शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

दक्षिणेतून वेळेआधी परतलेल्या मान्सूनची देशभरातून एक्झीट; अहमदनगर गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 19:12 IST

नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी परतल्याचे बुधवारी हवामान विभागाने जाहीर केले़. पश्चिम बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, तसेच द्वीपमहासागरातून मॉन्सूनने आज माघार घेतली़ 

ठळक मुद्देसाधारणपणे १५ डिसेंबरला संपूर्ण भारत आणि द्वीपसमुहातून माघारी परततो़.मॉन्सूनने एक्झीट घेतल्यानंतर उत्तर भारतातील वार्‍यांचा जोर वाढला आहे़.

पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरातून माघारी परतल्याचे बुधवारी हवामान विभागाने जाहीर केले़ गोवा, महाराष्ट्रासह कर्नाटकातील काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने काल जाहीर केले होते़ पश्चिम बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, तसेच द्वीपमहासागरातून मॉन्सूनने आज माघार घेतली़ राजस्थानमधून मॉन्सूनच्या परतीला उशिरा सुरुवात झाली असली तरी तो वेगाने परतला आहे़ महाराष्ट्र, कर्नाटकातून तो १५ आॅक्टोबरपर्यंत माघारी जात असतो़ मात्र, आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दक्षिणेतील राज्यांमध्ये तो सक्रीय असतो़ या तीन महिन्यात दक्षिणेतील राज्यांमध्ये एकूण पावसापैकी ३० टक्के पाऊस पडतो़ त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाने दक्षिणेतील राज्यांसाठी या तीन महिन्यांतील पावसाचा स्वतंत्रपणे अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे़ हवामान विभागाच्या आजवरच्या आकडेवारीनुसार साधारणपणे १५ डिसेंबरला संपूर्ण भारत आणि द्वीपसमुहातून माघारी परततो़ श्रीलंकेत तो १ जानेवारीपर्यंत सक्रीय असतो़ पण, यंदा त्याने दक्षिणेतून वेळेआधी एक्झीट घेतली आहे़ त्यामुळे आता उत्तर भारताप्रमाणे दक्षिणेतही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे़ मॉन्सूनने एक्झीट घेतल्यानंतर उत्तर भारतातील वार्‍यांचा जोर वाढला असून त्यामुळे महाराष्ट्रातील काही ठिकाणच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे़ अहमदनगर येथे सर्वात कमी किमान तापमान १२़३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ ते सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने कमी आहे़ अकोला १६़५, नाशिक १३़८, उस्मानाबाद १४़९, पुणे १५़१, महाबळेश्वर १६़२, वर्धा १५़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून तेथील तापमानात सरासरीपेक्षा घट झाली आहे़

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र