शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी - रवींद्र धारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:16 IST

पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात.

पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या ‘आ’वासून उभी आहे. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. मात्र, त्यातील किती झाडांची जोपासना केली जाते, ही विचार करण्याजोगी बाब आहे. स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते. कोणतीही योजना राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो, असे मत वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ १९ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. त्यापैकी घनदाट जंगल केवळ ७-८ टक्के भूभागावर आहे. पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ºहास ही समस्या सध्या आपल्यासमोर ‘आ’वासून उभी आहे. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना पर्यावरणाचे नुकसान दुर्लक्षित करून चालणार नाही. पर्यावरणसंवर्धनासाठी वृक्षारोपण आणि झाडांची देखभाल अत्यंत आवश्यक आहे. शासनातर्फे पर्यावरणसंवर्धनासाठी विविध योजना जाहीर केल्या जातात, दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात. मात्र, त्यातील किती झाडांची जोपासना केली जाते, ही विचार करण्याजोगी बाब आहे. सामाजिक, तसेच स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास शासनाच्या योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते.कोणतीही योजना राबविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. ग्रामीण भागात काम करताना तेथील नागरिकांच्या गरजा, अनुभव यानुसार कामाचे नियोजन करता येते. वृक्षारोपणाच्या उपक्रमामध्ये स्थानिकांवर झाडांच्या देखभालीची जबाबदारी सोपवल्यास योजना यशस्वी होण्यास मदत होईल. प्लॅस्टिकची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यादृष्टीने शासनाने केलेली प्लॅस्टिकबंदी योग्य आहे, असे वाटते. मात्र, प्लॅस्टिकला ठोस पर्याय निर्माण व्हायला हवेत.मोहन धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई मार्गक्रमण करीत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षारोपण, मुलींसाठी स्वच्छतागृहे, जलशुद्धीकरण यंत्रे, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आदी माध्यमांतून कार्य सुरू ठेवले आहे. महाराष्ट्रातील शाळा, वनविभागाच्या जागेचा परिसर आणि ‘हरित वारी’ उपक्रमांतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निर्धार वनराई संस्थेच्यावतीने करण्यात आला आहे. संस्थेच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून डॉ. मोहन धारिया वृक्षारोपण व संवर्धन अभियान राज्यभरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली. पिंपळाचे वृक्षारोपण करून या अभियानाला सुरुवात होणार आहे. अभियानाद्वारे कडुनिंब, चिंच, जांभूळ, आपटा, उंबर, वड, पिंपळ अशा देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. पुढील तीन वर्षे रोपांचे संवर्धनदेखील नित्यनियमाने केले जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही या अभियानामध्ये स्वयंसेवक म्हणून सहभाग घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना कोणत्याही एका किंवा अनेक वृक्षांचे पालकत्व स्वीकारावे लागेल अथवा वृक्षदान करावे लागणार आहे. वनराईतर्फे पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विषमुक्त व सुरक्षित अन्नविषयक माहितीपर दालन, रानभाज्यांची ओळख, शहर शेती, पर्यावरण व शेतीविषयक दुर्मिळ व नामांकित वाचनसाहित्य, मृदा-जलसंवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग दालने असणार आहेत. याद्वारे नागरिकांना कृतिपर विषय समजावले जाऊन त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण करण्याचे कार्य या प्रदर्शनाद्वारे होईल, असा विश्वास धारिया यांनी व्यक्त केला. निसर्ग जाणून स्वत:चेच नव्हे, तर देशाचे आणि जगाचे भविष्य वाचविण्यासाठी प्रदर्शनात रानभाज्यांची ओळख, मृदा-जलसंवर्धन विभाग, वन व जैवविविधता संवर्धन विभाग, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन विभाग, अपारंपरिक ऊर्जा विभाग दालन याद्वारे नागरिकांना कृतिपर विषयातून त्यांच्यामध्ये प्रबोधन निर्माण होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या