शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पावसाअभावी भातरोपे लागली करपू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

पुणे : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण खरीप हंगामाच धोक्यात आला असून, ...

पुणे : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण खरीप हंगामाच धोक्यात आला असून, जिल्ह्यातील सहा हजार दोनशे हेक्टरवरील भाताची रोपे पावसाअभावी करपू लागली आहेत. येत्या दोन-चार दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास भाताची रोपे जळून जातील व हजारो हेक्टर भातशेती लागवडीशिवाय पडिक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल.

जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वदूर व चांगल्या पावसाने हजेरी लावली. यामुळे भातउत्पादक शेतकऱ्यांनी म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या सहा-सात तालुक्यांत शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका तयार केल्या. त्यानंतरदेखील अधूनमधून पावसाच्या सरी पडतच होत्या. यामुळे जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर भातरोप वाटिका चांगल्या झाल्या. त्यानंतर जिल्ह्यात पुन्हा १७ ते २० जूनदरम्यान बहुतेक पश्चिम पट्ट्यात चांगल्या पावसाची नोंद झाली व भात खाचरातही पाणी आले. यामुळेच जुन्नर, आंबेगाव, खेडसह मावळ, मुळशी तालुक्यांतील पश्चिम पट्ट्यातील काही शेतकऱ्यांनी भातलावगड उरकूनदेखील घेतली.

परंतु गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने पूर्णपणेच उघडीप दिली आहे. एवढेच नाही तर ऐन पावसाळ्यात उन्हाचे चटकेदेखील बसले. यामुळेच हाताशी आलेली भातरोपे पिवळी पडू लागली असून, पाऊस आणखी लांबल्यास भात रोपे जळून जातील. जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, खेडसह मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पुनर्लागवड झाली आहे. परंतु पावसाअभावी पुनर्लागवड केलेले भात क्षेत्रदेखील संकटात सापडले आहेत.

गेल्या वर्षी एक जून रोजी भात पट्यात चांगला पाऊस झाल्यामुळे सुमारे ४ हजार ३८२ हेक्टरवर भात रोपवाटिका झाल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाऊस पडल्यामुळे वेळेवर भात लागवडी झाल्याने पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा दिला होता. यंदा जिल्ह्यात सुमारे ६१ हजार हेक्टरवर भात लागवडी होण्याचा अंदाज असल्याने मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका शेतकऱ्यांनी टाकल्या आहेत.

चौकट

जिल्ह्यातील भात रोपवाटिकांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे

तालुका भात रोपाचे क्षेत्र (हेक्टर)

जुन्नर ११००

आंबेगाव ५६०

खेड ७३३

मावळ १२८०

मुळशी ७७०

भोर ७७५

वेल्हा ५१०

हवेली २२०

पुरंदर १५०