शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सारस्वतांच्या मानधनावरून रंगला कलगीतुरा, संमेलन आटोपशीर करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:54 IST

मराठी सारस्वतांचा मेळा अशी खासियत असलेल्या साहित्य संमेलनामध्ये लेखक, साहित्यिकांनी प्रवास खर्च आणि मानधनाचा त्याग करावा, असे आवाहन बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषदेने केले

प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : मराठी सारस्वतांचा मेळा अशी खासियत असलेल्या साहित्य संमेलनामध्ये लेखक, साहित्यिकांनी प्रवास खर्च आणि मानधनाचा त्याग करावा, असे आवाहन बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषदेने केले आहे. या पार्श्वभूमीवर लेखकांना मानधन मिळावे की नाही, या मुद्द्यावरून साहित्यक्षेत्रात कलगीतुरा रंगला आहे. महामंडळाच्या अध्यक्षांनी या निर्णयाचे स्वागत केले असतानाच, संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिकांचा मानधन देऊन सन्मान का होऊ नये, असा सवालही उपस्थित केला जात आहे. यंदा संमेलनातील निमंत्रितांची संख्या १८० वरून निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आल्यानेही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी समाजमनाचा मानबिंदू मानला जातो. संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा विविध विषयांवर सांगोपांग चर्चा घडून येते. साहित्याची परंपरा समृद्ध व्हावी, नवनवीन विषयांवर विचारमंथन व्हावे, यादृष्टीने अनेक लेखक, साहित्यिक संमेलनाला आवर्जून हजेरी लावतात. संमेलनासाठी निमंत्रित करण्यात येणाºया मान्यवरांचा प्रवास खर्च, निवास आणि भोजनव्यवस्था, तसेच मानधनाचा खर्च आयोजकांकडून केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य संमेलनाने कोटींची उड्डाणे घेण्यास सुरुवात केली आहे. संमेलनाचा खर्च आटोक्यात यावा, यादृष्टीने साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर संमेलनासाठी निमंत्रितांनी मानधनाचा त्याग करावा व प्रवासखर्चही ज्याचा त्याने करावा, असे आवाहन केले होते. माझ्या भूमिकेचा पुरस्कार करणारे आयोजक बडोद्याच्या संमेलनाला लाभले याचा मला आनंद आहे. निमंत्रित सहभागींनी आयोजकांच्या या अपेक्षेला उत्साहाने प्रतिसाद दिल्यास संमेलन संस्कृतीला इष्ट वळण लाभू शकते,’ असे मत श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.याबाबत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘साहित्य संमेलनामध्ये मान्यवर साहित्यिकांना मानधन मिळायला हवे. आयोजकांनी इतर खर्चांना कात्री लावून मराठी सारस्वतांचा अगत्यपूर्वक सन्मान करण्यास काहीच हरकत नाही. दर वर्षीपेक्षा निमंत्रितांची संख्या कमी करण्यात आल्याने मसापतर्फे ३० ऐवजी यंदा आठ-दहा जणांनाच संधी मिळणार आहे.’साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष म्हणाले, ‘महामंडळाचे अध्यक्ष संमेलन व महामंडळाच्या बैठकीसाठी स्वखर्चाने फिरत असतील तर महामंडळाच्या अन्य पदाधिकाºयांनीही सुरुवात स्वत:पासून करावी. महामंडळाच्या बैठकीसाठी, संमेलनाला जाण्यासाठी कुठलेही मानधन व भत्ता घेऊ नये. या निर्णयाची अंमलबजावणी करून साहित्यिक व वाचकांच्यासमोर योग्य तो संकेत जाईल.’>संमेलनाचा खर्च आटोक्यात आणायचा असेल तर मानधन व प्रवासखर्चाचा लेखकांनी त्याग करायला काहीच हरकत नाही. डोंबिवलीच्या संमेलनातही आयोजकांना याबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडे पैसा असल्याने त्यांनी हे अमान्य केले. बडोद्यातील आयोजक संस्था लोकाश्रयावर आटोपशीर संमेलन घेण्याचा प्रयत्न करत आहे, तो स्वागतार्ह आहे. संमेलनाचा लेखकवर्ग हळूहळू बदलत आहे. त्यामुळे त्यांची मानधनाचा त्याग करण्यास हरकत नसावी. मी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यापासून स्वखर्चाचे गणित पाळतो आहे. - डॉ. श्रीपाद जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ>आयपीएलमध्ये क्रिकेटपटूंना तसेच नाट्यसंमेलनामध्ये कलावंतांना मानधन मिळते. मग, साहित्य संमेलनामध्ये लेखकांना मानधन का मिळू नये? मराठी सारस्वतांचा अगत्यपूर्वक सन्मान व्हायला काहीच हरकत नसावी. आयोजकांनी इतर खर्च कमी करून मानधन द्यावे.- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप>संमेलनात सहभागी होणाºया मान्यवरांनी मानधनाचा त्याग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याची सुरुवात महामंडळाच्या पदाधिकाºयांनी स्वत:पासून करावी. महामंडळाच्या बैठकीसाठी व संमेलनाला जाण्यासाठी कुठलेही मानधन व भत्ता घेऊ नये, असे मला वाटते. या निर्णयाची अंमलबजावणी करून साहित्यिक व वाचकांच्यासमोर योग्य संकेत जाईल.- सुनील महाजन,माजी कोषाध्यक्ष, साहित्य महामंडळ

टॅग्स :Puneपुणे