शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

विकासकामांसाठी ग्रामपंचायतींस आवश्यक निधी देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST

गराडे : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पुरंदर तालुक्यात शिवसेनेला भरघोस यश मिळाले आहे. ग्रामपंचायतीच्या विकासासाठी जो निधी लागेल ...

गराडे : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पुरंदर तालुक्यात शिवसेनेला भरघोस यश मिळाले आहे. ग्रामपंचायतीच्या विकासासाठी जो निधी लागेल तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे विकासाची कामे कोणत्याही प्रकारे थांबणार नाहीत, असे प्रतिपादन माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

गराडे (ता. पुरंदर) येथे गराडे, सोमुर्डी, भिवरी, थापे-वारवडी या ग्रामपंचायतींतील नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शिवतारे बोलत होते.

या वेळी पुरंदर पं. समिती माजी सभापती अतुल म्हस्के, माजी उपसभापती दत्ताशेठ काळे, उद्योजक राजेंद्र झेंडे, राजेंद्र काळे, विजय ढोणे, संदीप कटके, दिलीप कटके, नीलेश जगदाळे,रोहित खवले, संजय जगदाळे, बाळासाहेब दुरकर , शिवाजी जगदाळे, सुरेश जगदाळे बाळासाहेब रावडे,संजय रावडे,बाळासाहेब यादव उपस्थित होते.

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य समीर तरवडे, स्वप्नाली जगदाळे, सुजाता कुंभार, नवनाथ गायकवाड, गीतांजली ढोणे, ललिता जगदाळे, नितीन जगदाळे, सुप्रिया रावडे, अजित दुरकर, अनिता जगदाळे व हरिश्चंद्र वाडकर यांचा गावच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बाबाराजे जाधवराव म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक राजकीय कार्यकर्ते घडत असतात. खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतमधून कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी निर्माण होत असते. त्याच दृष्टिकोनातून गराडे गावचे सुपुत्र गंगाराम जगदाळे हेदेखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढे आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी देखील आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, ती विश्वासपूर्वक पार पाडावी.

या वेळी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन उत्तमराव जगदाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद सदस्य व कात्रज दूध संघाचे संचालक गंगाराम जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संजय गावडे यांनी केले, तर सूत्रसंचालन योगेश जगदाळे यांनी केले.

विमानतळ पुरंदरमध्येच व्हायला हवे...

विमानतळासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पुढील दिशा ठरवली पाहिजे व विमानतळ हे पुरंदरमध्येच झाले पाहिजे. त्यामुळे रोजगाराच्या संधी पुरंदरमध्ये उपलब्ध होतील. विमानतळ जर पुढे पंधरा किलोमीटर हलवले तर त्याचा फायदा बारामतीला होईल. त्यामुळे विमानतळ हे पारगाव वगळता त्याच ठिकाणी करण्यात यावे, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.

२८ गराडे

नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित असलेले विजय शिवतारे, बाबाराजे जाधवराव, गंगाराम जगदाळे व इतर.