शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘एकता दौड हा समाजासाठी संदेश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:54 IST

इंदापूर तालुक्यातील सामाजिक एकता, बंधुता व समतेसाठी आयोजित ‘एकता दौड’ मुळे समाजात सर्वधर्म निर्माण होण्यास मदत होणार आहे. समाजासाठी हा एकतेचा संदेश आहे,

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सामाजिक एकता, बंधुता व समतेसाठी आयोजित ‘एकता दौड’ मुळे समाजात सर्वधर्म निर्माण होण्यास मदत होणार आहे. समाजासाठी हा एकतेचा संदेश आहे, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बुधवार ( दि. २९ ) रोजी सकाळी ८.३० वाजता, इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणातील कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर, बारामती आयर्नमॅन विजेते सतीश ननवरे, पुणे आयर्नमॅन विजेते दशरथ जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘एकता दौड’ची सुरुवात करण्यात आली.

एकता दौडची सुरवात इंदापूर महाविद्यालयाच्या मैदानावरून करण्यात आली. पुढे पुणे-सोलापूर महामार्ग - पंचायत समिती - शंभर फुटी रोड - स्मशानभूमी मार्गे - रामवेस नाका - जुनी तहसिल कचेरी - नेहरू चौक - मुख्य बाजारपेठ ते पुन्हा इंदापूर महाविद्यालयाच्या मैदानावर समारोप करण्यात आला. तालुक्यातील इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, श्री नारायणदास रामदास कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय, एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय व तालुक्यातील विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, अनेक महाविद्यालये, प्राथमिक शाळा या एकता दौड मध्ये सहभागी झालेहोते. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार  यांच्या मार्गदर्शखाली वाहतूक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. आय कॉलेज च्या राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा, श्री नारायणदास रामदास ट्रस्टचे अध्यक्ष मुकुंद शहा, रिपब्लिकन पार्टी युथ फोर्सचे अध्यक्ष संजय सोनवणे, भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख माऊली वाघमोडे, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे तज्ज्ञ संचालक मंगेश पाटील, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्राचार्य डॉ. प्रवीण नेमाडे, प्रा. भरत भुजबळ, व सामाजिक कार्यकर्तेे पदाधिकारी उपस्थित होते.इंदापूर तालुक्यातील मुलींनी ललित बाबर हिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, देशासाठी पदके मिळवावीत. संपूर्ण राज्याचे सामाजिक स्वास्थ बिघडले आहे. त्या धर्तीवर इंदापूर तालुक्यातील वातावरण अस्थिर होऊ नये, म्हणूनच एकता दौडीचे आयोजन केले आहे. यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित पाहून मनस्वी आनंद होत आहे.’’- हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्रीमैदानी खेळांमध्ये यशस्वी ठरण्यासाठी ग्रामीण भाग हा मुला - मुलींना वरदान ठरत आहे. याचाच फायदा घेत इंदापूर तालुक्यातील खेळांडूनी मेहनत घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे. यासाठी पालकांनी मुलांना खेळण्याचे स्वातंत्र्य द्यावे व शिक्षणाची संधी निर्माण करून द्यावे. मी स्वत: सुवर्णपदक मिळविण्यासाठी दहा वर्षे घरा बाहेर राहून कष्ट केले आहेत.’’- ललिता बाबर

टॅग्स :Puneपुणेjanata chowkजनता चौक