शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दररोज एकाचा रेल्वेखाली होतो मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:08 IST

रेल्वेच्या वतीने संवेदनशील ठिकाणी सीमाभिंत, जाळीचे अथवा अन्य प्रकारचे अडथळे उभे केले आहेत. मात्र, तरीही नागरीक अन्य मार्गाचा वापर करुन धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडताना दिसतात.

ठळक मुद्देअनेकदा कानात हेडफोन घालून रेल्वेमार्ग ओलांडला जातो. गेल्या वर्षात ५४० नागरिक रेल्वेखाली चिरडले गेले असून १४५ जण जखमी धोकादायक पद्धतीने मार्ग ओलांडणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई

पुणे : गेल्या वर्षभरात शहर आणि परिसरात दररोज एकाहून अधिक व्यक्तींनी रेल्वेखाली आपले प्राण गमावले आहेत. गेल्या वर्षात ५४० नागरिक रेल्वेखाली चिरडले गेले असून, १४५ जण जखमी झाले आहेत. पुणे-लोणावळा मार्गावरील पिंपरी, कासारवाडी, चिंचवड, दापोडी, खडकी आणि आकुर्डी स्टेशन अपघातांच्या दृष्टीने संवेदनशील मानली जातात. रेल्वेच्या वतीने अशा संवेदनशील ठिकाणी सीमाभिंत, जाळीचे अथवा अन्य प्रकारचे अडथळे उभे केले आहेत. मात्र, तरीही नागरीक अन्य मार्गाचा वापर करुन धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडताना दिसतात. अशा पद्धतीने मार्ग ओलांडणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनातर्फे कारवाई केली जाते. गेल्या आर्थिक वर्षांत ६ हजार ९९१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ७ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वेचे पुणे मंडल प्रबंधक मिलिंद देऊस्कर यांनी दिली. रेल्वे मार्ग ओलांडण्यातील धोके दाखविण्यासाठी रेल्वेच्या वतीने पथनाट्य सादर केली जातात. या शिवाय बॅनर, पोस्टर आणि फलकद्वारे देखील प्रवाशांचे लक्ष वेधले जाते. मात्र, त्यानंतरही थोडासा वेळ वाचविण्यासाठी जीवाचा धोका पत्करण्यात येतो. अनेकदा कानात हेडफोन घालून रेल्वेमार्ग ओलांडला जातो. त्यामुळे जोखीम आणखी वाढते. एखादा अपघात झाल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ जातो. त्यामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडते, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.   

टॅग्स :PuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासीDeathमृत्यू