शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

पावसाची हुलकावणी : शेतकरी झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 02:25 IST

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या राहूबेट (ता. दौंड) परिसरात पावसाने सुरुवातीच्या काळातच हुलकावणी दिल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून काही ठिकाणी ऊसलागवड वेगात चालू आहे. परंतु काही भागात पाण्याअभावी शेतीची कामे रेंगाळली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पाठेठाण  - दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या राहूबेट (ता. दौंड) परिसरात पावसाने सुरुवातीच्या काळातच हुलकावणी दिल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून काही ठिकाणी ऊसलागवड वेगात चालू आहे. परंतु काही भागात पाण्याअभावी शेतीची कामे रेंगाळली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.संपूर्ण बागायती पट्टा आणि ऊसपिकाचे आगर म्हणून परिचित असलेल्या राहूबेट परिसरात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात आडसाली उसाची लागवड सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी पाऊस झाला नसल्याने ऊसलागवड, तसेच पेरणीपूर्वी मशागती, पेरणीची कामे खोळंबली असल्याचे दिसून येत आहे.मुळा-मुठा नदीच्या काठावर असलेल्या मिरवडी, दहिटणे, खामगाव, नांदूर, सहजपूर, उंडवडी, शिंदेनगर, राहू, पिलाणवाडी, देवकरवाडी, मगरवाडी, टेळेवाडी, पिंपळगाव, वाळकी आदी गावात पाण्याची उपलब्धता असल्याने ऊस जोरात आहे.परंतु भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असल्याने त्यातच पावसाने दडी मारल्याने पाण्यावर अवलंबून असलेल्या पाटेठाण, टाकळी भीमा, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर या ठिकाणी शेतकरी मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडले असल्याने उभी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची जणू धडपड सुरू आहे. पाण्याअभावी कुठलीही पिके घेण्यासाठी धाडस होत नसून चांगला पाऊस झाल्यानंतरच ऊसलागवड, पेरणीच्या कामास सुरुवात करणार असल्याचे परिसरातील शेतकºयांनी सांगितले.खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी प्रतीक्षेतवालचंदनगर : इंदापूर तालुक्यात वारे, कडकडीत ऊन, उष्णता यामुळे पावसाची अपेक्षा लांबली असल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीपासून वंचित राहणार असल्याचे दिसत आहे. जर अशीच उष्णता, कडकडीत ऊन, वारे वाहत गेल्यास याहीवर्षी खरिपाची पेरणी नक्कीच लांबणार असल्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झालेला दिसत आहे.हुलकावणी दिल्याने येथील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. ७ जूनला वेळेवर पावसाचे आगमन झाले असल्याने येथील शेतकºयांनी बी-बियाणे खरेदी करण्यावर भर दिला होता.बाजारात चार ते पाच वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी वेळेवर बी-बियाणे खरेदीदाराकडे वळला होता. परंतु तालुक्यात एकदाच जोरदार पाऊस झाल्याने शेतातील ओल पेरणीयोग्य नसल्यामुळे येथील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहावयासमिळत आहेत.तालुक्यातील शेतकºयांनी उन्हाळ्यात पेरणीयोग्य मशागत करून शेतातील कामे उरकून ठेवली आहेत.मृग नक्षत्रात पहिल्याच दिवशी मेघगर्जनेसह जोरदार पावसाने तालुक्याला झोडपून काढले होते. त्यामुळे येथील शेतकºयांना आनंद झाला होता.हवामान खात्याच्या अंदाजपत्रकात जूनमध्ये मुसळधार व अतिवृष्टीचा इशारादिलेला होता.पावसाचा अंदाज घेऊन शेतकºयाने बी-बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारातील कृषी सेवा केंद्रात झुंबड उडाली होती. परंतु काही दिवसांनी वातावरणात कमालीचा बदल होऊन पुन्हा ऊन, वारे यांचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात बी-बियाणे भरून ठेवलेल्या शेतकºयांना पश्चाताप करावा लागत आहे. या महिन्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यास याहीवर्षी खरिपाची पेरणी लांबणार असल्याचे येथील शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे