शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी - रवींद्र धारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:16 IST

पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात.

पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. मात्र, त्यातील किती झाडांची जोपासना केली जाते, ही विचार करण्याजोगी बाब आहे. स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते. कोणतीही योजना राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो, असे मत वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ १९ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. त्यापैकी घनदाट जंगल केवळ ७-८ टक्के भूभागावर आहे. पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या सध्या आपल्यासमोर ‘आ’वासून उभी आहे. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना पर्यावरणाचे नुकसान दुर्लक्षित करून चालणार नाही. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. मात्र, त्यातील किती झाडांची जोपासना केली जाते, ही विचार करण्याजोगी बाब आहे. सामाजिक, तसेच स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास शासनाच्या योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते.कोणतीही योजना राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. ग्रामीण भागात काम करताना तेथील नागरिकांच्या गरजा, अनुभव यानुसार कामाचे नियोजन करता येते. वृक्षारोपणाच्या उपक्रमामध्ये स्थानिकांवर झाडांच्या देखभालीची जबाबदारी सोपवल्यास योजना यशस्वी होण्यास मदत होईल. प्लॅस्टिकची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यादृष्टीने शासनाने केलेली प्लॅस्टिकबंदी योग्य आहे, असे वाटते. मात्र, प्लॅस्टिकला ठोस पर्याय निर्माण व्हायला हवेत.मोहन धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई मार्गक्रमण करीत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षारोपण, मुलींसाठी स्वच्छतागृहे, जलशुद्धीकरण यंत्रे, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आदी माध्यमांतून कार्य सुरू ठेवले आहे. महाराष्ट्रातील शाळा, वनविभागाच्या जागेचा परिसर आणि ‘हरित वारी’ उपक्रमांतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निर्धार वनराई संस्थेच्यावतीने करण्यात आला आहे. संस्थेच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून डॉ. मोहन धारिया वृक्षारोपण व संवर्धन अभियान राज्यभरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली. पिंपळाचे वृक्षारोपण करून या अभियानाला सुरुवात होणार आहे. अभियानाद्वारे कडुनिंब, चिंच, जांभूळ, आपटा, उंबर, वड, पिंपळ अशा देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पुढील तीन वर्षे रोपांचे संवर्धनदेखील नित्यनियमाने केले जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही या अभियानामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभाग घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना कोणत्याही एका किंवा अनेक वृक्षांचे पालकत्व स्वीकारावे लागेल अथवा वृक्षदान करावे लागणार आहे. वनराईतर्फे पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विषमुक्त व सुरक्षित अन्नविषयक माहितीपर दालन, रानभाज्यांची ओळख, शहर शेती, पर्यावरण व शेतीविषयक दुर्मिळ व नामांकित वाचनसाहित्य, मृदा-जलसंवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग दालने असणार आहेत. याद्वारे नागरिकांना कृतिपर विषय समजावले जाऊन त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण करण्याचे कार्य या प्रदर्शनाद्वारे होईल, असा विश्वास धारिया यांनी व्यक्त केला. निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे, तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी प्रदर्शनात रानभाज्यांची ओळख, मृदा-जलसंवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग दालन याद्वारे नागरिकांना कृतिपर विषयातून त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या