शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

e: धरणग्रस्थाचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST

धरणग्रस्तांचा एल्गार, धरणग्रस्तांचे तहसील कचेरीवर एल्गार आंदोलन मुळशी : मुळशी धरण विभाग विकास मंडळ यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एल्गार ...

धरणग्रस्तांचा एल्गार, धरणग्रस्तांचे तहसील कचेरीवर एल्गार आंदोलन

मुळशी : मुळशी धरण विभाग विकास मंडळ यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एल्गार आंदोलन करण्यात आले. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली १०० वर्षांपूर्वी सत्याग्रह झाला होता. त्या सत्याग्रहाला शतक पूर्ण होत असताना मुळशी धरणग्रस्तांच्या मूलभूत गरजा आजही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एल्गार आंदोलन केले.

त्यामध्ये हक्काचे घर, वीज, पाणी, रस्ते, वैद्यकीय सुविधा, शिक्षण, नोकऱ्या, एसटी थांबे, धरण जलाशयाच्या जवळील जमिनी ज्या शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिल्या होत्या, त्या पुन्हा कसण्यासाठी मिळाव्यात व त्या जमिनीवर फळबाग लागवडीस परवानगी मिळावी. सामाजिक बांधिलकीतून मिळणारा निधी सी.एस.आर. फंड फक्त धरण विभागातच खर्च करावा, जे आदिवासी बांधव जलाशयाजवळ राहतात, त्यांना घरकुलासाठी जमीन मिळावी, धरण विभागातील नागरिकांची वाहतूक करणाऱ्या कामगारांना जिल्हा परिषदेने व टाटा कंपनीने कायम नोकरी द्यावी व त्याचा पगार टाटा कंपनीने द्यावा, टाटा कंपनीने जलाशयाच्या बाजूला भिंत बांधते त्या ठिकाणी जलाशयावर जनावरांना पाणी पिण्यासाठी जायला रस्ते ठेवावे, टाटा कंपनी त्याची जमीन मोजत असून सदर जमिनीवर गावठाणसाठी जागा मिळावी व पुलाचे काम होईपर्यत मोजणी थांबवावी, जामगाव येथे टाटांच्या जागेत क्रीडांगणास जागा मिळावी, शेडणी फाटा येथे शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा मिळावी, ठरल्याप्रमाणे प्रत्येक गावात शिक्षक निवास बांधून मिळावे, जुन्या शाळा दुरुस्त करणे, मोडकळीस आलेल्या शाळांची पुनर्बांधणी करावी, टाटा कंपनीत शिक्षणानुसार सुशिक्षितांना नोकऱ्या मिळाव्यात, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार अभय चव्हाण यांना देण्यात आले.

यावेळी रवींद्र (बाबा) कंधारे, धरण विभाग विकास मंडळ अध्यक्ष गणपत वाशिवले, हनुमंत सुर्वे, अंकुश मोरे, एकनाथ दिघे, अनिल अधवडे, श्रीराम वायकर, चंद्रकांत जाधव, पांडुरंग निवेकर, गोविंद सरुसे, सचिन पळसकर, दत्ता दिघे, दशरथ गोळे, आबा दिघे, दत्ता गोरे, भरत गाउडसे, धुळा कोकरे, एकनाथ जांभूळकर, अर्जुन पठारे, जयराम दिघे, परमेश्वर जोरी, बाळू मराठे, किसन पडवळ, विठ्ठल पडवळ, विष्णू ढोरे, वसंत वाळज, संतोष कदम, स्वाती वाशिवले, आशा मेंगडे, विशाल पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, महिला आघाडी जिल्हा संघटिका संगीता पवळे, स्वाती ढमाले, महिला आघाडी तालुका संघटिका ज्योती चांदेरे, भा. वि .सेना जिल्हा संघटक राम गायकवाड, संतोष दगडे, तात्या देवकर, राणी शिंदे उपस्थित होते.

तहसीलदार अभय चव्हाण यांनी आंदोलकांना आंदोलन दिले की, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून धरणग्रस्तांच्या प्रश्न सोडविण्याचा सरकारदरबारी प्रयत्न करू व धरणभागात चाललेली मोजणी तूर्तास थांबवली आहे. त्यामुळे १०फेब्रुवारीपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येईल.

-

सचिन पळसकर, आंदोलक