घडल्या. सृजनशील कलाविष्कार सादर करण्यासाठीची हक्काची जागा म्हणूनही महाविद्यालयीन जीवनात या स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक काळ असा होता, की पुरुषोत्तममध्ये नावीन्यपूर्ण प्रयोगशील एकांकिका सादर व्हायच्या. उदा: नगरच्या महाविद्यालयाने सादर केलेली ‘मैत’ किंवा ‘गगनाला पंख नवे’ अशा एकांकिकांचा यासाठी आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘विकणे आहे का’ ही एकांकिका तर संपूर्ण अंधारातच सादर केली गेली. हात आणि चेहरा फ्लोरोसंट रंगात रंगविण्यात आले होते. आज पुरुषोत्तमध्ये अशा प्रयोगशील एकांकिकांचे प्रमाण खूप अत्यल्प आहे. एकांकिकांवर मालिका आणि तंत्रज्ञानाचा खूप मोठा प्रभाव असल्याचे जाणवते. लाईट्स, कॅमेरा या गोष्टींना विद्यार्थी जास्त महत्त्व देताना दिसत नाहीत. यातच काही वर्षांमध्ये विद्यार्थी लेखकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली आहे. परंतु नुसती संख्याच वाढली आहे, गुणवत्तेचे काय? हा प्रश्न काही प्रमाणात अनुत्तरितच आहे. स्पर्धेसाठी एकांकिका लिहायला विद्यार्थी एप्रिलमध्ये जागे होतात. लेखक म्हणून त्यांना नक्की काय मांडायचे आहे याचा विचार होताना दिसत नाही. स्पर्धेत नाटकाचे सादरीकरण करायला एक तासाचा अवधी मिळतो, त्यातील दहा मिनिटे ही नियोजनातच जातात. हातात मिळतात ५० मिनिटे. या पन्नास मिनिटांतच सीन्स बसवून पात्रे विकसित करावी लागतात. तुम्हाला सुचलेली गोष्ट खूप चांगली आहे; पण जे काही मांडायचे आहे, ते कागदावर कशा पद्धतीने उतरवायचे? याबाबत विद्यार्थी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेतात का? हा प्रश्नच आहे. मार्गदर्शन घेण्यात चूक काहीच नाही; पण तितकेसे गांभीर्य विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळत नाही.एकांकिकांमध्ये वापरली जाणारी ‘भाषा’ हा तर एक स्वतंत्रच विषय आहे. स्पर्धेमध्ये मराठी भाषेतच एकांकिका सादर केली पाहिजे, हा नियम आहे. एकांकिकेमधील पात्र परप्रांतीय असेल तर हरकत नाही; पण कारण नसताना इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा भरणा पाहायला मिळतो. वृत्तवाहिन्या आणि रेडिओचा प्रभाव संवादामधून प्रकर्षाने अनुभवायला मिळतो. एकांकिकेचे लेखन करण्यासाठी वाचन वाढवणे आवश्यक आहे. चांगली पुस्तके वाचली तर भाषेचे दालन समृद्ध होते. एखादी जुन्या काळातली कथा घेतली असेल तर तो कालावधी, संदर्भ याचा अचूक अभ्यास करणे गरजेचे आहे. मात्र, त्याचा काही अंशी अभावच जाणवतो. बहुतांश एकांकिका या मालिकेची कथा, सीन्स यांना डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिल्या जातात. मात्र, परीक्षकांवर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. एकांकिका लेखनाकडे फारसे कुणीच गांभीर्याने पाहत नाही. महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यामधला एखाद-दुसरा अपवाद सोडला तर एकही विद्यार्थी नाट्यलेखनाकडे वळलेला दिसत नाही, याचे वाईट वाटते. पुरुषोत्तमच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत सादर झालेल्या एकांकिकांच्या संहिता आम्ही जतन करून ठेवल्या आहेत. पुरुषोत्तमच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील संहिता आम्ही दोन खंड रूपात प्रसिद्ध केल्या, आजही करीत आहोत. पण या संहिता ठेवायच्या कुठे? असा आमच्यापुढचा प्रश्न आहे. या संहितांचे रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी घेण्यास कुणी पुढाकार घेत असेल तर त्या व्यक्तीला आम्ही डिजिटल स्वरूपात संहिता देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषोत्तममधील एकांकिकांच्या सादरीकरणाचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. स्पर्धेमध्ये नक्की काय अपेक्षित आहे, हेच विद्यार्थ्यांना नीटसे उमगलेले नाही. स्पर्धेत दिग्दर्शन, अभिनय आणि लेखन या तीनच गोष्टींना पारितोषिके दिली जातात. तरीही या गोष्टींपेक्षा तंत्रज्ञानावर विद्यार्थी भर देताना दिसत आहेत. यातच ही स्पर्धा म्हणजे प्रायोगिक एकांकिकेसाठीचे खुले व्यासपीठ मानले जाते. मात्र, विद्यार्थ्यांकडून प्रयोगशील एकांकिका सादर करण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याची खंत महाराष्ट्र कलोपासक संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.