शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

प्रत्येक वारकऱ्याची आहे एक कथा...

By admin | Updated: June 20, 2017 06:55 IST

वारीत सहभागी होणे जसं पूर्वजन्माची पुण्याई, असे वारकरी परंपरेत मानले जाते; पण या पुण्याईला कधी कधी अवचित प्रसंगाचा या जन्माचा गंध लाभतो.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : वारीत सहभागी होणे जसं पूर्वजन्माची पुण्याई, असे वारकरी परंपरेत मानले जाते; पण या पुण्याईला कधी कधी अवचित प्रसंगाचा या जन्माचा गंध लाभतो. हा गंध एक एक हरिभक्तीच्या कृपादृष्टीच्या सुंदर कथांचा मिलाफ असतो. मग, या वारीचं आपल्या आयुष्याशी नातं जमलं की माघार घेण्याची इच्छा दैवाला ही सहज शक्य होत नाही. या वारीशी नाळ जोडून सलग तीस, चाळीस, पन्नास वर्षे प्रामाणिकपणे त्या द्वारकेच्या राणाच्या दर्शनाची ओढ पूर्ण केलेली उदाहरणे या वारीत भेटतात. तेव्हा मन आश्चर्याने थबकून जाते. कारण, वारीच्या या अतूट साधनेतले हरएक अडथळे ते विठूरायावर सोडतात अन् तोही या भक्तांंच्या या विश्वासाला पात्र ठरत त्यांची वारी सुरू ठेवतो. या नात्यांच्या साक्षीदार अशा काही व्यक्तींची अनोखी भेट पालखी सोहळ््यानिमित्त घडली आणि उलगडला एक भक्तिरसाचा नवा अध्याय. त्या व्यक्तींच्या या रंगतदार कथा.बीड जिल्ह्यातील पाटसरा गावचे मच्छिंद्र साबळे यांनी सांगितले की, भावाच्या वेडेपणाच्या उपचारासाठी पुण्यात ससून रुग्णालयात आलो होतो. त्या वेळी नेमकी पालखीच्या आगमनाची चर्चा कानावर पडली. घरातल्या रुग्णाला अंथरुणावर कसे सोडून जाता येईल. मनात विचार आला सगळे ठिक असते तर नक्की या पालखीत गेलो असतो. काही क्षणात डॉक्टरांनी भावाच्या वेडेपणाचे निदान झाले आहे, त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. त्याला घरी घेऊन जाण्यास हरकत नाही. तिथून मी कुटुंबासह पंढरपूरला गेलो आणि पुढच्या वर्षी गंध-टिळा लावण्याचे काम हाती घेत वारी केली. पुन्हा मनात आले, या वारीत आपण जास्तीचे काय करू शकतो, तसे लक्षात आले की श्रावणबाळाने जशी कावड घेऊन आपल्या आईवडिलांना काशीयात्रा घडविली, तशीच सेवा तुकाराममहाराज व ज्ञानेश्वरमहाराज यांना आपण कावडीने पंढरपूरची यात्रा घडवावी. त्यावर्षीपासून कावड नेण्याची परंपरा सुरु केली जवळपास लाख दीड लाख भाविक या कावडीचे दर्शन घेतात. यापेक्षा अजून दुसरी आयुष्याची अन् वारीची सार्थकता काय असावी. - मच्ंिछद्र साबळे, पाटसरा, बीडअकलूजचा गणेश धुमाळ म्हणाला, चांगले शिक्षण पूर्ण झाले होते. पण कुठेच नोकरी मिळत नव्हती. सर्व ठिकाणी मला अपयशच येत होते. काही केल्या मार्ग सापडत नव्हतो. असेच मित्रांसोबत देहूला गेलो होतो. तिथे मंदिरात दर्शनाला उभे राहिल्यावर सहज प्रार्थना केली फक्त देवा जे मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे, त्याला प्रतिसाद दे. पुढे दोनतीन वर्षाने राज्य परिवहन मंडळाकडून इंदापूर बस डेपोत मॅकेनिक म्हणून निवड झाल्याचा फोन आला. कुठेही देवावर विश्वास न ठेवणारा मी नकळत तुकाराम महाराजांच्या वारीत ओढलो गेलो. आज वारीचं हे नोकरी लागल्यावरचं पाचवं वर्ष आहे. खूप आनंद मिळतो. वारीचे काही महिन्यांआधीपासूनच वेध लागतात. या वारीत मी नुसता येत नाही तर लोकांना विनामूल्य गंध लावण्याचे काम करतो. ही एक विलक्षण समाधान देणारी गोष्ट आहे.- गणेश धुमाळ, अकलूज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावचे गोरखनाथ म्हणाले, मला अपंगत्व येण्याआधीपासून ही पंढरीची वारी सुरु आहे. पण दोन्ही पायांचे आॅपरेशन झाल्यावर चालता येणं शक्य नव्हतं, यामुळे वारी बंद होेणार या अस्वस्थतेने मला खूप वाईट तसेच भीती वाटली. त्याकाळी व्हीलचेअर मिळत नव्हती. पांडुरंगाला हात जोडले आणि विनवणी केली की, भगवंता तुझ्या इच्छपुढे कुणाचे काय चालले आहे. बघ तुला जसे हवे आहे तसे ते घडेल. मला मनापासून तुझ्या दर्शनाची ओढ कायम असणार आहे. काही दिवसांनी नंतर एका दात्याने माझी तळमळ बघितल्यावर गुजरातहून व्हीलचेअर मागवली. आणि तेव्हा सुरु झालेली ही वारी आज चाळिसाव्या वर्षीही करीत आहे.- गोरखनाथ म्हस्के, शेवगाव