शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाला ई-वेस्टच्या व्हायरसचा धोका

By admin | Updated: June 5, 2015 00:22 IST

देशात ई-वेस्टच्या कचरा निर्मितीमध्ये सातव्या व राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे शहराला ई-वेस्टचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

पुणे : देशात ई-वेस्टच्या कचरा निर्मितीमध्ये सातव्या व राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे शहराला ई-वेस्टचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. ई-वेस्ट संकलित करण्यासाठी असलेली अपुरी यंत्रणा आणि या वेस्टमधील पुन्हा वापरता येणारे घटक वेगळे न करता त्याचे केले जाणारे डिसमेटलिंग (तोडफोड) यामुळे पर्यावरणाबरोबरच कचऱ्यात काम करणाऱ्या शेकडो कचरावेचकांनाही धोका निर्माण झाला आहे. गेल्या दशकभरात शहराची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, विद्येचे माहेरघर असलेले पुणे आयटी सिटी म्हणून नावारूपास आले आहे. हिंजवडी, खराडी तसेच मगरपट्टा सिटी परिसरात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. याशिवाय, दैनंदिन जीवनातही इलेक्ट्रॉनिक वस्तंूचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने तसेच चिनी बनावटीच्या इलेक्ट्रिक वस्तंूची भरमार असल्याने शहरात ई-वेस्टची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महापालिकेने शहरातील संस्थांकडून मागील वर्षी ई-वेस्टबाबत केलेल्या सर्वेक्षणात शहरात दर वर्षी तब्बल ८ ते ९ हजार टन ई-वेस्टची निर्मिती होत असल्याचे समोर आले आहे. तर पुणे हे मुंबईपाठोपाठ ई-कचऱ्याची निर्मिती होणारे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून पुढे आले आहे.(प्रतिनिधी)संकलन आणि जनजागृतीचा अभाव ई-वेस्टच्या कचऱ्याची समस्या गंभीर बनत असल्याने त्याचे संकलन करून त्याचा मोठ्या प्रमाणात पुनर्वापर तसेच वापरता न येणाऱ्या घटकांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मात्र, या कचऱ्याचे संकलन आणि त्याची विल्हेवाट लावण्याबाबत जनजागृती नसल्याने दर वर्षी निर्माण होणाऱ्या ८ ते ९ हजार ई-वेस्टमधील अवघे ३ ते ४ टन ई वेस्टच गेल्या वर्षभरात महापालिकेस संकलित करण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांच्या धर्तीवर वुई कलेक्ट मोहीमही राबविण्यात आली. मात्र, तिला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे यावरून दिसून येते. सध्या पालिकेचे कोथरूड येथे एक कलेक्शन सेंटर असून हडपसर येथे दुसरे संकलन केंद्र सुरू होणार आहे.संकलन केंद्रे आणि जनजागृती वाढविणार गेल्या दशकभरात शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याबरोबरच ई-वेस्टचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे या कचऱ्याबाबत जनजागृती आणि तो संकलित करण्यासाठी एक संकलन केंद्र सुरू आहे. मात्र, नागरिकांना त्या वस्तूंंच्या मोबदल्यात पैसे हवे असल्याने तो जमा न करता तो भंगार व्यावसायिकांकडे विकण्यावर भर देतात. मात्र, तो खरेदी करणाऱ्यांकडून कचरा रिसायकलसाठी न पाठवता, त्याचे डिसमेटलिंग केले जाते. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे हा डिसमेटल केलेला कचरा कोठे जातो, याबाबत काहीच निष्कर्ष लावणे शक्य नाही. त्यामुळे या कचऱ्याबाबत जनजागृती करून लवकरच संपूर्ण शहरात संकलन केंद्रे सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख सुरेश जगताप यांनी लोकमतला सांगितले.