शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’च्या अस्तित्वासाठीही व्हावेत प्रयत्न - अ‍ॅड. वैशाली चांदणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:00 IST

स्त्री ही केवळ उपभोगाची स्वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. त्यातूनच स्त्री सुरक्षित होऊ शकते. केवळ मुले नाही तर मुलीदेखील वंशाचा दिवा आहेत.

स्त्री ही केवळ उपभोगाची स्वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. त्यातूनच स्त्री सुरक्षित होऊ शकते. केवळ मुले नाही तर मुलीदेखील वंशाचा दिवा आहेत. तिला सक्षम करण्यासाठी तसेच तिचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी पालकांनी सर्व ते प्रयत्न केल्यास महिलांनादेखील समाजात मानाचे स्थान मिळू शकेल, असा विश्वास दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.गुलामगिरीचे जीवन जगत असलेल्या महिलांसाठी घराचा उंबरठा ओलांडून मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यामुळे पुणे शिक्षणाचे माहेर ठरले असून शिक्षणाच्याबाबत अनेक अनोखे उपक्रम या ठिकाणी झाले आहेत. शिक्षणाची दारे खुली करून तिला तिचे अस्तित्व निर्माण करण्याची संधी सावित्रीबार्इंनी दिली. मात्र आजही महिलांना समाजात सन्मानाचे स्थान नाही. समाजाचे सोडा घरातदेखील तिला दुय्यम दर्जा दिला जातो. घरात धार्मिक कार्यक्रम असतील, तर त्याची सर्व तयारी महिलांना करावी लागते.स्वयंपाकापासून पाहुण्यांचे आदरातिथ्य ठेवण्याची जबाबदारी ती पार पाडते. मात्र पूजेचे ताट हे कुटुंबातील पुरुषांच्याच हाती असते. पण ‘लोकमत’च्या तीचा गणपतीमध्ये गेली सहा वर्षे पूजेचे ताट हे तिच्या हाती आहे, हा खूप चांगला उपक्रम आहे. त्यातून समाजाचे परिवर्तन घडणार आहे. कुटुंबातील महिलेमुळे मी समाजात काही तरी करू शकलो, अशी भावना या उपक्रमाच्या माध्यमातून पुरुषांच्या मनात निर्माण होणार आहे. शोषित आणि पीडित महिलांच्या प्रश्नांवर व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम लोकमत करीत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. शिवाजीमहाराजांच्या मागे जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या मागे माता रमाबाई, तर महात्मा फुले यांना सावित्रीबाई फुले यांचा पाठिंबा होता.समाजात एवढे परिवर्तन होत असतानाही महिला सुरक्षित नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीपासून ७० वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे समोर येते. या घटना ऐकून मनाचा थरकाप होत असून अत्याचार करणाऱ्यांविषयी प्रचंड चीड निर्माण होत आहे. समाजाला दिशा देणारे शिक्षणदेखील त्याला अपवाद राहिले नाही. त्यातून पुरुषांची मानसिकता आणि स्त्रीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे अधोरेखांकित होते. हे सर्व बदलण्यासाठी आणि महिलांना अधिक सुरक्षित करण्यासाठी या मानसिकतेत आणि पुरुषांच्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे.स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे, अशी भावना बदलून ती आपली बहीण किंवा माता आहे, असा विचार करावा. या बदलाची सुरुवात प्रत्येकाच्या घरातून व्हावी. मुलांवर लहानपणापासूनच तसे संस्कार झाले तर महिला नक्कीच सुरक्षित होईल. केवळ मुलगाच नव्हे, तर मुलगीदेखील वंशाचा दिवा आहे, असा विचार पसरायला हवा. ग्रामीण भागात असा बदल रुजवणे गरजेचे आहे. परक्याचे धन म्हणून तिच्यावर होणारे अन्याय थांबायला हवेत. हुंड्यासाठी तिला जाळले जाते, विहिरीत ढकलले जाते, तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले जाते, अशी स्थिती आहे. या सर्व पीडित महिला ‘लोकमत’च्या तीच्या गणपतीपासून प्रेरणा घेतील आणि आम्ही अबला नसून सबला आहोत, असे दाखवून देऊ शकतील. ‘लोकमत’च्या माध्यमातून मला या चळवळीमध्ये सामील होता आले आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या उपक्रमाबद्दल ऐकले आहे, अनुभवले आहे. तीचा गणपती या उपक्रमामध्ये सर्व महिला हातात हात घालून काम करीत आहेत, सर्व जबाबदाºया समर्थपणे पेलत आहेत. एकमेकींना पाठिंबा देऊन एकमेकींची शक्ती बनत आहेत. महिलांनी एखादे विधायक कार्य करायचे ठरवल्यास काय होऊ शकते, याचे सकारात्मक आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच ‘लोकमत’तर्फे आयोजित तीचा गणपती हा उपक्रम आहे.

टॅग्स :Womenमहिलाnewsबातम्या