शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

वीरपत्नींचा संघर्ष अखेरपर्यंत, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 03:52 IST

सीमेवर शत्रूशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्याच्या मृत्यूनंतरदेखील तिची जगण्यासाठीची धडपड सुरूच असते. संसाराकडे लक्ष पुरविताना मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, याबाबत काळजी घेणे तारेवरची कसरत असते. याशिवाय समाजातील विविध चालीरीतींना तोंड द्यावे लागते.

पुणे - सीमेवर शत्रूशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्याच्या मृत्यूनंतरदेखील तिची जगण्यासाठीची धडपड सुरूच असते. संसाराकडे लक्ष पुरविताना मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, याबाबत काळजी घेणे तारेवरची कसरत असते. याशिवाय समाजातील विविध चालीरीतींना तोंड द्यावे लागते. अशा वीरपत्नींचा संघर्ष सातत्याने सुरूच असतो, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा यशोदा पुरस्कार परमवीरचक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी रसुलन बीबीजी यांना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक विठ्ठल मणियार, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, इस्मालिक अभ्यासक अनिसजी चिश्ती, मयूर जाधव, ब्रिगेडीयर प्रसाद जोशी, माजी उपमहापौर दीपक मानकर, अ‍ॅड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, जमील आलम, माधवराव मानकर आदी उपस्थित होते. १ लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.मानपत्राचे वाचन डॉ. सुनील देवधर यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. हर्षवर्धन मानकर यांनी आभार मानले.सैनिकांच्या पत्नींचे अनेक प्रश्न पाटील म्हणाल्या की, सैनिक शहीद झाल्यानंतर त्याचा गंभीर परिणाम पत्नीवर होतो. कुटुंबाचा आर्थिक भार सहन करत मुलांना शिकवावे लागते. अशा वेळी तिच्या धैर्याला दाद द्यावी लागेल. हा संघर्ष काही सोपा नाही. देशाप्रति प्रचंड निष्ठा, त्याग यामुळे ती आपल्यासमोरील संकटांचा जिद्दीने सामना करते. सैनिकांच्या पत्नींचे अनेक प्रश्न आहेत. देशात राजस्थानात सर्वाधिक वीरपत्नी असून, त्यांची संख्या ११00 इतकी आहे. पवार म्हणाले की, भारतीय म्हणून आता आपण सर्वांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. त्यात कुठलीही जात, धर्म, वंश येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अनीस चिश्ती म्हणाले, सैनिक ज्याप्रमाणे कुठलीही जात, धर्म मानत नाहीत त्याप्रमाणे नागरिकांनीदेखील आपण सर्वजण भारतीय आहोत या संकल्पनेखाली एकत्र येणे महत्त्वाचे आहे. डॉ. देखणे यांनी वारकरी संप्रदाय तसेच भागवत धर्मातील अनेक उदाहरणे देऊन धर्म आणि मानवता यांचे नाते स्पष्ट केले.इतना सन्मान मिला अच्छा लगा९५ वर्षीय रसुलन बीबी सत्कार सोहळ्याने भारावून गेल्या. क्षणभर त्यांना काय बोलावे हे सुचत नव्हते. त्यांनी आयोजक आणि समस्त पुणेकरांचे आभार मानले.‘‘हमे इतना सन्मान मिलाअच्छा लगा, बहुत धन्यवाद. पती जाने के बाद हिंदुस्थान ने बडी इज्जत दी’’ या शब्दांतत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :PuneपुणेPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलIndian Armyभारतीय जवान