शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रगतीसाठी शि़क्षण हाच पर्याय : रश्मी शुक्ला; ‘मिशन परवाज’चे पुण्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 19:58 IST

मुले ही लहान वृक्ष आहेत त्यांना जर शिक्षणाचा योग्य मार्ग मिळाला तर ते नक्कीच मजबूत वृक्षप्रमाणे स्वत: च्या आयुष्यात प्रगती करतील आणि त्यासाठी पुणे शहर पोलीस व मिशन परवाज मदत करेल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

ठळक मुद्देमिशन परवाजच्या वतीने प्रशिक्षण देऊन दाखवणार उत्तम मार्ग : रश्मी शुक्लाशिक्षणामुळे आपले ज्ञान, कौशल्य या बरोबरच बुद्धिमत्ता वाढते : रवींद्र सेनगावकार

पुणे : वृक्षाची वाढ उत्तम होण्यासाठी त्याची लहान असताना काळजी घ्यावी लागते पण ते मोठे झाले की मजबूत होते. त्याचप्रमाणे मुले ही लहान वृक्ष आहेत त्यांना जर शिक्षणाचा योग्य मार्ग मिळाला तर ते नक्कीच मजबूत वृक्षप्रमाणे स्वत: च्या आयुष्यात प्रगती करतील आणि त्यासाठी पुणे शहर पोलीस व मिशन परवाज मदत करेल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.  पुणे शहर पोलीस आयोजित मिशन परवाज उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. मिशन परवाज या मिशनद्वारे बेरोजगार मुसलमान मुलांना लेखी परीक्षा आणि मुलाखत कशी घ्यावी याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. या समारंभात पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, परिमंडळ २चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे, पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकार, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, पोलीस उपायुक्त संजय कुमार बाविस्कर, मौलाना काझमी, मौलाना इंद्रिस आदी उपस्थित होते. शुक्ला म्हणाल्या, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायलाच पाहिजे. त्यातून त्यांनाच फायदा होत आहे. पोलीस भरतीच्या वेळी मुले शारीरिकदृष्टया तर पास होतात परंतु लेखी परीक्षेत नापास होतात तर आपण त्यांच्या लेखी परीक्षेवर व इतर कमजोरीवर लक्ष देणे गरजेचे आहे. या मिशन परवाजच्या वतीने मुलांना व्यवस्थित प्रशिक्षण देऊन त्याना उत्तम मार्ग आम्ही दाखवणार आहोत. रवींद्र सेनगावकार म्हणाले, मिशन परवाजमुळे आयुष्यात जेवढी मुले पुढे जातील तेवढी मुले नक्कीच देशासाठी काहीतरी करून दाखवतील. या मिशनच्या वतीने तरुण मुलांना एक संदेश देणार आहे की त्यांनी व्यसनापासून दूर राहावे आणि आपले जास्तीत जास्त लक्ष शिक्षणाकडे दयावे. शिक्षणामुळे आपले ज्ञान, कौशल्य या बरोबरच बुद्धिमत्ता वाढते व विचारही बदलतात. आपले विचार उत्तम असतील तर प्रगती निश्चितच होते.समारंभाचे प्रास्तविक बसवराज तेली आणि आभारप्रदर्शन बाजीराव मोहिते यांनी केले.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPuneपुणे