शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

सांस्कृतिक पुरस्कारांना ‘ग्रहण’; पुणे महापालिकेचे ८ पुरस्कार रखडले, अध्यादेशाचा सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 11:54 IST

सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या पुणे शहरातील सांस्कृतिक पुरस्कारांनाच सध्या ‘ग्रहण’ लागले आहे. गेल्या दोन महिन्यात महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारे तब्बल आठ पुरस्कार रखडले आहेत.

ठळक मुद्देमहोत्सवांवरील उधळपट्टी रोखण्याऐवजी पुणे महापालिकेने थांबवले पुरस्कारमहापौरांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत पाठपुरावा करावा, होत आहे मागणी

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या पुणे शहरातील सांस्कृतिक पुरस्कारांनाच सध्या ‘ग्रहण’ लागले आहे. गेल्या दोन महिन्यात महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारे तब्बल आठ पुरस्कार रखडले आहेत. राज्यातील एका महापालिकेच्या संदर्भात न्यायालयाने सांस्कृतिक महोत्सवांवर होणारी उधळपट्टी रोखावी, या निकालाचा संदर्भ देत राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. महोत्सवांवरील उधळपट्टी रोखण्याऐवजी पुणे महापालिकेने पुरस्कारच थांबवले आहेत. पालिकेला अध्यादेशाचा अर्थच कळलेला नाही, अशा शब्दांत सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापौरांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी केली जात आहे.शहराला अनेक वर्षांपासूनची समृद्ध सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. बालगंधर्व, पं. भीमसेन जोशी, पंडिता रोहिणी भाटे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी कलेच्या साधनेतून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेतर्फे वर्षभरात विविध पुरस्कारांचे वितरण केले जाते. यामध्ये बालगंधर्व, स्वरभास्कर, पठ्ठे बापूराव, संत जगनादे महाराज, बसवेश्वर, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा विविध ११ पुरस्कारांचा समावेश आहे. यासाठी पालिकेतर्फे पुरस्कार समिती नेमून सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. यातील मुख्य पुरस्कार १,११,००० रुपये, तर इतर पुरस्कार २१,००० तसेच ५१,००० अशा स्वरुपाचे असतात. अर्थसंकल्पामध्ये पुरस्कारांच्या रकमेची तरतूदही केलेली असते.राज्य सरकारने पंधरा दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व महापालिकांना न्यायालयाचा यासंबंधीचा आदेश पाठवला आहे. पदाधिकारी व प्रशासनाने या पत्राची माहितीच बाहेर येऊ दिली नाही. फक्त पुरस्कारांचे कार्यक्रम मात्र थांबवण्यात आले. मीरा भार्इंदर महापालिकेने प्रभागनिहाय आयोजिलेल्या महोत्सवाबाबत हा निकाल आहे. राज्य सरकारनेच ही उधळपट्टी थांबवावी व महापालिकांना निर्देश द्यावेत, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या आदेशाची प्रत सोबत जोडून सरकारने सर्व महापालिकांना महोत्सव थांबवावेत, असे कळवले आहे. समान पाणी योजना व निविदांवरून सातत्याने आरोप करणारे विरोधक व त्याचा प्रतिवाद करणारे सत्ताधारीही सांस्कृतिक क्षेत्रावर आक्रमण करणाऱ्या या आदेशाबाबत गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुरस्कार समितीवर सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची नियुक्ती न होणे, अनियोजित बैठका, नियोजनाचा अभाव, पुरस्कार वितरणास होणारा विलंब यामुळे आधीच महानगरपालिका टीकेच्या गर्तेत सापडली आहे. त्यातच राज्य सरकारच्या अध्यादेशाचा चुकीचा संदर्भ लावत आता महानगरपालिकेतर्फे पुरस्कारांवरच निर्बंध घालण्यात आले आहेत. एखादा पुरस्कार हा संबंधित क्षेत्रातील व्यक्तीचा गौरव असतो, पुरस्काराचे मानधन ही उधळपट्टी ठरत नाही. त्यामुळे याबाबत पालिकेतर्फे ताबडतोब निर्णय घेऊन पुरस्कारांवरील निर्बंध उठवण्याची मागणी जोर धरत आहे.

न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशात सांस्कृतिक महोत्सवांवरील उधळपट्टी थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेने मात्र पुरस्कारच थांबवले आहेत. अध्यादेशाचा अर्थच महापालिकेला समजलेला नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. महानगरपालिकेने पुढाकार घेतल्यास शहरातील नाट्य, साहित्य संस्था याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास तयार आहेत.- सुनील महाजन

पुणे महापालिकेला दीडशे वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा आहे. पालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांवर निर्बंध म्हणजे उधळपट्टी म्हणता येणार नाही. महानगरपालिकेला आर्थिक अडचण असल्यास सार्वजनिक संस्था, मंडळे आदींकडे पुरस्कारांची जबाबदारी सोपवावी.- आबा बागूल, नगरसेवक

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAba Bagulआबा बागुलPuneपुणे