शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

उदयोन्मुख नेतृत्व ‘लोकमत सरपंच अ‍ॅवॉर्डस’ : सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे खानापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 02:37 IST

तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे.

- संतोष म्हस्केनेरे : तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे. गावातील नागरिकांचा रोगराई पासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे, या कामाची दखल घेऊन गावचे सरपंच चंद्रकांत नागरे यांना उदयोन्मुख नेतृत्व म्हणून ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने गौरविण्यात आले आहे.भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील दुर्गम-डोंगरी भागातील बारावाड्या, एक हजार उंबरठा तसेच ३ हजार लोकसंख्या असणाºयाखानापूर (ता. भोर) गावाची नागरिकांच्या एकजुटीतून व लोक सहभागातून विकासाकडे वाटचाल चालू आहे.गावातील मूलभूत व भौतिक सुविधा तसेच नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना याच्यावर भर देऊन विकासाचा ध्यास हाती खानापूर येथे करण्यात आले आहे.तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोºयातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचे खानापूर गाव असून गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे. गावातील नागरिकांचा रोगराई पासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे. कॉईनबॉक्स वरून पाच रुपयांच्या नाण्यावर गावातील लोकांना २० लिटर पाणी देण्यात येणार आहे.मागील काळातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी गावचा परीपूर्ण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जनतेच्या मूलभूत सुखसोयींसाठी तसेच गावचा विकास परिपूर्ण करण्यासाठी नागरे यांची धडपड चालू आहे.खानापूर येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या नवीन मंदिराचे ४५ लक्ष रुपयांचे बांधकाम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहे. गावात शासकीय नवनवीन जनहिताच्या विकासाच्या सुविधा मिळवून त्या राबवण्यात येत आहेत.गावच्या बारा वाड्यात चौथी पर्यंत पाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बारावीपर्यंत एक माध्यमिक विद्यालय, बारा वाड्यामध्ये पाच अंगणवाडी केंद्र असून याकडे सरपंचांचे पूर्ण लक्ष असते.डोंगर रांगांच्या कुशीत वसलेले खानापूर गाव निसर्गरम्य वातावरणात सुखाने नांदत आहे.१०० टक्के हगणदरीमुक्त - खानापूर गाव १०० टक्के हगणदरीमुक्त असून गावाने आदर्श ग्रामपंचायत करण्याचा संकल्प केला आहे .नांदेड पॅटर्न -गावातील नागरिकांचा रोगराईपासून बचाव होण्यासाठी नांदेड पॅटर्न शोष खड्ड्यांचे तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम चालू आहे.पाण्यासाठी एटीएम यंत्रणा - कॉईनबॉक्सवरून पाच रुपयांच्या नाण्यावर गावातील लोकांना २० लिटर पाणी देण्यात येणार आहे.कामाची पावती मिळालीआतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. मात्र गावचा सरपंच म्हणून तसेच समाजहिताचे काम करताना ‘लोकमत’ने खेडो-पाड्यांच्या सरपंचांच्या कामाची पावती म्हणून आम्हाला गौरविले व माझ्या गावाला जिल्ह्याच्या नकाशावर नावलौकिक दिला त्याबद्दल लोकमत समूहाचे अभिनंदन करतो असे नांगरे यांच्याकडून सांगण्यात आले.पावसाच्या पाण्यावर शेतीगावातील बहुतांशी शेतकरी शेतीला पाण्याच्या तुटवडा भासत असल्याने पावसाच्या पाण्यावर प्रामुख्याने भात पिकाचे उत्पन्न घेतात.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPuneपुणे