शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

कागदांची खरेदीच केली नसल्याने गुणपत्रिका रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:08 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने कागदांची खरेदीच केली नसल्याने व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम वर्षाला शिकणा-या विद्यार्थ्यांना एक वर्षापासून गुणपत्रिका मिळू न शकल्याचे उजेडात आले आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाने कागदांची खरेदीच केली नसल्याने व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम वर्षाला शिकणा-या विद्यार्थ्यांना एक वर्षापासून गुणपत्रिका मिळू न शकल्याचे उजेडात आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यास थोडासा उशीर झाल्यास लेट फी घेतली जाते, त्याचवेळी निकाल प्रक्रियेत अक्षम्य कुचराई करणा-या दोषी अधिका-यांवर काय कारवाई केली जाणार, याची विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.एमबीए प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राचा निकाल नोव्हेंबर २०१६ मध्ये आॅनलाइन जाहीर करण्यात आला, त्यापाठोपाठ मे २०१७ मध्ये दुसºया सत्राचाही निकाल जाहीर करण्यात आला; मात्र या दोन्ही निकालांच्या गुणपत्रिका अद्याप विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे एमबीएच्या महाविद्यालयांमध्ये शिकणाºया दहा हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेऊन एमबीएला प्रवेश घेतले आहेत. बँकेत गुणपत्रिका जमा न केल्यामुळे त्यांचे पुढील वर्षासाठी मिळणारे लोन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण धोक्यात सापडले आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली गोंधळाची परंपरा पुढेही चालूच आहे. विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये परीक्षा शुल्क विद्यापीठाकडून घेतले जाते. त्याबदल्यात सुरळीतपणे परीक्षा घेऊन त्यांच्या निकालाचे योग्य प्रकारे वितरण करण्याची जबाबदारी परीक्षा विभागावर आहे; मात्र परीक्षा विभागाने गुणपत्रिकांची छपाई करण्यासाठी कागदांची खरेदीच केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आणखी काही महिने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळू शकणार नाही. कागदांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविणे, त्यानंतर निकालाची छपाई असे सोपस्कार पार पाडावे लागणार आहे. एक वर्षानंतर जर कागद खरेदी करून गुणपत्रिकांची छपाई केली जाणार असेल, तर इतके दिवस परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी काय करीत होते, याची विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.>कुंपणाच्या कामाचाफेरआढावा घेणारसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध विभाग, जंगल यांना कुंपण घालण्यासाठी १७ कोटी रुपयांच्या कामाच्या वर्क आॅर्डर काढण्यात आल्या आहेत. यापैकी ६ कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले असून, आणखी ११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांचा फेरआढावा घेतला जाणार असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.>एक वर्षापासून विद्यार्थी वंचितएमबीएच्या विद्यार्थ्यांना गेल्या एक वर्षापासून गुणपत्रिका देण्यात आल्या नाहीत, याची कोणतीही माहिती परीक्षा विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, प्रभारी कुलसचिव अरविंद शाळिग्राम यांना देण्यात आली नाही. कुलगुरू गुरुवारी कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी होते, परतल्यानंतर याप्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.>संबंधित अधिकाºयांशी चर्चाएमबीएच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्याची व्यवस्था करण्याबाबत शुक्रवारी परीक्षा विभागाच्या संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली जाणार असल्याचे व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.