शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

परीक्षा स्वयंअध्ययनाची - आत्मविश्वासाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

सुयोग्य नियोजन : आपण आजपर्यंत काय केले याचा आता विचार करू नका, राहिलेल्या दिवसांचे, दैनिक, साप्ताहिक, मासिक, विषयनिहाय नियोजन ...

सुयोग्य नियोजन : आपण आजपर्यंत काय केले याचा आता विचार करू नका, राहिलेल्या दिवसांचे, दैनिक, साप्ताहिक, मासिक, विषयनिहाय नियोजन करा. यशासाठी सुयोग्य नियोजन व तंतोतंत पालन करा.

स्वंयअध्ययन : मुलांनो, तुम्ही खूप हुशार आहात, मला येत नाही, जमत नाही, समजत नाही, असे विचार काढून टाका. स्वत:ला ओळखा, लिहिता येते, वाचता येते, मूलभूत संकल्पना स्पष्ट आहेत, त्या करुन घ्या, ज्ञानाचे उपयोजन करा, समजून घेण्यासाठी, पालक, शिक्षक, ताई-दादा, आजी-आजोबा व तंत्रज्ञान यांची मदत घेवून अभ्यासातील/विषयांतील शंकाचे निरसन करुन घ्या.

गणित, इंग्रजी, अकांऊटस्, भौतिक, रसायन यांसारखे विषय सोडले तर, इतर विषयांचा अभ्यास तुम्ही स्वत: करु शकता, समजून, आकलन करु शकता, यावर विश्वास ठेवा. ज्या विषयांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, त्यासाठी वेबसाईट्स, तंत्रज्ञान यांची मदत घेते. सर्व पाठ्यपुस्तके उत्कृष्ट आहेत. त्यातील स्वाध्याय सोडवा.

कोरोनाच्या काळात -

शाळा, कॉलेज यांनी ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण दिले आहे. याचा व पाठ्यपुस्तकांसह, इतर तंत्रज्ञानावरील साहित्याचा पूरक वापर अभ्यासासाठी व परीक्षेच्या माहितीसाठी उपयोग करुन घ्या. शालेय शिक्षण विभाग, यांचे विविध उपक्रम, दूरदर्शनवरील वर्ग, ऑनलाईन व्याख्याने, टिलीमिलीमधील कार्यक्रम यांचा उपयोग करुन स्वत:च्या संकल्पना स्पष्ट करुन अभ्यास करा. दररोजचे नियोजन, पुरेशी झोप, घरातला व्यायाम, प्राणायाम यासाठी वेळ द्या, सकारात्मक बातम्या, मनोरंजन, अवांतर वाचन यासाठी थोडा वेळ काढा. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळा. अभ्यासात मन लागत नसेल तर चिंतन, ममन करा. एकाग्रतेसाठी हातात पेन, कोरे कागद घेऊन लिहून अभ्यास करा. नोट्स तयार होतील व यातूनच उजळणी होईल.

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा :

शालेय जीवनाचा पहिला व दुसरा टप्पा, शाखा निवड, करिअरचा टर्निंग पॉईंट, म्हणजे या दोन परीक्षा आहेत. याचा ताण घेऊ नका. आता कसे होणार, किती टक्के मिळतील, याचा विचार करु नका. यश नक्की मिळेल. गरज आहे- योग्य नियोजन, मार्गदर्शन व स्वयंअध्ययन या त्रिसूत्रींची.

मुलांनो, कोरोनाच्या संसर्गजन्य रोगामुळे आलेल्या व्यत्ययावर तुम्ही मात करु शकता. त्याकरिता आत्मबळ, इच्छाशक्ती आणि स्वयंअध्ययन करुन एकलव्य व्हा. यश संपादन करणे सहजशक्य आहे. मित्रांनो ताण घेऊ नका, गरज भासल्यास, शाळा, मंडळ, शिक्षक, पालक, समुपदेशक यांचेशी संवाद साधा. तुम्ही निश्चित रहा, सर्व तुमच्या सोबतच आहोत.

- अनिल गुंजाळ, शैक्षणिक समुपदेशक