शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

संमेलन स्थगित तरीही उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:13 IST

पुणे : माणसाच्या जीवापेक्षा आणि जगण्यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची ठरत नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देश आणि जगभरातून ...

पुणे : माणसाच्या जीवापेक्षा आणि जगण्यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची ठरत नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देश आणि जगभरातून लोक संमेलनस्थळी येतात. सद्यस्थितीत नाशिककरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हे हिताचे नव्हे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा निर्णय योग्य आहे. संमेलनाला स्थगिती दिली तरी साहित्य रसिकांचा उत्साह कायम राहील, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महामंडळाने स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’त्यांच्याशी संवाद साधला.

जोशी म्हणाले, नाशिक येथे मार्च महिन्याच्या अखेरीस होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने स्थगित केले आहे. असा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि नाशिकच्या आयोजक संस्थेने घेतला. साहित्य संमेलन मराठी समाजाचा वाङमयीन उत्सव आहे. या उत्सवाचे जगभरातील मराठी माणसांना खूप आकर्षण असते. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधकाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्मानाने निवड झाली. त्याने साहित्यरसिकांचा उत्साह वाढवला होता. कोरोना महामारीच्या जागतिक संकटात डॉ. नारळीकरांसारखे संशोधक आपल्या अध्यक्षीय भाषणातून समाजाला कोणती दिशा दाखवतात. या विषयीची जिज्ञासा सर्वसामान्य मराठी साहित्य रसिक आणि वाचकांच्या मनात होती. पण आता त्यांना काही काळ वाट पहावी लागणार आहे.

नाशिक संमेलनस्थळ ठरवताना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाची पूर्वपरवानगी घेऊनच संमेलनाचे नियोजन करावे. अशी सूचना साहित्य महामंडळातील अनेक सदस्यांनी केली होती. स्थळ ठरल्यानंतर कोरोना कमी होत असल्याच्या खाणाखुणा दिसत होत्या. त्यामुळे संमेलनाची आशा वाढली होती. सद्यस्थितीत पाहता ते स्थगित करावे लागले. सहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन हे रसिकांचे मुख्य आकर्षण असते. पुस्तके पाहण्यासाठी झालेली दर्दीची गर्दी, तो उत्साह आवरणे सद्यस्थितीत कठीण झाले असते. साहित्य संमेलन स्थगित झाले तरी रसिकांचा उत्साह कमी झालेला नाही. कारण भीतीच्या सावटाखाली साहित्याचा आनंद घेणे. त्यांनाही सोयीस्कर वाटले नसते. त्यामुळे हे साहित्य रसिक वातावरण निवळण्याची निश्चितच वाट पाहतील.