शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

पावसाची हुलकावणी : शेतकरी झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 02:25 IST

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या राहूबेट (ता. दौंड) परिसरात पावसाने सुरुवातीच्या काळातच हुलकावणी दिल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून काही ठिकाणी ऊसलागवड वेगात चालू आहे. परंतु काही भागात पाण्याअभावी शेतीची कामे रेंगाळली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पाठेठाण  - दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती भाग म्हणून ओळख असलेल्या राहूबेट (ता. दौंड) परिसरात पावसाने सुरुवातीच्या काळातच हुलकावणी दिल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून काही ठिकाणी ऊसलागवड वेगात चालू आहे. परंतु काही भागात पाण्याअभावी शेतीची कामे रेंगाळली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.संपूर्ण बागायती पट्टा आणि ऊसपिकाचे आगर म्हणून परिचित असलेल्या राहूबेट परिसरात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात आडसाली उसाची लागवड सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी पाऊस झाला नसल्याने ऊसलागवड, तसेच पेरणीपूर्वी मशागती, पेरणीची कामे खोळंबली असल्याचे दिसून येत आहे.मुळा-मुठा नदीच्या काठावर असलेल्या मिरवडी, दहिटणे, खामगाव, नांदूर, सहजपूर, उंडवडी, शिंदेनगर, राहू, पिलाणवाडी, देवकरवाडी, मगरवाडी, टेळेवाडी, पिंपळगाव, वाळकी आदी गावात पाण्याची उपलब्धता असल्याने ऊस जोरात आहे.परंतु भीमा नदीचे पात्र कोरडे पडले असल्याने त्यातच पावसाने दडी मारल्याने पाण्यावर अवलंबून असलेल्या पाटेठाण, टाकळी भीमा, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर या ठिकाणी शेतकरी मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडले असल्याने उभी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची जणू धडपड सुरू आहे. पाण्याअभावी कुठलीही पिके घेण्यासाठी धाडस होत नसून चांगला पाऊस झाल्यानंतरच ऊसलागवड, पेरणीच्या कामास सुरुवात करणार असल्याचे परिसरातील शेतकºयांनी सांगितले.खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी प्रतीक्षेतवालचंदनगर : इंदापूर तालुक्यात वारे, कडकडीत ऊन, उष्णता यामुळे पावसाची अपेक्षा लांबली असल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीपासून वंचित राहणार असल्याचे दिसत आहे. जर अशीच उष्णता, कडकडीत ऊन, वारे वाहत गेल्यास याहीवर्षी खरिपाची पेरणी नक्कीच लांबणार असल्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झालेला दिसत आहे.हुलकावणी दिल्याने येथील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. ७ जूनला वेळेवर पावसाचे आगमन झाले असल्याने येथील शेतकºयांनी बी-बियाणे खरेदी करण्यावर भर दिला होता.बाजारात चार ते पाच वर्षांत पहिल्यांदाच शेतकरी वेळेवर बी-बियाणे खरेदीदाराकडे वळला होता. परंतु तालुक्यात एकदाच जोरदार पाऊस झाल्याने शेतातील ओल पेरणीयोग्य नसल्यामुळे येथील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहावयासमिळत आहेत.तालुक्यातील शेतकºयांनी उन्हाळ्यात पेरणीयोग्य मशागत करून शेतातील कामे उरकून ठेवली आहेत.मृग नक्षत्रात पहिल्याच दिवशी मेघगर्जनेसह जोरदार पावसाने तालुक्याला झोडपून काढले होते. त्यामुळे येथील शेतकºयांना आनंद झाला होता.हवामान खात्याच्या अंदाजपत्रकात जूनमध्ये मुसळधार व अतिवृष्टीचा इशारादिलेला होता.पावसाचा अंदाज घेऊन शेतकºयाने बी-बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारातील कृषी सेवा केंद्रात झुंबड उडाली होती. परंतु काही दिवसांनी वातावरणात कमालीचा बदल होऊन पुन्हा ऊन, वारे यांचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात बी-बियाणे भरून ठेवलेल्या शेतकºयांना पश्चाताप करावा लागत आहे. या महिन्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यास याहीवर्षी खरिपाची पेरणी लांबणार असल्याचे येथील शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे