शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कागदांची खरेदीच केली नसल्याने गुणपत्रिका रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:08 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने कागदांची खरेदीच केली नसल्याने व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम वर्षाला शिकणा-या विद्यार्थ्यांना एक वर्षापासून गुणपत्रिका मिळू न शकल्याचे उजेडात आले आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने कागदांची खरेदीच केली नसल्याने व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम वर्षाला शिकणा-या विद्यार्थ्यांना एक वर्षापासून गुणपत्रिका मिळू न शकल्याचे उजेडात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यास थोडासा उशीर झाल्यास लेट फी घेतली जाते, त्याचवेळी निकाल प्रक्रियेत अक्षम्य कुचराई करणा-या दोषी अधिका-यांवर काय कारवाई केली जाणार, याची विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.एमबीए प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राचा निकाल नोव्हेंबर २०१६ मध्ये आॅनलाइन जाहीर करण्यात आला, त्यापाठोपाठ मे २०१७ मध्ये दुसºया सत्राचाही निकाल जाहीर करण्यात आला; मात्र या दोन्ही निकालांच्या गुणपत्रिका अद्याप विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे एमबीएच्या महाविद्यालयांमध्ये शिकणाºया दहा हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेऊन एमबीएला प्रवेश घेतले आहेत. बँकेत गुणपत्रिका जमा न केल्यामुळे त्यांचे पुढील वर्षासाठी मिळणारे लोन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण धोक्यात सापडले आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली गोंधळाची परंपरा पुढेही चालूच आहे. विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये परीक्षा शुल्क विद्यापीठाकडून घेतले जाते. त्याबदल्यात सुरळीतपणे परीक्षा घेऊन त्यांच्या निकालाचे योग्य प्रकारे वितरण करण्याची जबाबदारी परीक्षा विभागावर आहे; मात्र परीक्षा विभागाने गुणपत्रिकांची छपाई करण्यासाठी कागदांची खरेदीच केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आणखी काही महिने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळू शकणार नाही. कागदांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविणे, त्यानंतर निकालाची छपाई असे सोपस्कार पार पाडावे लागणार आहे. एक वर्षानंतर जर कागद खरेदी करून गुणपत्रिकांची छपाई केली जाणार असेल, तर इतके दिवस परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी काय करीत होते, याची विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.>कुंपणाच्या कामाचाफेरआढावा घेणारसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध विभाग, जंगल यांना कुंपण घालण्यासाठी १७ कोटी रुपयांच्या कामाच्या वर्क आॅर्डर काढण्यात आल्या आहेत. यापैकी ६ कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले असून, आणखी ११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांचा फेरआढावा घेतला जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.>एक वर्षापासून विद्यार्थी वंचितएमबीएच्या विद्यार्थ्यांना गेल्या एक वर्षापासून गुणपत्रिका देण्यात आल्या नाहीत, याची कोणतीही माहिती परीक्षा विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, प्रभारी कुलसचिव अरविंद शाळिग्राम यांना देण्यात आली नाही. कुलगुरू गुरुवारी कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी होते, परतल्यानंतर याप्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.>संबंधित अधिकाºयांशी चर्चाएमबीएच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याची व्यवस्था करण्याबाबत शुक्रवारी परीक्षा विभागाच्या संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली जाणार असल्याचे व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.