शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

उदयोन्मुख नेतृत्व ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डस’ : सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे खानापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 02:37 IST

तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे.

- संतोष म्हस्केनेरे : तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे. गावातील नागरिकांचा रोगराई पासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे, या कामाची दखल घेऊन गावचे सरपंच चंद्रकांत नागरे यांना उदयोन्मुख नेतृत्व म्हणून ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे.भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील दुर्गम-डोंगरी भागातील बारावाड्या, एक हजार उंबरठा तसेच ३ हजार लोकसंख्या असणाºयाखानापूर (ता. भोर) गावाची नागरिकांच्या एकजुटीतून व लोक सहभागातून विकासाकडे वाटचाल चालू आहे.गावातील मूलभूत व भौतिक सुविधा तसेच नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना याच्यावर भर देऊन विकासाचा ध्यास हाती खानापूर येथे करण्यात आले आहे.तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे. गावातील नागरिकांचा रोगराई पासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे. कॉईनबॉक्स वरून पाच रुपयांच्या नाण्यावर गावातील लोकांना २० लिटर पाणी देण्यात येणार आहे.मागील काळातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी गावचा परीपूर्ण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जनतेच्या मूलभूत सुखसोयींसाठी तसेच गावचा विकास परिपूर्ण करण्यासाठी नागरे यांची धडपड चालू आहे.खानापूर येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या नवीन मंदिराचे ४५ लक्ष रुपयांचे बांधकाम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहे. गावात शासकीय नवनवीन जनहिताच्या विकासाच्या सुविधा मिळवून त्या राबवण्यात येत आहेत.गावच्या बारा वाड्यात चौथी पर्यंत पाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बारावीपर्यंत एक माध्यमिक विद्यालय, बारा वाड्यामध्ये पाच अंगणवाडी केंद्र असून याकडे सरपंचांचे पूर्ण लक्ष असते.डोंगर रांगांच्या कुशीत वसलेले खानापूर गाव निसर्गरम्य वातावरणात सुखाने नांदत आहे.१०० टक्के हगणदरीमुक्त - खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे .नांदेड पॅटर्न -गावातील नागरिकांचा रोगराईपासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्ड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे.पाण्यासाठी एटीएम यंत्रणा - कॉईनबॉक्सवरून पाच रुपयांच्या नाण्यावर गावातील लोकांना २० लिटर पाणी देण्यात येणार आहे.कामाची पावती मिळालीआतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. मात्र गावचा सरपंच म्हणून तसेच समाजहिताचे काम करताना ‘लोकमत’ने खेडो-पाड्यांच्या सरपंचांच्या कामाची पावती म्हणून आम्हाला गौरविले व माझ्या गावाला जिल्ह्याच्या नकाशावर नावलौकिक दिला त्याबद्दल लोकमत समूहाचे अभिनंदन करतो असे नांगरे यांच्याकडून सांगण्यात आले.पावसाच्या पाण्यावर शेतीगावातील बहुतांशी शेतकरी शेतीला पाण्याच्या तुटवडा भासत असल्याने पावसाच्या पाण्यावर प्रामुख्याने भात पिकाचे उत्पन्न घेतात.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPuneपुणे