शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

आगडोंब विझेना, प्रवासी असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 14:25 IST

दररोज सुमारे दहा लाख प्रवासी पीएमपीला पसंती देतात. पीएमपीच्या भरवशावर त्यांचा दिवस सुरू होता आणि संपतो. पण त्यांना सक्षम बससेवा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे.

ठळक मुद्देपीएमपी बस पेटल्याचे प्रकरण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ‘पीएमपी’कडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याचा आरोप ‘पीएमपी’ प्रशासनासमोर आगडोंब विझविण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित बससेवा देण्याचे आव्हान

पुणे : अचानक आग लागून बस पेटण्याच्या घटना थांबविण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) अपयश येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत पाच बस पेटल्या आहेत. बसेसचे फायर आॅडीट करण्याचा निर्णयही गुंडाळण्यात आला आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनासमोर आगडोंब विझविण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित बससेवा देण्याचे आव्हान आहे.मागील काही वर्षांत पीएमपीच्या मार्गावर धावणाऱ्या काही बसेसला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. साधारणपणे दीड महिन्यातून एक बस जळून खाक होत आहे. दि. १ जानेवारी ते दि. १० सप्टेंबर या कालावधीत पीएमपीच्या मालकीच्या दोन व खासगी ठेकेदारांकडील तीन बसेसला आग लागली आहे. काही बसेसने प्रवासी असतानाच पेट घेतला होता. तर काही बसेस पार्किंगमध्ये उभ्या असताना पेटल्या. पाचही अपघातांमध्ये प्रवाशांना कसलीही हानी झाली नाही. मात्र, या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी (दि. १०) पेटलेली बस पार्किंगमध्ये उभी होती. मार्गावर येण्यापुर्वीच शॉर्टसर्किटमुळे बसने पेट घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. रात्रभर पार्किंगमध्ये असलेली बस मार्गावर येण्यापुर्वी काही वेळ आधी पेट घेते, याचा अर्थ या बसच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसते. ही बस खासगी ठेकेदाराकडील होती. प्रशासनाने यापुर्वीही ठेकेदारांच्या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीवर ताशेरे ओढले आहेत. पण त्यानंतरही ब्रेकडाऊन किंवा बसला आग लागण्याचे प्रकार सुरूच आहे. ठेकेदारांप्रमाणेच पीएमपीच्या मालकीच्या बसही अधुनमधून पेट घेतात. ब्रेकडाऊनचे प्रमाणही लक्षणीय आहे. शेकडो बस १० वर्षांपुढील असल्याने या बसेसच्या क्षमतेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. पण सध्यातरी पीएमपीकडे या बसेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जुनाट, खिळखिळया झालेल्या बस मार्गावर आणणे गरजेचे आहे. पण हे करत असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

दररोज सुमारे दहा लाख प्रवासी पीएमपीला पसंती देतात. पीएमपीच्या भरवशावर त्यांचा दिवस सुरू होता आणि संपतो. पण त्यांना सक्षम बससेवा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे. यासाठी केवळ पीएमपी प्रशासन जबाबदार नसून दोन्ही महापालिकांमधील तत्कालीन व सध्याचे सत्ताधारीही कारणीभुत आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ‘पीएमपी’कडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्रवासी संघटना करतात. ---------------