शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वाढलेला उष्मा, कीटनाशकांची चुकीच्या पद्धतीने फवारणी यामुळे शेतकऱ्यांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 22:23 IST

वाढलेला उष्मा, किटनाशकांची चुकीच्या पद्धतीने केली जाणारी फवारणी, मिश्र किटकनाशकांमुळे विषारीपणाची वाढलेली तीव्रता यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला असल्याची माहिती यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी दिली. 

पुणे : वाढलेला उष्मा, कीटनाशकांची चुकीच्या पद्धतीने केली जाणारी फवारणी, मिश्र कीटकनाशकांमुळे विषारीपणाची वाढलेली तीव्रता यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचा बळी गेला असल्याची माहिती यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी दिली. कापसावरील बोंड आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जहाल कीटनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकºयांना आपले प्राण गमवाले लागले आहे. खरेतर कीटनाशकांच्या फवारणीमुळे अनेक शेतकरी आणि शेतमजुर रुग्णालयात दाखल होत असल्याचे वृत्त गेल्या दोन महिन्यात सातत्याने येत होते. मात्र, त्याची तीव्रता मळमळणे, उलटी आणि चक्कर अशापुरती मर्यादित होती. ही दुर्घटना नक्की कशामुळे झाली, याबाबत बोलताना डॉ. नेमाडे म्हणाले, सप्टेंबर-आॅक्टोबरची हिट वाढत असतानाच गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कीटनाशकांची फवारणी करताना हाय प्रेशरचे यंत्र वापरले जात आहे. त्यामुळे एक धुके निर्माण झाल्यासारखे होते. असे करताना ना डोळ्यांवर चष्मा घातला जातो, ना तोंड नाक झाकले जाते. कीट नाशकाची फवारणी करताना संपूर्ण शरीर झाकणे आवश्यक असते. वेळोवेळी याबाबतचे निर्देश देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पाऊस असो वा नसो, कीटनाशक वाहून जाऊ नये म्हणून पावसाळ््यात वापरले जाणारा गोंदसारखा पदार्थ देखील फवारला जातो. असे गोंद आणि औषध फवारणाºयाच्या त्वचेला चिकटून राहते. त्वचेतील रंध्रांमार्फत शरीरात झिरपते. औषधाची तीव्रता वाढावी यासाठी दोन अथवा तीन वेगवेगळी औषधे एकत्र करुन, त्याची फवारणी केली जाते. त्यामुळे औषधाचा विषारीपणा आणखी वाढतो. असे कीटनाशक श्वसनावाटे, त्वचेवाटे शरीरात जाते. त्यामुळे असा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नेमाडे म्हणाले.  

काय घ्यावी दक्षता 

- कीटनाशक फवारताना संपूर्ण डोळे झाकले जातील असा चष्मा, नाका-तोंडावर मास्क लावावे- कोणत्याही प्रकारची जखम असल्यास कीटनाशक फवारणे टाळावे- किटनाशक फवारल्यावर संपूर्ण स्वच्छ झाल्याशिवाय न्याहरी अथवा तंबाखू खाणे टाळावे 

बोंडअळीवर कामगंधची मात्राबोंड अळी आटोक्यात आणण्यासाठी जहाल कीट नाशके वापरण्या ऐवजी कामगंध सापळे लावल्यास उपयुक्त ठरते. या सापळ्याकडे नर आकर्षित होऊन मरतो. त्यामुळे अळ्यांचे प्रजनन होत नाही. एकरी असे १० ते १२ सापळे देखील पुरतात. एका सापळ्याची किंमत ३७ ते ४० रुपये आहे. याशिवाय पिवळे आणि निळे चिकट सापळे देखील उपलब्ध आहेत. त्याचा एकरी खर्च केवळ १ हजार रुपये येतो. यात बरोबर निंबोळी अर्क फवारणी देखील यावर उपयुक्त असल्याचे यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी