शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आंबा खा, पण जरा जपून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 17:13 IST

सगळेच आंबे हे नैसर्गिकरित्या पिकलेले नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आंबे पिकविण्यासाठी रासायनिक पदार्थांचाही वापर केला जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देवाढत्या उकाड्यामुळे ‘आंबा खा, पण जरा जपून’ असे सांगण्याची वेळ

पुणे : उन्हाळयाचे दिवस आणि आंबा यांची गट्टी जमलेली दिसते. पिवळेधम्म आंबे साहजिकच आपले लक्ष वेधून घेतात. आंब्याची अवीट गोडी नाकारणे केवळ अवघडच. मात्र, वाढत्या उकाड्यामुळे ‘आंबा खा, पण जरा जपून’ असे सांगण्याची वेळ आली आहे. सातत्याने आणि जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्याने पोटदुखी, शरीतातील उष्णतेच्या प्रमाणात वाढ, जुलाब असे त्रास उद्भवत असल्याचे पाहायला मिळत आहे. आंबा उष्ण असतो आणि त्यातच मे महिन्यामधील तापमानवाढ या दोहोंचा एकत्रित परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे उष्णतेचा पटकन त्रास होत असेल तर जपून आंबे खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.सगळेच आंबे हे नैसर्गिकरित्या पिकलेले नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आंबे पिकविण्यासाठी रासायनिक पदार्थांचाही वापर केला जाण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आंबे संतुलित प्रमाणात खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांंनी दिला आहे. आंब्याचा हंगाम सुरु असताना समोर आलेल्या फोडीला नकार देणे अवघड ठरते. पण तत्पूर्वी आपण या फळाबाबतचे समर्थक व विरोधी असे दोन्ही मुद्दे समजून घेणे आवश्यक असते.आंब्यामध्ये फायबर, बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन सी, लोह आदी घटक असतात.  इतर फळांप्रमाणे त्यात ग्लुकोज व फ्रुक्टोज असते व ग्लुकोजचे प्रमाण किंचित अधिक असते. नियमित व्यायाम करणा-यांनी क्वचित आंबा खाल्ल्यास तितकासा त्रास होत नाही. परंतु, वजन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्यांनी मात्र एक-दोन फोडींपेक्षा अधिक आंबा खाऊ नये. कोणतेही फळ दिवसातील दोन भोजनांपैकी एक म्हणून खाल्ल्यास सर्वोत्तम असते, कारण या फळातील साखर त्या भोजनानंतर शरीराकडून चरबीच्या रुपात साठवली जाण्याची शक्यता असते.आंब्यांमुळे शरीरात वाढलेली उष्णता या फोडांच्या स्वरुपात दिसते. लहान मुलांच्या बाबतीत आंब्याची अ‍ॅलर्जी लक्षात येत नाही. त्यामुळे तीन-चार वर्षांच्या लहानग्यांना भरपूर आंबे देऊ नका. एखाद्या वर्षी अनुभव आल्यानंतरच आंब्याचे प्रमाण ठरवा. आंबे द्यायचेच असले तर ते फ्रीजमध्ये गार करून द्यावेत. त्यामुळे त्यातील उष्णतेचा गुण जाणार नसला तरी थोडा कमी होतो. याशिवाय रोज एकापेक्षा अधिक आंबा खायला देऊ नये, असेही सांगण्यात येत आहे.------------मधुमेही लोकांनी साखरेच्या नियंत्रणासाठी आंब्याचे सेवन एखाद्या फोडीपुरते व तेही न्याहारीच्या वेळी करावे. आदर्श वजन गटात असलेल्या बालकांना दोन भोजनांमधील कालावधीत एक आंबा स्नॅक म्हणून देण्यास हरकत नसते. क्रीडा प्रशिक्षणाचा कसून सराव करणा-या प्रौढ व्यक्ती कर्बोदकप्रधान आहारावर असतील तर त्यांनी व्यायामानंतरचे भोजन (प्राधान्याने सकाळी) म्हणून आंबा खावा. 

टॅग्स :PuneपुणेMangoआंबाdoctorडॉक्टर