शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

केवळ भूसंपादनासाठी ७१० कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:04 IST

गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेला कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या केवळ भूसंपादनासाठी तब्बल ७१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेला कात्रज-कोंढवा रस्त्यांच्या केवळ भूसंपादनासाठी तब्बल ७१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात पहिल्या टप्प्यात कोंढवा बु्रदु्रक येथील सर्व्हे क्रमांक ५४, ५५ आणि ५६ मधील जागा संपादित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी प्रस्ताव पाठविला होता. जिल्हाधिकाºयांनी या प्रस्तावाला मंजुरी देत मिळकतीची नुकसान भरपाईच्या ३० टक्के रक्कम म्हणजे तब्बल ७१ कोटी रुपये महापालिकेला जमा करण्यास सांगितले. परंतु निधीअभावी आतापर्यंत महापालिकेकडून हा निधी जमा करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. असे असताना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी निविदा प्रक्रियेला मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.कात्रज चौकातील राजस सोसायटी ते कोंढवा खडी मशीन चौकापर्यंतच्या सुमारे साडेतीन किमी लांब आणि ८४ मी. रुंद रस्त्याच्या १७८ कोटी रुपयांच्या निविदेला महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रशासकीय मान्यता दिली. विशेष असे की, मागील सहा वर्षांपासून केवळ एका ठेकेदाराला हे काम देण्यासाठी कोट्यवधींचे नुकसान केले जात असल्याचा आरोप होत असतानाही कुणाल कुमार यांनी आयुक्तपदाचा पदभार सोडताना या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याने संशयाचे ढग अधिकच गडद झाले आहेत. या रस्त्याच्या कामासाठी २१५ कोटी रुपयांचे पूर्वगणनपत्र तयार केले असून, चार कंपन्यांनी या कामाची निविदा भरली आहे. काम सुरू करण्यासाठी किमान ७० टक्के भूसंपादन होणे आवश्यक आहे. परंतु भूसंपादन झाले नसताना आयुक्तांनी दिलेली मंजुरी वादाच्या भोवºयात सापडली आहे. यामुळे राष्ट्रवादी, काँगे्रससह मनसे या सर्वंच पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे.>निविदेमागे सत्ताधाºयांचा छुपा अजेंडाकात्रज-कोंढवा रस्ता होणे गरजेचे आहे. परंतु, केवळ कोणातरी ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून महापालिकेचे नुकसान करण्याचे काम सत्ताधाºयांच्या दबावाखाली सुरू आहे. या रस्त्यासाठी कायद्यानुसार ७० टक्के भूसंपादन झालेले नसतानाच रस्त्याच्या कामाची निविदा मंजुरीचा घाट घातला जात आहे.चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी स्वतंत्र सेल स्थापन करून भूसंपादनासाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या पुलाचे काम केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केले जाणार असून, त्यांनीही भूसंपादन होणे बाकी असल्याने अद्याप निविदा काढलेली नाही. परंतु, महापालिका आयुक्तांनी केवळ सत्ताधाºयांच्या दबावाखाली निविदेला प्रशासकीय मान्यता दिल्याने या रस्त्याचे काम येथील जनतेऐवजी ठेकेदाराच्या हितासाठीच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन करण्याकरिता स्वतंत्र सेल स्थापन करून सत्ताधाºयांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, नंतरच निविदा मान्यतेसाठी ठेवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली आहे.