शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

समान पाणीपुरवठा योजनेला लागणार निवडणुकीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 01:28 IST

२४ तास पाणी अवघडच : वाहतूककोंडीच्या धास्तीने खोदाईला परवानगी देण्यास टाळाटाळ

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : महापालिकेच्या बहुचर्चित २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजनेसाठी शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई करावी लागणार आहे. सध्या शहरहात जोरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यात जलवाहिन्यांसाठी पुन्हा रस्ते खोदाई सुरू केल्यास संपूर्ण शहरात वाहतुक कोंडीचा पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

जलवाहिन्यांचे पहिल्या टप्प्यातील सुमारे २५० किलोमीटरचे काम पूर्ण होण्यासाठी किमान आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागले. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूककोंडी होऊन नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याच्या धास्तीने सत्ताधारी रस्ते खोदाईला परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहेत. परंतु याचा फार मोठा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण सध्या मेट्रोसाठी खोदाई सुरू असून, अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात जर या योजनेसाठी रस्ते खोदाईला मंजुरी दिली, तर मात्र शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही योजना लटकलेलीच आहे.तब्बल १६०० किलोमीटरहून अधिक खोदाई करावी लागणार1 शहरासाठी २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी संपूर्ण शहरात जलवाहिन्या टाकण्यासाठी तब्बल १६०० किलोमीटरपेक्षा अधिक प्रमाणात रस्ते खोदाई करावी लागणार आहे.2यामध्ये पहिल्या टप्प्यात तातडीने २५० किलोमीटर रस्ते खोदाई करण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने पथविभागाला दिला आहे.धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणारकिलोमीटरपेक्षा अधिक शहरामधील रस्ते खोदाई करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो. यामुळे पथविभागाकडून हा प्रस्ताव आयुक्त आणि पक्षनेत्यांकडे पाठवला आहे. पाण्याच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी अधिक रुंदीचे रस्ते खोदावे लागणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणते रस्ते घ्यायचे, येथील वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु, एकाच वेळी शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाईचा निर्णय घेतल्यास शहरात वाहतूककोंडीचा पुरता बोजवारा उडणार आहे. त्यामुळे सध्या २४ बाय ७ समान पाणी पुरवठा योजनेसाठी रस्ते खोदाई करण्यासाठी परवानगी देण्यास सत्ताधाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. परंतु आता परवानगी दिली नाही तर कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून हाती घेतलेली महत्त्वाकांक्षी योजना रखडण्याची भीती व्यक्त होत असून, शहराला मोठा फटका बसू शकतो.दर वर्षी पाणीपट्टीत 15% वाढकर्जरोख्यांवर १५ कोटींच्या व्याजाचा भुर्दंडशहराच्या महत्वाकांक्षी समान पाणीपुरवठा (२४ बाय ७) योजनेसाठी पुणे महापालिकेला वर्षभरात १५ कोटी रुपये व्याजापोटी भरावे लागले आहेत़ योजनेचे काहीच काम झाले नसल्याने नाहक व्याज भरावे लागत आहे़ तीन हजार कोटींच्या या योजनेसाठी जून २०१७ मध्ये २ हजार २६४ कोटी रुपये कर्जाने उभारण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने जून २०१७ मध्ये परवानगी दिली होती़शहरामध्ये २४ बाय ७ समान पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल २४०० कोटी रुपयांचे कर्ज काढून योजना हाती घेण्यात आली आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पुणेकरांकडून पाणीपट्टीदेखील वाढवून घेतली जात आहे. परंतु आता रस्ते खोदाईसाठी परवानगी देताना शहरात होणारी वाहतूककोंडी, त्यावर तोडगा, योजनेचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत कोणतेही नियोजन सत्ताधाºयांकडे नाही. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरावर ओढवलेल्या पाणीकपातीसह सर्वच कामांचा बोजवारा उडाला आहे. - दिलीप बराटे, विरोधीपक्ष नेते, महापालिका

टॅग्स :Puneपुणे