शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पहिली, आठवीचा अभ्यासक्रम बदलला : घोकंपट्टीला फाटा देऊन कृतिशील शिक्षणावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 02:40 IST

उन्हाळी सुटीनंतर आज सर्वत्र शाळा सुरू झाल्या. नवी शाळा, नवे मित्र याचबरोबर बदललेल्या दहावीच्या अभ्यासक्रमासह पहिली व आठवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा नव्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागणार आहे.

डिंभे - उन्हाळी सुटीनंतर आज सर्वत्र शाळा सुरू झाल्या. नवी शाळा, नवे मित्र याचबरोबर बदललेल्या दहावीच्या अभ्यासक्रमासह पहिली व आठवीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा नव्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागणार आहे. घोकंपट्टीला फाटा देऊन प्रत्येक विषयाच्या पुस्तकातील ज्ञान व्यावहारिक जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न नवीन अभ्यासक्रमात केला आहे. व्यवसायाभिमुख आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य, आकलनकेंद्रित संकल्पनेवरील धडे विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमात शिकायला मिळणार असून, घोकंपट्टीला फाटा देऊन कृतिशील शिक्षणावर नवीन अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे.उन्हाळ्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षासह यंदा दहावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच पहिली व आठवीच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. या अभ्यासक्रमातील बदलाबरोबरच परीक्षा पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. गणित आणि विज्ञान वगळता सर्व विषयांची परीक्षा १०० गुणांची होणार आहे. त्यामुळे शाळांकडून अंतर्गत मूल्यमापनामध्ये मिळणारी गुणांची बरसात अता थांबेल. त्यामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांचा खºया अर्थाने कस लागेल. भाषा विषयांबरोबरच गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांच्या प्रश्नपत्रिकांची जागा आता कृतिपत्रिका घेणार आहेत. त्याअनुषंगाने अभ्यासक्रमाध्येही योग्य बदल झाले असून, येथून पुढे १०० गुणांची परीक्षा घेतली जाईल. केवळ विज्ञानासाठीच प्रात्यक्षिक परीक्षा असेल; त्यामुळे इतर विषयांना अंतर्गत मूल्यमापणातून मिळणारे २० गुण बंद होतील. सामाजिक शास्त्रांची १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल. यामध्ये ६० गुण हे इतिहास, राज्यशास्त्र यासाठी आणि ४० गुण भूगोलासाठी, अशी विभागणी करण्यात आली आहे.दहावीच्या अभ्यासक्रमात कृतिशील, सर्जनशील, वैचारिक, उपयोजित ज्ञानावर भर देण्यात आला असून, आकलन आणि उपयोजन पद्धतीला अधिक महत्त्व दिले आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीवाढीस चालना मिळणार आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार बदलत्या काळाचा विचार करून शैक्षणिक धोरणानुसार अभ्याक्रमात बदल केले जात आहेत.मागील वर्षी सातवी व नववीच्या वर्गाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाली. यंदा पहिली, आठवी व दहावीच्या अभ्यासक्रमांत बदल झाला. पुढील वर्षी दुसरी, तिसरी व अकरावीच्या अभ्यासक्रमांत बदल होणार आहेत.विद्यार्थी स्पर्धेतकमी पडू नयेत, स्वयंअध्ययनाचीकौशल्ये विकसित करण्याचे प्रयत्न नव्या अभ्यासक्रमात केले आहेत. पाठांतर करून घेण्याऐवजी अता शिक्षकांना खºया अर्थाने मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.शाळा सुरू होताच, पहिल्याच दिवसी विद्यार्थ्यांच्या हातात बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके पडली. नवीन वर्षे, नवीन शाळा याचबरोबर बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके हातात पडताच मुलांना कुतूहलाने या पुस्तकामध्ये नवीन काय आहे, हे शोधण्याचा मोह आवरला नाही.

टॅग्स :educationशैक्षणिकPuneपुणे