शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मीरमध्ये सर्व आलबेल नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 16:00 IST

केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर मुलांच्या भविष्याचे काय, शेती, रोजगार, पर्यटन याविषयीचे धोरण कुठले ? असा सवाल लडाख ऑटोनॉमस हील डेव्हलमेंट कौन्सिलचे सदस्य सय्यद अब्बास रिझवी यांनी उपस्थित केला.

पुणे : जम्मु काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतरही त्याठिकाणी सर्व आलबेल आहे असे समजणे चुकीचे आहे. अद्याप तेथील सामाजिक वास्तवाची कल्पना इतर राज्यांतील सर्वसामान्य नागरिकांना माहिती नाही. विकासाच्या नावाखाली करण्यात आलेले बदल नेमक्या कुणाचे फायद्याचे ठरणार याबाबत साशंकता आहे. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर मुलांच्या भविष्याचे काय, शेती, रोजगार, पर्यटन याविषयीचे धोरण कुठले ? असा सवाल लडाख ऑटोनॉमस हील डेव्हलमेंट कौन्सिलचे सदस्य सय्यद अब्बास रिझवी यांनी उपस्थित केला.

           पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या  ‘कलम ३७० आणि लडाख'  या विषयावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रिझवी म्हणाले, कारगील आणि लडाख मधील खरी परिस्थिती वेगळी आहे. पर्यटनाशिवाय त्याठिकाणी दुसरा रोजगार नाही. अशावेळी इतर उद्योगांना चालना मिळावी यासाठी केंद्राकडून तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. काश्मिरमध्ये कलम 370 लागु केल्यानंतर सर्व परिस्थितीत फरक पडला असे नाही. सध्या कारगील, लडाख येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. नवीन शासननियमानुसार तेथील बोर्ड रद्द झाले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी कुठल्या बोर्डव्दारे प्रवेश घ्यावा असे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता जम्मु काश्मिरमध्ये जावे लागते. मात्र पुढील शिक्षणाचे काय? याविषयी कुणी बोलण्यास  तयार नाही. सगळीकडे गोंधळाची परिस्थिती आहे. इंटरनेट बंद आहेत. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे.           तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेती, व्यापार, यांच्याविषयी अद्याप कुठलेही धोरण केंद्र सरकारकडून तयार करण्यात आले नाही. म्हणून तर लेह, लडाख मधील नागरिकांना आपल्या जमिनींचा व्यवहार करताना बारकाईने विचार करावा लागणार आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय व्यवस्थापनाचा ढिसाळपणा लडाख आणि कारगीलमधील नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. पोलिसांमध्ये सातत्याने हददीचा वाद होत आहे. अशी परिस्थिती असताना देखील येणारा भविष्यकाळ आमच्याकरिता आनंदाचा असेल. मात्र त्याकरिता लढण्याची क्षमता शेवटपर्यंत टिकवून ठेवता यायला हवी. असेही रिझवी म्हणाले.  

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर