शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:47 IST

एका महिन्यापासून कोसळलेल्या कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

खेड : एका महिन्यापासून कोसळलेल्या कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. भाव सावरण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून किंवा नाफेडच्या माध्यमातून अद्याप कोणतीही उपाययोजना सुरू होत नसल्याने शेतकºयांमधून तीव्र नापसंती व्यक्त होत आहे. कांद्याबाबत योग्य उपाययोजना नजीकच्या काळात न केल्यास मोठा उद्रेक होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या बाजारपेठेत प्रतिक्विंटल कांद्याचा दर २०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. लागवडीपासून काढणीपर्यंत आणि बाजारपेठेपर्यंतचे परिश्रम व मोठ्या प्रमाणात होणारा खर्च पाहता, सध्या कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. सरकारकडून कांद्याची निर्यात सुरू करण्याबद्दल पावले उचलली जात नसल्याने शेतकºयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांचा कांदालागवडीकडे कल आहे. जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्यांत तसेच शेजारील जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर या तालुक्यांत विशेषकरून कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मागील काही वर्षांचा उत्पादन व भाव यांचे गणित अपवादात्मक वेळाच जुळून आले. यंदाही आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात शेतकºयांनी कांदालागवडी उरकून घेतल्या. लागवडीनंतर आॅक्टोबर महिन्यात चांगला भाव शेतकºयांना मिळाला. मात्र, साधारण महिन्यापासून नवीन कांद्याची काढणी सुरू झाली आणि दर घसरला. मजुरीचे वाढते दर, बियाणे, खते, फवारणी, मशागत आणि काढणी, साठवण, वाहतूक खर्च आणि विक्री किंमत याचा ताळमेळ बसेना; त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंता आहे. कांदालागवडीपासून काढणीपर्यंत सरासरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.शेतकरी उत्पादक कंपनी ठरू शकतात निर्णायक...व्यापारी, अडते, कमिशन एजंट वगैरे साखळी मोडीत काढण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनींची भूमिका निर्णायक ठरू शकते. शेतकरी ते ग्राहक यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या उत्तम पर्याय ठरू शकतो. स्वत:ची आउटलेट सुरू करण्यासाठी आणि अत्यल्प व्याजाने या कंपन्यांना पतपुरवठा करताना उत्पादक कंपन्यांना सरकारने पाठबळ दिल्यास सध्याच्या व्यापारी, अडते, कमिशन एजंट, होलसेलर या साखळीला पायबंद बसून शेतकºयांना चांगला भाव मिळू शकतो. अर्थात, उत्पादक कंपन्यांना सरकारी पाठबळ मिळाल्यास शेतमालाच्या भावाची समस्या कमी होऊ शकते.कांदा उत्पादक शेतकºयांना शासनाचे चुकीचे धोरण अडचणीत आणीत आहे. हमी भाव उत्पादनखर्चावर आधारित देणे आवश्यक आहे. नोकरदारांना सातवा वेतन आयोग लागू करताना सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार येत नाही. शेतकºयांना योजना लागू करताना सरकारी तिजोरीवर भार पडतो. ही नौटंकी सरकारने थांबवावी. कृषिप्रधान देशात नोकरशाही आणि उद्योगपूरक भूमिका योग्य आहे.- अनंथा बढे,कांदा उत्पादक

टॅग्स :onionकांदाPuneपुणे