शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे इंदापूरची शेती तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:31 IST

खडकवासला धरण साखळीतील नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच राहिली आहे. जिल्ह्याच्या भागातील हवेली, दौंड, बारामतीमधील काही भाग व इंदापूर तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कळस  - खडकवासला धरण साखळीतील नवा मुठा उजवा कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेती तहानलेलीच राहिली आहे. जिल्ह्याच्या भागातील हवेली, दौंड, बारामतीमधील काही भाग व इंदापूर तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला आगामी काळात कालव्यामधून पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या हलगर्जीपणामुळे या चारही तालुक्यातील कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांतील पाणी या कालव्यामधून चार तालुक्यांतील शेतीला व पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. हवेली, दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यांतील ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या कालव्यामधून पाणीपुरवठा होतो. पुणे शहराची लोकसंख्या कमी होती. त्या वेळी चार टीएमसी पाणी पुणे शहराला पिण्यासाठी पुरेसे होते.पुण्याची मागणी वाढल्याने शेतीला उपलब्ध होणारे पाणी फार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. नवा मुठा उजव्या कालव्यातून शेतीला व बंद पाइपलाइनमधून शहराला पिण्यासाठी पाणी पुरविले जात आहे. शेतीला सोडण्यात येणारे कालव्यातील पाणी कालवा पुणे शहरात फुटल्यामुळे बंद करण्यात आला आहे. दुरुस्ती होईपर्यंत कालव्यामधून शेतीला सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शेतकºयांना मात्र घाम फुटणार आहे.मुठा कालवा फुटल्यामुळे शेतकºयांचे धाबे दणाणलेरेडणी : इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना या वर्षी पावसाच्या संकटाने ग्रासले आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकºयांकडून कालव्याच्या पाण्याची मागणी झाली होती. त्यानुसार खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यातदेखील आले; परंतु गुरुवारी पुण्यात मुठा कालवा फुटल्यामुळे शेतकºयांचे धाबे दणाणले आहेत.या वर्षी कमी पावसामुळे ऊसपिकावर हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. वाढत्या तापमानामुळे बहर धरलेल्या डाळिंबबागांची फूलगळ होत आहे. पाऊस नसल्यामुळे पिके करपली आहेत. काही दिवसांपूर्वी खडकवासला कालव्याचे पाणी सोडण्यासाठी काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते.इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे व आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी जलसंपदा अधिकाºयांना पाणी सोडण्यासाठी धारेवर धरले होते. त्यानंतर खडकवासल्याचे पाणी इंदापुरातील शेतकºयांना सोडण्यात आले होते; परंतु काल पुण्यात मुठा कालवा फुटल्यामुळे ते बंद करण्यात आले. यामुळे ‘दुष्काळात तेरावा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या