शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सत्ता, संपत्तीपेक्षा जगण्यातील समृद्धता अनुभवा - सलील कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 02:44 IST

सत्ता, संपत्ती हे सगळं उथळ असून माझं माझं न करता आवडीच्या क्षेत्रात आनंदाने काम करताना प्रत्येकाने समृद्ध आयुष्य जगण्य्याचा प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, लेखक डॉ सलील कुलकर्णी यांनी केले.

राजगुरुनगर : सत्ता, संपत्ती हे सगळं उथळ असून माझं माझं न करता आवडीच्या क्षेत्रात आनंदाने काम करताना प्रत्येकाने समृद्ध आयुष्य जगण्य्याचा प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, लेखक डॉ सलील कुलकर्णी यांनी केले.हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत कवितेचं गाणं होतांना या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, संचालक शांताराम घुमटकर,अ‍ॅड.माणिक पाटोळे, उमेश आगरकर, अंकुश कोळेकर, माजी जि. प. सदस्य अनिल राक्षे, अ‍ॅड. राजमाला बुट्टेपाटील, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रा. ए.जी. कुलकर्णी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.डॉ सलील कुलकर्णी म्हणाले, आजकाल कोणीही पैशाची, कलेची किंव्हा राजकारणातील ताकदीची टिमकी वाजवीत असून समाजात बेडरपणा, निर्लज्जपणा अथवा पैशाची धुंदी वाढत चालली आहे. मात्र माणसाच्या मेंदूमधील एक छोटीशी रक्तवाहिनी तुमचं बोलणं चालू ठेवायचे की बंद करायचे हे ठरवू शकते. या पार्श्वभूमीवर माणसाने माणुसकी धर्म पाळला नाही तर माणसाची माय असलेली माती जेंव्हा हिशोबाला बसते तेंव्हा कोणालाच सोडत नाही अशी भावना मांडली. कुसुमाग्रजांच्या मातीची दर्पोक्ती या कवितेचे उदाहरण देताना ह्यअभिमानी मानव आम्हाला अवमानी, बेहोष पाऊले पडती आमच्यावरुनी, त्या मत्त पदांना नच जाणीव अजुनी, की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती, मातीवर चढणे एक नवा थर अंतीह्ण या ओळी सादर केल्या. पुन्हा एकदा पहिल्यापासून जगण्यासाठी ह्यलपवलेल्या कचरा या पुस्तकातील एका लेखाचे अभिवाचन केले.या कार्यक्रमात त्यांनी उच्चरणातील आनंद, मनाला उल्हास व प्रसन्नतेचा भाव देणारी ह्यअग्गबाई डग्गुबाईह्ण या अल्बममधील बालगीते तसेच हे गजवदन, येई गा विठ्ठला, क्षण अमृताचे, आयुष्यावर बोलू काही या अल्बममधील गीते सादर केली. गीतकार सुधीर मोघे, कवयित्री शांताबाई शेळके, कवी विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, ग्रेस या कवींच्या कवितांचे वेगवेगळे पदर, त्यातील सौदर्यस्थळ उलगडून दाखविली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांना कविता चांगली समजते असे सांगून त्यांच्याबरोबरब केलेला मैत्र जीवांचे या कार्यक्रमाच्या आठवणी सांगितल्या व त्यांची लोकप्रिय गीतेही सादर केली. भावसंगीतातील परमेश्वर असे लतादीदींचे वर्णन करून अजूनही त्या संगीतकाराच्या सूचनांनुसार गीत गातात. त्यांची शिकण्याची भूक कमी झाली नाही असे ते म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणे