शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

संमेलन स्थगित तरीही उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST

पुणे : माणसाच्या जीवापेक्षा आणि जगण्यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची ठरत नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देश आणि जगभरातून ...

पुणे : माणसाच्या जीवापेक्षा आणि जगण्यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची ठरत नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देश आणि जगभरातून लोक संमेलनस्थळी येतात. सद्यस्थितीत नाशिककरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हे हिताचे नव्हे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा निर्णय योग्य आहे. संमेलनाला स्थगिती दिली तरी साहित्य रसिकांचा उत्साह कायम राहील, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महामंडळाने स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’त्यांच्याशी संवाद साधला.

जोशी म्हणाले, नाशिक येथे मार्च महिन्याच्या अखेरीस होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने स्थगित केले आहे. असा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि नाशिकच्या आयोजक संस्थेने घेतला. साहित्य संमेलन मराठी समाजाचा वाङमयीन उत्सव आहे. या उत्सवाचे जगभरातील मराठी माणसांना खूप आकर्षण असते. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधकाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्मानाने निवड झाली. त्याने साहित्यरसिकांचा उत्साह वाढवला होता. कोरोना महामारीच्या जागतिक संकटात डॉ. नारळीकरांसारखे संशोधक आपल्या अध्यक्षीय भाषणातून समाजाला कोणती दिशा दाखवतात. या विषयीची जिज्ञासा सर्वसामान्य मराठी साहित्य रसिक आणि वाचकांच्या मनात होती. पण आता त्यांना काही काळ वाट पहावी लागणार आहे.

नाशिक संमेलनस्थळ ठरवताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाची पूर्वपरवानगी घेऊनच संमेलनाचे नियोजन करावे. अशी सूचना साहित्य महामंडळातील अनेक सदस्यांनी केली होती. स्थळ ठरल्यानंतर कोरोना कमी होत असल्याच्या खाणाखुणा दिसत होत्या. त्यामुळे संमेलनाची आशा वाढली होती. सद्यस्थितीत पाहता ते स्थगित करावे लागले. सहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन हे रसिकांचे मुख्य आकर्षण असते. पुस्तके पाहण्यासाठी झालेली दर्दीची गर्दी, तो उत्साह आवरणे सद्यस्थितीत कठीण झाले असते. साहित्य संमेलन स्थगित झाले तरी रसिकांचा उत्साह कमी झालेला नाही. कारण भीतीच्या सावटाखाली साहित्याचा आनंद घेणे. त्यांनाही सोयीस्कर वाटले नसते. त्यामुळे हे साहित्य रसिक वातावरण निवळण्याची निश्चितच वाट पाहतील.