शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही महाराष्ट्रातील गडकिल्ले दुर्लक्षित; छत्रपती संभाजीराजेंची खंत

By नितीश गोवंडे | Updated: April 16, 2023 16:05 IST

सरकारकडे २५ किल्ल्यांची मागणी करत असून शिवभक्तांच्या माध्यमातून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ

पुणे : सरकार कोणाचेही असो आणि सरकार कुठलेही असो महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी काय केले, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. किती नेते गड-किल्ल्यांविषयी आस्था बाळगून आहेत आणि त्यातील किती जणांनी गड-किल्ल्यांवरून पदभ्रमण केले आहे, हा संशोधनाचा विषय आहे. केवळ शिवाजी महाराजांसारखे महापुरूष आणि गडकिल्ल्यांची नावे घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हेच सुरू असल्याची खंत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

गडकिल्ल्यांबद्दल असणारे प्रेम, त्यातून प्रत्यक्ष अनुभवलेला इतिहास, थक्क करणारी अभ्यासपूर्ण मांडणी, प्रत्यक्षपणे किल्ल्यांची अनुभूती देणारे नकाशे व चित्रे यांच्या आगळ्या-वेगळ्या मांडणीतून एसीपी सुरज गुरव यांनी लिहिलेल्या ‘माझं गडप्रेम’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी छत्रपती संभाजीराजे बोलत होते.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, आज महाराष्ट्रातील ३०० किल्ल्यांपैकी ४० किल्ले केंद्राच्या पुरातत्व विभागाकडे, तर ४० राज्याच्या पुरातत्व विभागाकडे आहेत. उर्वरित सुमारे २०० किल्ले वनविभाग आणि महसूल विभागाकडे येतात. रायगडाच्या संवर्धनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली, मात्र नोकरशाहीच्या विविध जटील नियमांमध्ये गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन अडकून पडले आहे. किल्ल्यांची पुनर्बांधणी करणे किंवा त्या किल्ल्यांचे पुरावे आणि नोंदी असतील तर त्यांचे त्यानुसार जतन आणि संवर्धन करणे अशा दोन विचारधारा दिसून येतात. परंतु, इतिहासाला बाधा न पोहोचवता शिवाजी महाराजांचा इतिहास गाडला जाणार नाही, याची दक्षता घेऊन किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, हा मधला मार्ग स्विकारण्याची गरज आहे. आज रायगडावर सुरू असलेले संवर्धनाचे काम आम्ही पूर्वीच्या आणि जास्तीत जास्त शास्त्रोक्त पद्धतीने करीत आहोत. फोर्ट फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत आम्ही सरकारकडे २५ किल्ल्यांची मागणी करत असून शिवभक्तांच्या माध्यमातून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ, असा शब्द आम्ही देतो. 

ट्रेकिंग ऐवजी गड पदभ्रमंती या शब्दप्रयोगाचा वापर करावा

सरकारने आणलेली दत्तक योजना ही केवळ पर्यटनापुरती मर्यादित आहे, तर संवर्धन आणि जतनासाठी नाही. आमच्या दृष्टिकोतनातून गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन हे प्राधान्यक्रमावर असून पर्यटन हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आपल्या अस्मितेचा भाग असून आम्हाला तिथे राजस्थानमधील गडकिल्ल्यांवर असलेली ‘संस्कृती’ आणायची नाही. गडकिल्ल्यांच्या बाबतीत ट्रेकिंग हा जो शब्द वापरला जातो, त्याला देखील आमचा आक्षेप असून त्याठिकाणी गड पदभ्रमंती या शब्दप्रयोगाचा वापर करावा आणि तो रूजवावा असा आमचा आग्रह आहे. कारण महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आत्मचिंतन आणि महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे स्थळ असल्याचे छत्रपती संभाजीराजेंनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगडTrekkingट्रेकिंग