शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उर्जा मंत्री नितीन राऊत म्हणतात, 'महाराष्ट्र अंधारात जाऊ देणार नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 17:15 IST

पुणे : कोळशाची अडचण आहे, पण कोणत्याही स्थितीत राज्य अंधारात जाऊ देणार नाही असे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत ...

पुणे: कोळशाची अडचण आहे, पण कोणत्याही स्थितीत राज्य अंधारात जाऊ देणार नाही असे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांनी सांगितले. काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना राऊत म्हणाले, या सगळ्या चूका राज्यातील मागील वेळच्या भाजपा सरकारच्या आहेत. त्यांचे माजी मंत्री आता मिस मँनेजमेंट म्हणून आमच्यावर टीका करत असतील, पण खरी मिस मँनेजमेंट त्यांचीच होती. त्यांनी सरकारी संस्था, तसेच ग्रामपंचायती यांच्याकडून थकीत वीज बिलांची वसूलीच केली नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.कोळसा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, पण अतिवृष्टी, अचानक मागणी वाढणे यामुळे शिल्लक साठा संपला. पावसाने कोळसा कमी झाला. तरीही आमचे अधिकारी शोध घेत आहेत. विलासपूरला महानदी प्रकल्पात कोळसा आहे असे समजले असून अधिकारी तिकडे गेले आहे अशी माहिती डॉ. राऊत यांनी दिली.

'...कशी तुझी जिरवली आता भर शंभरचं!'

आर्थिक अडचणी असल्याचे मान्य करून डॉ. राऊत म्हणाले, महानिर्मितीला कोळसा खरेदी करण्यासाठी पैसे लागतात. ते महावितरणकडून मिळतात. महावितरणची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे यातून ग्राहकच खरा मार्ग काढू शकतात, त्यांनी थकीत वीजबिले त्वरीत भरावीत असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेNitin Rautनितीन राऊत