शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही महाराष्ट्रातील गडकिल्ले दुर्लक्षित; छत्रपती संभाजीराजेंची खंत

By नितीश गोवंडे | Updated: April 16, 2023 16:05 IST

सरकारकडे २५ किल्ल्यांची मागणी करत असून शिवभक्तांच्या माध्यमातून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ

पुणे : सरकार कोणाचेही असो आणि सरकार कुठलेही असो महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी काय केले, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. किती नेते गड-किल्ल्यांविषयी आस्था बाळगून आहेत आणि त्यातील किती जणांनी गड-किल्ल्यांवरून पदभ्रमण केले आहे, हा संशोधनाचा विषय आहे. केवळ शिवाजी महाराजांसारखे महापुरूष आणि गडकिल्ल्यांची नावे घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हेच सुरू असल्याची खंत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.

गडकिल्ल्यांबद्दल असणारे प्रेम, त्यातून प्रत्यक्ष अनुभवलेला इतिहास, थक्क करणारी अभ्यासपूर्ण मांडणी, प्रत्यक्षपणे किल्ल्यांची अनुभूती देणारे नकाशे व चित्रे यांच्या आगळ्या-वेगळ्या मांडणीतून एसीपी सुरज गुरव यांनी लिहिलेल्या ‘माझं गडप्रेम’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी छत्रपती संभाजीराजे बोलत होते.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, आज महाराष्ट्रातील ३०० किल्ल्यांपैकी ४० किल्ले केंद्राच्या पुरातत्व विभागाकडे, तर ४० राज्याच्या पुरातत्व विभागाकडे आहेत. उर्वरित सुमारे २०० किल्ले वनविभाग आणि महसूल विभागाकडे येतात. रायगडाच्या संवर्धनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली, मात्र नोकरशाहीच्या विविध जटील नियमांमध्ये गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन अडकून पडले आहे. किल्ल्यांची पुनर्बांधणी करणे किंवा त्या किल्ल्यांचे पुरावे आणि नोंदी असतील तर त्यांचे त्यानुसार जतन आणि संवर्धन करणे अशा दोन विचारधारा दिसून येतात. परंतु, इतिहासाला बाधा न पोहोचवता शिवाजी महाराजांचा इतिहास गाडला जाणार नाही, याची दक्षता घेऊन किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, हा मधला मार्ग स्विकारण्याची गरज आहे. आज रायगडावर सुरू असलेले संवर्धनाचे काम आम्ही पूर्वीच्या आणि जास्तीत जास्त शास्त्रोक्त पद्धतीने करीत आहोत. फोर्ट फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत आम्ही सरकारकडे २५ किल्ल्यांची मागणी करत असून शिवभक्तांच्या माध्यमातून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ, असा शब्द आम्ही देतो. 

ट्रेकिंग ऐवजी गड पदभ्रमंती या शब्दप्रयोगाचा वापर करावा

सरकारने आणलेली दत्तक योजना ही केवळ पर्यटनापुरती मर्यादित आहे, तर संवर्धन आणि जतनासाठी नाही. आमच्या दृष्टिकोतनातून गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन हे प्राधान्यक्रमावर असून पर्यटन हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आपल्या अस्मितेचा भाग असून आम्हाला तिथे राजस्थानमधील गडकिल्ल्यांवर असलेली ‘संस्कृती’ आणायची नाही. गडकिल्ल्यांच्या बाबतीत ट्रेकिंग हा जो शब्द वापरला जातो, त्याला देखील आमचा आक्षेप असून त्याठिकाणी गड पदभ्रमंती या शब्दप्रयोगाचा वापर करावा आणि तो रूजवावा असा आमचा आग्रह आहे. कारण महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आत्मचिंतन आणि महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे स्थळ असल्याचे छत्रपती संभाजीराजेंनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगडTrekkingट्रेकिंग