शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

‘ती’च्या अस्तित्वासाठीही व्हावेत प्रयत्न - अ‍ॅड. वैशाली चांदणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:00 IST

स्त्री ही केवळ उपभोगाची स्वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. त्यातूनच स्त्री सुरक्षित होऊ शकते. केवळ मुले नाही तर मुलीदेखील वंशाचा दिवा आहेत.

स्त्री ही केवळ उपभोगाची स्वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. त्यातूनच स्त्री सुरक्षित होऊ शकते. केवळ मुले नाही तर मुलीदेखील वंशाचा दिवा आहेत. तिला सक्षम करण्यासाठी तसेच तिचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी पालकांनी सर्व ते प्रयत्न केल्यास महिलांनादेखील समाजात मानाचे स्थान मिळू शकेल, असा विश्वास दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.गुलामगिरीचे जीवन जगत असलेल्या महिलांसाठी घराचा उंबरठा ओलांडून मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यामुळे पुणे शिक्षणाचे माहेर ठरले असून शिक्षणाच्याबाबत अनेक अनोखे उपक्रम या ठिकाणी झाले आहेत. शिक्षणाची दारे खुली करून तिला तिचे अस्तित्व निर्माण करण्याची संधी सावित्रीबार्इंनी दिली. मात्र आजही महिलांना समाजात सन्मानाचे स्थान नाही. समाजाचे सोडा घरातदेखील तिला दुय्यम दर्जा दिला जातो. घरात धार्मिक कार्यक्रम असतील, तर त्याची सर्व तयारी महिलांना करावी लागते.स्वयंपाकापासून पाहुण्यांचे आदरातिथ्य ठेवण्याची जबाबदारी ती पार पाडते. मात्र पूजेचे ताट हे कुटुंबातील पुरुषांच्याच हाती असते. पण ‘लोकमत’च्या तीचा गणपतीमध्ये गेली सहा वर्षे पूजेचे ताट हे तिच्या हाती आहे, हा खूप चांगला उपक्रम आहे. त्यातून समाजाचे परिवर्तन घडणार आहे. कुटुंबातील महिलेमुळे मी समाजात काही तरी करू शकलो, अशी भावना या उपक्रमाच्या माध्यमातून पुरुषांच्या मनात निर्माण होणार आहे. शोषित आणि पीडित महिलांच्या प्रश्नांवर व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम लोकमत करीत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. शिवाजीमहाराजांच्या मागे जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या मागे माता रमाबाई, तर महात्मा फुले यांना सावित्रीबाई फुले यांचा पाठिंबा होता.समाजात एवढे परिवर्तन होत असतानाही महिला सुरक्षित नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीपासून ७० वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे समोर येते. या घटना ऐकून मनाचा थरकाप होत असून अत्याचार करणाऱ्यांविषयी प्रचंड चीड निर्माण होत आहे. समाजाला दिशा देणारे शिक्षणदेखील त्याला अपवाद राहिले नाही. त्यातून पुरुषांची मानसिकता आणि स्त्रीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे अधोरेखांकित होते. हे सर्व बदलण्यासाठी आणि महिलांना अधिक सुरक्षित करण्यासाठी या मानसिकतेत आणि पुरुषांच्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे.स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. या बदलाची सुरुवात प्रत्येकाच्या घरातून व्हावी. मुलांवर लहानपणापासूनच तसे संस्कार झाले तर महिला नक्कीच सुरक्षित होईल. केवळ मुलगाच नव्हे, तर मुलगीदेखील वंशाचा दिवा आहे, असा विचार पसरायला हवा. ग्रामीण भागात असा बदल रुजवणे गरजेचे आहे. परक्याचे धन म्हणून तिच्यावर होणारे अन्याय थांबायला हवेत. हुंड्यासाठी तिला जाळले जाते, विहिरीत ढकलले जाते, तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले जाते, अशी स्थिती आहे. या सर्व पीडित महिला ‘लोकमत’च्या तीच्या गणपतीपासून प्रेरणा घेतील आणि आम्ही अबला नसून सबला आहोत, असे दाखवून देऊ शकतील. ‘लोकमत’च्या माध्यमातून मला या चळवळीमध्ये सामील होता आले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या उपक्रमाबद्दल ऐकले आहे, अनुभवले आहे. तीचा गणपती या उपक्रमामध्ये सर्व महिला हातात हात घालून काम करीत आहेत, सर्व जबाबदाºया समर्थपणे पेलत आहेत. एकमेकींना पाठिंबा देऊन एकमेकींची शक्ती बनत आहेत. महिलांनी एखादे विधायक कार्य करायचे ठरवल्यास काय होऊ शकते, याचे सकारात्मक आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच ‘लोकमत’तर्फे आयोजित तीचा गणपती हा उपक्रम आहे.

टॅग्स :Womenमहिलाnewsबातम्या