शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लग्नसोहळ्यात होतेय अन्नाची नासाडी

By admin | Updated: May 29, 2017 02:38 IST

लग्नसोहळ्यातील जेवणावळीचे स्वरुप बदलत चाललेले आहे. आता पंगतीची पारंपरिक पद्धत कमी झाली असून त्याची जागा बुफेने घेतली

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : लग्नसोहळ्यातील जेवणावळीचे स्वरुप बदलत चाललेले आहे. आता पंगतीची पारंपरिक पद्धत कमी झाली असून त्याची जागा बुफेने घेतली आहे. ही पद्धतही काही वाईट नाही मात्र यातून गैरसमजामुळे निर्माण होत असलेल्या प्रकारामुळे अन्नाची नासाडी होत आहे. प्रगत समाजाची ओळख बनू पाहत असलेल्या या पद्धतीमुळे अन्न पूर्णब्रह्म चा विसर पडत आहे. कार्यक्रम आटोपल्यावर कार्यक्रम स्थळाच्या मागे वा जागा असेल तिथे अन्नाचे ढीग लावले जात असल्याचे चित्र दिसत आहे.हे अन्न फेकून याची विल्हेवाट लावली जाते. फेकलेले अन्न सडल्यामुळे त्यातून मिथेन या घातक वायूची निर्मिती होते. ग्लोबल वार्मिंग तसेच वातावरणातील बदलास ही नासाडी एका प्रकारे कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असे म्हणणाऱ्या भारत देशातच अनेकांना रात्री उपाशीपोटी झोपावे लागत आहे.एका विवाह सोहळ्यात किमान २०० व्यक्ती जेवतील एवढे अन्न वाया जाते़ अशातही होणारी अन्नाची नासाडी ही त्याचा विपर्यास दर्शविणारी आहे. ताटातील उष्टे अन्न टाकून दिल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. अन्न उष्टे न टाकता योग्य वापर केल्यास अन्नपूर्णादेवीचा सन्मान होतो, हे समजणे गरजेचे आहे. एका जेवणात १ हजार २३९ कॅलरीज असतात, जी कुपोषित बालकांच्या दिवसभराच्या ऊर्जेची गरज भागवू शकतात. मात्र लग्नातील प्रत्येक ताटातील २० टक्के जेवण म्हणजे २४६ कॅलरीज अन्न फेकून दिल्या जात आहे. अन्नाला देव म्हणविणाऱ्या भारतातच हा प्रकार सुरू असणे ही एक शोकांतीकाच ठरत आहे.एका लग्न प्रसंगात सरासरी एक ते दोन हजार लोक हजर असतात. बुफे पद्धतीमुळे रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. प्रत्यक्षात ताटातील बरेचसे अन्न वाया जाते. सर्व पदार्थांच्या अट्टाहासाने  अन्नाची नासाडी लग्न समारंभ म्हणले की, त्यात जेवणावळी आल्याच. प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित करीत अनेक पदार्थांची रेलचेल असते, हे सर्व पदार्थ प्रत्येक जण इच्छा नसतानासुद्धा स्वत:च्या ताटात घेतो़ समारंभात गर्दी असल्याने नागरिक पुन्हा रांगेत लागण्याच्या भानगडीत न पडता एकाच वेळी पूर्ण प्लेट भरून घेतात. बुफेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न घेतले गेल्याने ते त्यांच्या खाण्यात जात नाही. पर्यायी ते अन्न प्लेटमध्ये तसेच टाकण्यात येते. येथूनच अन्नाची नासाडी सुरू होते. जर आवश्यकतेनुसार अन्न घेतले तर ते वाया जाणार नाही, याची काळजी सर्वसामान्य नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.