शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

वीरपत्नींचा संघर्ष अखेरपर्यंत, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 03:52 IST

सीमेवर शत्रूशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्याच्या मृत्यूनंतरदेखील तिची जगण्यासाठीची धडपड सुरूच असते. संसाराकडे लक्ष पुरविताना मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, याबाबत काळजी घेणे तारेवरची कसरत असते. याशिवाय समाजातील विविध चालीरीतींना तोंड द्यावे लागते.

पुणे - सीमेवर शत्रूशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्याच्या मृत्यूनंतरदेखील तिची जगण्यासाठीची धडपड सुरूच असते. संसाराकडे लक्ष पुरविताना मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, याबाबत काळजी घेणे तारेवरची कसरत असते. याशिवाय समाजातील विविध चालीरीतींना तोंड द्यावे लागते. अशा वीरपत्नींचा संघर्ष सातत्याने सुरूच असतो, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा यशोदा पुरस्कार परमवीरचक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी रसुलन बीबीजी यांना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक विठ्ठल मणियार, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, इस्मालिक अभ्यासक अनिसजी चिश्ती, मयूर जाधव, ब्रिगेडीयर प्रसाद जोशी, माजी उपमहापौर दीपक मानकर, अ‍ॅड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, जमील आलम, माधवराव मानकर आदी उपस्थित होते. १ लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.मानपत्राचे वाचन डॉ. सुनील देवधर यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. हर्षवर्धन मानकर यांनी आभार मानले.सैनिकांच्या पत्नींचे अनेक प्रश्न पाटील म्हणाल्या की, सैनिक शहीद झाल्यानंतर त्याचा गंभीर परिणाम पत्नीवर होतो. कुटुंबाचा आर्थिक भार सहन करत मुलांना शिकवावे लागते. अशा वेळी तिच्या धैर्याला दाद द्यावी लागेल. हा संघर्ष काही सोपा नाही. देशाप्रति प्रचंड निष्ठा, त्याग यामुळे ती आपल्यासमोरील संकटांचा जिद्दीने सामना करते. सैनिकांच्या पत्नींचे अनेक प्रश्न आहेत. देशात राजस्थानात सर्वाधिक वीरपत्नी असून, त्यांची संख्या ११00 इतकी आहे. पवार म्हणाले की, भारतीय म्हणून आता आपण सर्वांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. त्यात कुठलीही जात, धर्म, वंश येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अनीस चिश्ती म्हणाले, सैनिक ज्याप्रमाणे कुठलीही जात, धर्म मानत नाहीत त्याप्रमाणे नागरिकांनीदेखील आपण सर्वजण भारतीय आहोत या संकल्पनेखाली एकत्र येणे महत्त्वाचे आहे. डॉ. देखणे यांनी वारकरी संप्रदाय तसेच भागवत धर्मातील अनेक उदाहरणे देऊन धर्म आणि मानवता यांचे नाते स्पष्ट केले.इतना सन्मान मिला अच्छा लगा९५ वर्षीय रसुलन बीबी सत्कार सोहळ्याने भारावून गेल्या. क्षणभर त्यांना काय बोलावे हे सुचत नव्हते. त्यांनी आयोजक आणि समस्त पुणेकरांचे आभार मानले.‘‘हमे इतना सन्मान मिलाअच्छा लगा, बहुत धन्यवाद. पती जाने के बाद हिंदुस्थान ने बडी इज्जत दी’’ या शब्दांतत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :PuneपुणेPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलIndian Armyभारतीय जवान