शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वीरपत्नींचा संघर्ष अखेरपर्यंत, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 03:52 IST

सीमेवर शत्रूशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्याच्या मृत्यूनंतरदेखील तिची जगण्यासाठीची धडपड सुरूच असते. संसाराकडे लक्ष पुरविताना मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, याबाबत काळजी घेणे तारेवरची कसरत असते. याशिवाय समाजातील विविध चालीरीतींना तोंड द्यावे लागते.

पुणे - सीमेवर शत्रूशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्याच्या मृत्यूनंतरदेखील तिची जगण्यासाठीची धडपड सुरूच असते. संसाराकडे लक्ष पुरविताना मुलांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य, याबाबत काळजी घेणे तारेवरची कसरत असते. याशिवाय समाजातील विविध चालीरीतींना तोंड द्यावे लागते. अशा वीरपत्नींचा संघर्ष सातत्याने सुरूच असतो, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा यशोदा पुरस्कार परमवीरचक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी रसुलन बीबीजी यांना पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक विठ्ठल मणियार, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, इस्मालिक अभ्यासक अनिसजी चिश्ती, मयूर जाधव, ब्रिगेडीयर प्रसाद जोशी, माजी उपमहापौर दीपक मानकर, अ‍ॅड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, जमील आलम, माधवराव मानकर आदी उपस्थित होते. १ लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.मानपत्राचे वाचन डॉ. सुनील देवधर यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. हर्षवर्धन मानकर यांनी आभार मानले.सैनिकांच्या पत्नींचे अनेक प्रश्न पाटील म्हणाल्या की, सैनिक शहीद झाल्यानंतर त्याचा गंभीर परिणाम पत्नीवर होतो. कुटुंबाचा आर्थिक भार सहन करत मुलांना शिकवावे लागते. अशा वेळी तिच्या धैर्याला दाद द्यावी लागेल. हा संघर्ष काही सोपा नाही. देशाप्रति प्रचंड निष्ठा, त्याग यामुळे ती आपल्यासमोरील संकटांचा जिद्दीने सामना करते. सैनिकांच्या पत्नींचे अनेक प्रश्न आहेत. देशात राजस्थानात सर्वाधिक वीरपत्नी असून, त्यांची संख्या ११00 इतकी आहे. पवार म्हणाले की, भारतीय म्हणून आता आपण सर्वांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. त्यात कुठलीही जात, धर्म, वंश येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अनीस चिश्ती म्हणाले, सैनिक ज्याप्रमाणे कुठलीही जात, धर्म मानत नाहीत त्याप्रमाणे नागरिकांनीदेखील आपण सर्वजण भारतीय आहोत या संकल्पनेखाली एकत्र येणे महत्त्वाचे आहे. डॉ. देखणे यांनी वारकरी संप्रदाय तसेच भागवत धर्मातील अनेक उदाहरणे देऊन धर्म आणि मानवता यांचे नाते स्पष्ट केले.इतना सन्मान मिला अच्छा लगा९५ वर्षीय रसुलन बीबी सत्कार सोहळ्याने भारावून गेल्या. क्षणभर त्यांना काय बोलावे हे सुचत नव्हते. त्यांनी आयोजक आणि समस्त पुणेकरांचे आभार मानले.‘‘हमे इतना सन्मान मिलाअच्छा लगा, बहुत धन्यवाद. पती जाने के बाद हिंदुस्थान ने बडी इज्जत दी’’ या शब्दांतत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :PuneपुणेPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलIndian Armyभारतीय जवान