शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी - रवींद्र धारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:16 IST

पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात.

पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. मात्र, त्यातील किती झाडांची जोपासना केली जाते, ही विचार करण्याजोगी बाब आहे. स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते. कोणतीही योजना राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो, असे मत वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ १९ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. त्यापैकी घनदाट जंगल केवळ ७-८ टक्के भूभागावर आहे. पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या सध्या आपल्यासमोर ‘आ’वासून उभी आहे. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना पर्यावरणाचे नुकसान दुर्लक्षित करून चालणार नाही. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. मात्र, त्यातील किती झाडांची जोपासना केली जाते, ही विचार करण्याजोगी बाब आहे. सामाजिक, तसेच स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास शासनाच्या योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते.कोणतीही योजना राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. ग्रामीण भागात काम करताना तेथील नागरिकांच्या गरजा, अनुभव यानुसार कामाचे नियोजन करता येते. वृक्षारोपणाच्या उपक्रमामध्ये स्थानिकांवर झाडांच्या देखभालीची जबाबदारी सोपवल्यास योजना यशस्वी होण्यास मदत होईल. प्लॅस्टिकची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यादृष्टीने शासनाने केलेली प्लॅस्टिकबंदी योग्य आहे, असे वाटते. मात्र, प्लॅस्टिकला ठोस पर्याय निर्माण व्हायला हवेत.मोहन धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई मार्गक्रमण करीत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षारोपण, मुलींसाठी स्वच्छतागृहे, जलशुद्धीकरण यंत्रे, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आदी माध्यमांतून कार्य सुरू ठेवले आहे. महाराष्ट्रातील शाळा, वनविभागाच्या जागेचा परिसर आणि ‘हरित वारी’ उपक्रमांतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निर्धार वनराई संस्थेच्यावतीने करण्यात आला आहे. संस्थेच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून डॉ. मोहन धारिया वृक्षारोपण व संवर्धन अभियान राज्यभरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली. पिंपळाचे वृक्षारोपण करून या अभियानाला सुरुवात होणार आहे. अभियानाद्वारे कडुनिंब, चिंच, जांभूळ, आपटा, उंबर, वड, पिंपळ अशा देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पुढील तीन वर्षे रोपांचे संवर्धनदेखील नित्यनियमाने केले जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही या अभियानामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभाग घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना कोणत्याही एका किंवा अनेक वृक्षांचे पालकत्व स्वीकारावे लागेल अथवा वृक्षदान करावे लागणार आहे. वनराईतर्फे पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विषमुक्त व सुरक्षित अन्नविषयक माहितीपर दालन, रानभाज्यांची ओळख, शहर शेती, पर्यावरण व शेतीविषयक दुर्मिळ व नामांकित वाचनसाहित्य, मृदा-जलसंवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग दालने असणार आहेत. याद्वारे नागरिकांना कृतिपर विषय समजावले जाऊन त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण करण्याचे कार्य या प्रदर्शनाद्वारे होईल, असा विश्वास धारिया यांनी व्यक्त केला. निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे, तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी प्रदर्शनात रानभाज्यांची ओळख, मृदा-जलसंवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग दालन याद्वारे नागरिकांना कृतिपर विषयातून त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या