शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

मी माजी मुख्यमंत्री असलो, तरी नाकारला गेलेला नाही- शिवराजसिंह चाैहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 12:37 IST

मी पद साेडलं म्हणजे राजकारण करणार नाही असे नाही, तर पुढेही राजकारण करत राहणार, असा निर्धार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. अजून बरीच कामे बाकी असून ती पूर्ण करायचे आहेत, असेही ते म्हणाले...

पुणे : राजकारण केवळ पदांसाठी नाही तर माेठ्या ध्येयासाठी केले जाते. युवा वर्गाने राजकारणात यावे. मी माजी मुख्यमंत्री असलो, तरी नाकारला गेलेला नाही. जनतेने नाकारले तर लाेक राजकारण साेडतात. मात्र, आजही मी जेथे जाताे तेथे लाेक मला मामा म्हणून प्रेम करतात. जनतेचे प्रेम हीच खरी संपत्ती आहे. मी पद साेडलं म्हणजे राजकारण करणार नाही असे नाही, तर पुढेही राजकारण करत राहणार, असा निर्धार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. अजून बरीच कामे बाकी असून ती पूर्ण करायचे आहेत, असेही ते म्हणाले.

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या वेळी डॉ. ज्ञानवत्सल स्वामी, लोकसत्ता चळवळीचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश नारायण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस उपस्थित होते.

चाैहान म्हणाले की, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी हाेणार नाही असे विश्लेषक सांगायचे. तेव्हा माझ्या पक्षाचे नेतेही जिंकणे अवघड आहे, असे बाेलत. मी मात्र याने खचलाे नाही. पक्षाला विजयी करणारच, असा निश्चय करून अहाेरात्र काम केले. निकाल आला तेव्हा भाजपने आतापर्यंतचे सर्वात जास्त मते घेतली आणि जागाही जिंकल्या. प्रामाणिकपणे काम केल्यास जनता साथ देते. मी महिला सशक्तीकरण, स्त्री-पुरुष समानता या ध्येयासाठी काम करणार आहे. पर्यावरणाला केंद्रभागी ठेवून राजकारण केले पाहिजे. येत्या २२ जानेवारीला श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. शेकडाे वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्ला येणार आहेत आणि रामराज्यही येणार आहे, असेही चौहान यांनी सांगितले.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, भारतच विश्वशांती आणि सुसंवाद घडवून आणू शकतो. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञान हेच अंतिम सत्य आहे. आता ही मूल्ये विश्वाला सांगण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी देण्यामागचा आनंद शिकला पाहिजे आणि आपल्या आचरणाने आदर्श निर्माण केले पाहिजेत.

राजकारणात येण्यासाठी घाबरू नका :

राजकीय क्षेत्रात येण्यासाठी घाबरू नका. चाेरी करणाऱ्यांच्या हातात राजकारण साेडणार का? राजकारणातील पैशांचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही काम करणार नाहीत का? असा सवाल उपस्थित करीत तुम्ही स्वत:तील शक्ती ओळखून नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

भविष्यातील लोकनेते घडवण्यासाठी आणि युवा नेतृत्वाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आपल्या लोकशाहीने परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करायला हवी. चारित्र्यसंपन्न आणि उच्चशिक्षित नेतृत्व घडवण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतीय छात्र संसदेच्या निमित्ताने आम्ही एक पाऊल उचलले आहे.

- राहुल कराड, कार्याध्यक्ष, एमआयटी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान