शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ; येरवडा कारागृहाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 19:09 IST

येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन येरवडा कारागृहाच्या शाेरुममध्ये भरविण्यात आले आहे.

पुणे : शिक्षा भाेगत असलेल्या कैद्यांचे पुनर्वसन व्हावे, शिक्षा भाेगून बाहेर पडल्यानंतर त्यांना समाजात मानाने जगता यावे तसेच त्यांच्या उपजिवीकेसाठी त्यांना एखादा व्यवसाय सुरु करता यावा यासाठी कारागृहाकडून कैद्यांना विविध प्रशिक्षण देण्यात येते. कारागृहातील कैद्यांकडून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे प्रदर्शन कारागृहाच्या शाेरुममध्ये भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते सुबाेध भावे यांच्या हस्ते झाले. यावेळी कारागृहाचे अपर पाेलीस महासंचालक व महानिरीक्षक सुनिल रामानंद, कारागृह पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे, तसेच येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार आदी उपस्थित हाेते. 

येरवडा कारागृह हे आशिया खंडातील सर्वात माेठे कारागृह आहे. या कारागृहात सद्यस्थितीला पाच हजाराहून अधिक कैदी शिक्षा भाेगत आहेत. शिक्षा भाेगत असलेल्या कैद्यांच्या हाताला काहीतरी काम मिळावे, त्यांचे मन इतर कार्यात वळावे या हेतून कारागृहात विविध उपक्रम राबविले जातात. कारागृहात अनेक कारखाने असून त्यात विविध वस्तू कैद्यांमार्फत तयार केल्या जातात. यात राख्यांपासून ते साेफासेटपर्यंत सर्व घरउपयाेगी वस्तू तयार केल्या जातात. कैद्यांना देण्यात आलेल्या कामाचा माेबादला देखील त्यांना दिला जाताे. जेव्हा कैदी शिक्षा भाेगून बाहेर पडताे तेव्हा त्याला येथे देण्यात आलेल्या विविध वस्तू तयार करण्याच्या प्रशिक्षणाचा उपयाेग हाेताे. राखी पाैर्णिमेनिमित्त खास राख्या देखील कैद्यांकडून तयार करण्यात आल्या आहेत. 

या प्रदर्शनाबाबत बाेलताना सुबाेध भावे म्हणाले, या उपक्रमाबाबत मी ऐकून हाेताे. कैद्यांनी तयार केलेली चादर माझ्या घरी आहे. आज या सर्व गाेष्टी जवळून पाहता आल्या. रंगमंचावर काम करताना कलाकार जेव्हा पहिलं वाक्य उच्चारताे तेव्हा त्याचा सूर नीट लागला आहे की नाही हे त्या कलाकाराला ही कळत असतं आणि प्रेक्षकांनाही. इथे असलेल्या कैद्यांचा एखादा सूर बेसूर लागला असेल, परंतु त्यांचा सूर सूरात लावण्याचे काम कारागृह प्रशासन करत आहे. इथल्या कैद्यांना ते उर्जा देण्याचं काम करतात. मी कैद्यांना एवढंच सांगिन तुम्ही शिक्षा भाेगली म्हणजे आयुष्य संपलं नाही. या येरवडा कारागहामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक राजकीय कैदी हाेते. त्यांची नावं पाहिलं तर लक्षात येईल की शिक्षा भाेगून त्यांचे काम संपले नाही तर खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. तुम्ही शिक्षा भाेगली म्हणजे तुमचं आयुष्य संपलं असं नाही तर तुम्हाला आयुष्यात खूप काही करायचंय. त्याची दिशा देण्याचं काम कारागृह प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :yerwada jailयेरवडा जेलRaksha Bandhanरक्षाबंधनSubodh Bhaveसुबोध भावे