शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे इंदापूरची शेती तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:31 IST

खडकवासला धरण साखळीतील नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच राहिली आहे. जिल्ह्याच्या भागातील हवेली, दौंड, बारामतीमधील काही भाग व इंदापूर तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कळस  - खडकवासला धरण साखळीतील नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच राहिली आहे. जिल्ह्याच्या भागातील हवेली, दौंड, बारामतीमधील काही भाग व इंदापूर तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या हलगर्जीपणामुळे या चारही तालुक्यातील कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांतील पाणी या कालव्यामधून चार तालुक्यांतील शेतीला व पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. हवेली, दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यांतील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या कालव्यामधून पाणीपुरवठा होतो. पुणे शहराची लोकसंख्या कमी होती. त्या वेळी चार टीएमसी पाणी पुणे शहराला पिण्यासाठी पुरेसे होते.पुण्याची मागणी वाढल्याने शेतीला उपलब्ध होणारे पाणी फार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. नवा मुठा उजव्या कालव्यातून शेतीला व बंद पाइपलाइनमधून शहराला पिण्यासाठी पाणी पुरविले जात आहे. शेतीला सोडण्यात येणारे कालव्यातील पाणी कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे बंद करण्यात आला आहे. दुरुस्ती होईपर्यंत कालव्यामधून शेतीला सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शेतकºयांना मात्र घाम फुटणार आहे.मुठा कालवा फुटल्यामुळे शेतकºयांचे धाबे दणाणलेरेडणी : इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना या वर्षी पावसाच्या संकटाने ग्रासले आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकºयांकडून कालव्याच्या पाण्याची मागणी झाली होती. त्यानुसार खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यातदेखील आले; परंतु गुरुवारी पुण्यात मुठा कालवा फुटल्यामुळे शेतकºयांचे धाबे दणाणले आहेत.या वर्षी कमी पावसामुळे ऊसपिकावर हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. वाढत्या तापमानामुळे बहर धरलेल्या डाळिंबबागांची फूलगळ होत आहे. पाऊस नसल्यामुळे पिके करपली आहेत. काही दिवसांपूर्वी खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यासाठी काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते.इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी जलसंपदा अधिकाºयांना पाणी सोडण्यासाठी धारेवर धरले होते. त्यानंतर खडकवासल्याचे पाणी इंदापुरातील शेतकºयांना सोडण्यात आले होते; परंतु काल पुण्यात मुठा कालवा फुटल्यामुळे ते बंद करण्यात आले. यामुळे ‘दुष्काळात तेरावा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या