शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:47 IST

एका महिन्यापासून कोसळलेल्या कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

खेड : एका महिन्यापासून कोसळलेल्या कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. भाव सावरण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून किंवा नाफेडच्या माध्यमातून अद्याप कोणतीही उपाययोजना सुरू होत नसल्याने शेतकºयांमधून तीव्र नापसंती व्यक्त होत आहे. कांद्याबाबत योग्य उपाययोजना नजीकच्या काळात न केल्यास मोठा उद्रेक होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या बाजारपेठेत प्रतिक्विंटल कांद्याचा दर २०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. लागवडीपासून काढणीपर्यंत आणि बाजारपेठेपर्यंतचे परिश्रम व मोठ्या प्रमाणात होणारा खर्च पाहता, सध्या कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. सरकारकडून कांद्याची निर्यात सुरू करण्याबद्दल पावले उचलली जात नसल्याने शेतकºयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांचा कांदालागवडीकडे कल आहे. जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्यांत तसेच शेजारील जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर या तालुक्यांत विशेषकरून कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मागील काही वर्षांचा उत्पादन व भाव यांचे गणित अपवादात्मक वेळाच जुळून आले. यंदाही आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात शेतकºयांनी कांदालागवडी उरकून घेतल्या. लागवडीनंतर आॅक्टोबर महिन्यात चांगला भाव शेतकºयांना मिळाला. मात्र, साधारण महिन्यापासून नवीन कांद्याची काढणी सुरू झाली आणि दर घसरला. मजुरीचे वाढते दर, बियाणे, खते, फवारणी, मशागत आणि काढणी, साठवण, वाहतूक खर्च आणि विक्री किंमत याचा ताळमेळ बसेना; त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंता आहे. कांदालागवडीपासून काढणीपर्यंत सरासरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.शेतकरी उत्पादक कंपनी ठरू शकतात निर्णायक...व्यापारी, अडते, कमिशन एजंट वगैरे साखळी मोडीत काढण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनींची भूमिका निर्णायक ठरू शकते. शेतकरी ते ग्राहक यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या उत्तम पर्याय ठरू शकतो. स्वत:ची आउटलेट सुरू करण्यासाठी आणि अत्यल्प व्याजाने या कंपन्यांना पतपुरवठा करताना उत्पादक कंपन्यांना सरकारने पाठबळ दिल्यास सध्याच्या व्यापारी, अडते, कमिशन एजंट, होलसेलर या साखळीला पायबंद बसून शेतकºयांना चांगला भाव मिळू शकतो. अर्थात, उत्पादक कंपन्यांना सरकारी पाठबळ मिळाल्यास शेतमालाच्या भावाची समस्या कमी होऊ शकते.कांदा उत्पादक शेतकºयांना शासनाचे चुकीचे धोरण अडचणीत आणीत आहे. हमी भाव उत्पादनखर्चावर आधारित देणे आवश्यक आहे. नोकरदारांना सातवा वेतन आयोग लागू करताना सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार येत नाही. शेतकºयांना योजना लागू करताना सरकारी तिजोरीवर भार पडतो. ही नौटंकी सरकारने थांबवावी. कृषिप्रधान देशात नोकरशाही आणि उद्योगपूरक भूमिका योग्य आहे.- अनंथा बढे,कांदा उत्पादक

टॅग्स :onionकांदाPuneपुणे