शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजनेतून सोयाबीनला वगळले; शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:31 IST

नाचणी पिकालाही मिळणार नाही नुकसानभरपाई

गहुंजे : पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार खरीप हंगाम २०१८ साठी मावळ तालुक्यात या वर्षी फक्त भात व भुईमूग या दोनच पिकांचा समावेश करण्यात आल्याने या दोनच पिकांना विमा संरक्षण उपलब्ध होणार असून, संबंधित पिकांचा विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०१८ देण्यात आली आहे. मात्र, मावळ तालुक्यातील नाचणी व सोयाबीन या पिकांचा विमा योजनेत समावेश करण्यात आलेला नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.या योजनेंतर्गत पीक विमा उतरविण्यासाठी शेतकºयांनी दोन टक्के विमा हप्ता रक्कम भरल्यास उरलेली ९८ टक्के रक्कम शासन भरणार आहे. शेतकºयांना ३१ जुलैपर्यंत नजीकच्या बँक शाखेत व आपले सरकार सेवा केंद्रात विमा हप्ता आॅनलाइन भरणा करता येणार आहे. विमा हप्ता भरताना अर्जासोबत शेतकºयांना सात-बारा (7/12), 8 अ, बँक खात्याच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करावी लागणार आहे. जिल्हा सहकारी बँक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, सोसायटी सचिव यांच्याशी पीक विमा योजनेत सहभागासाठी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.काळे कॉलनी येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत या विमा योजनेची शिवली, कोथुर्णे, मोरवे, शिलिंब, जवन, ठाकुरसाई, करुंज, कढधे, तुंग, महागाव, धनगव्हाण, काले आदी गावांमध्ये प्रचार-प्रसिद्धीचे काम सुरू असून, परिसरातील शेतकºयांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक नंदकुमार साबळे यांनी केले आहे.भात व भुईमूग पिकांसाठी विमा हप्ता दोन टक्के दराने आकारण्यात येणार आहे. भात पिकासाठी प्रति हेक्टरी 842 रुपये विमा हप्ता आकारण्यात येणार असून 42 हजार 100 रुपये संरक्षित रक्कम असणार आहे. भुईमूग पिकासाठी प्रति हेक्टरी 630 रुपये विमा हप्ता आकारण्यात येणार असून, 31500 प्रति हेक्टरी रुपये संरक्षित रक्कम राहणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार भात व भुईमुग पिकांचे नुकसान व स्थानिक नैसर्गिक नुकसानीच्या बाबी विमा संरक्षणात समाविष्ट असल्याचे कृषी सहायक अधिकारी विकास गोसावी,दत्तात्रय गावडे, ज्ञानेश्वर बुचडे, शीतल गिरी यांनी सांगितले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीfarmer suicideशेतकरी आत्महत्या