शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाढलेला उष्मा, कीटनाशकांची चुकीच्या पद्धतीने फवारणी यामुळे शेतकऱ्यांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 22:23 IST

वाढलेला उष्मा, किटनाशकांची चुकीच्या पद्धतीने केली जाणारी फवारणी, मिश्र किटकनाशकांमुळे विषारीपणाची वाढलेली तीव्रता यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला असल्याची माहिती यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी दिली. 

पुणे : वाढलेला उष्मा, कीटनाशकांची चुकीच्या पद्धतीने केली जाणारी फवारणी, मिश्र कीटकनाशकांमुळे विषारीपणाची वाढलेली तीव्रता यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला असल्याची माहिती यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी दिली. कापसावरील बोंड आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जहाल कीटनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकºयांना आपले प्राण गमवाले लागले आहे. खरेतर कीटनाशकांच्या फवारणीमुळे अनेक शेतकरी आणि शेतमजुर रुग्णालयात दाखल होत असल्याचे वृत्त गेल्या दोन महिन्यात सातत्याने येत होते. मात्र, त्याची तीव्रता मळमळणे, उलटी आणि चक्कर अशापुरती मर्यादित होती. ही दुर्घटना नक्की कशामुळे झाली, याबाबत बोलताना डॉ. नेमाडे म्हणाले, सप्टेंबर-आॅक्टोबरची हिट वाढत असतानाच गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कीटनाशकांची फवारणी करताना हाय प्रेशरचे यंत्र वापरले जात आहे. त्यामुळे एक धुके निर्माण झाल्यासारखे होते. असे करताना ना डोळ्यांवर चष्मा घातला जातो, ना तोंड नाक झाकले जाते. कीट नाशकाची फवारणी करताना संपूर्ण शरीर झाकणे आवश्यक असते. वेळोवेळी याबाबतचे निर्देश देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पाऊस असो वा नसो, कीटनाशक वाहून जाऊ नये म्हणून पावसाळ््यात वापरले जाणारा गोंदसारखा पदार्थ देखील फवारला जातो. असे गोंद आणि औषध फवारणाºयाच्या त्वचेला चिकटून राहते. त्वचेतील रंध्रांमार्फत शरीरात झिरपते. औषधाची तीव्रता वाढावी यासाठी दोन अथवा तीन वेगवेगळी औषधे एकत्र करुन, त्याची फवारणी केली जाते. त्यामुळे औषधाचा विषारीपणा आणखी वाढतो. असे कीटनाशक श्वसनावाटे, त्वचेवाटे शरीरात जाते. त्यामुळे असा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नेमाडे म्हणाले.  

काय घ्यावी दक्षता 

- कीटनाशक फवारताना संपूर्ण डोळे झाकले जातील असा चष्मा, नाका-तोंडावर मास्क लावावे- कोणत्याही प्रकारची जखम असल्यास कीटनाशक फवारणे टाळावे- किटनाशक फवारल्यावर संपूर्ण स्वच्छ झाल्याशिवाय न्याहरी अथवा तंबाखू खाणे टाळावे 

बोंडअळीवर कामगंधची मात्राबोंड अळी आटोक्यात आणण्यासाठी जहाल कीट नाशके वापरण्या ऐवजी कामगंध सापळे लावल्यास उपयुक्त ठरते. या सापळ्याकडे नर आकर्षित होऊन मरतो. त्यामुळे अळ्यांचे प्रजनन होत नाही. एकरी असे १० ते १२ सापळे देखील पुरतात. एका सापळ्याची किंमत ३७ ते ४० रुपये आहे. याशिवाय पिवळे आणि निळे चिकट सापळे देखील उपलब्ध आहेत. त्याचा एकरी खर्च केवळ १ हजार रुपये येतो. यात बरोबर निंबोळी अर्क फवारणी देखील यावर उपयुक्त असल्याचे यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी