शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

आगडोंब विझेना, प्रवासी असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 14:25 IST

दररोज सुमारे दहा लाख प्रवासी पीएमपीला पसंती देतात. पीएमपीच्या भरवशावर त्यांचा दिवस सुरू होता आणि संपतो. पण त्यांना सक्षम बससेवा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे.

ठळक मुद्देपीएमपी बस पेटल्याचे प्रकरण राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ‘पीएमपी’कडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याचा आरोप ‘पीएमपी’ प्रशासनासमोर आगडोंब विझविण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित बससेवा देण्याचे आव्हान

पुणे : अचानक आग लागून बस पेटण्याच्या घटना थांबविण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) अपयश येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत पाच बस पेटल्या आहेत. बसेसचे फायर आॅडीट करण्याचा निर्णयही गुंडाळण्यात आला आहे. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनासमोर आगडोंब विझविण्याबरोबरच प्रवाशांना सुरक्षित बससेवा देण्याचे आव्हान आहे.मागील काही वर्षांत पीएमपीच्या मार्गावर धावणाऱ्या काही बसेसला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. साधारणपणे दीड महिन्यातून एक बस जळून खाक होत आहे. दि. १ जानेवारी ते दि. १० सप्टेंबर या कालावधीत पीएमपीच्या मालकीच्या दोन व खासगी ठेकेदारांकडील तीन बसेसला आग लागली आहे. काही बसेसने प्रवासी असतानाच पेट घेतला होता. तर काही बसेस पार्किंगमध्ये उभ्या असताना पेटल्या. पाचही अपघातांमध्ये प्रवाशांना कसलीही हानी झाली नाही. मात्र, या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी (दि. १०) पेटलेली बस पार्किंगमध्ये उभी होती. मार्गावर येण्यापुर्वीच शॉर्टसर्किटमुळे बसने पेट घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. रात्रभर पार्किंगमध्ये असलेली बस मार्गावर येण्यापुर्वी काही वेळ आधी पेट घेते, याचा अर्थ या बसच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसते. ही बस खासगी ठेकेदाराकडील होती. प्रशासनाने यापुर्वीही ठेकेदारांच्या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीवर ताशेरे ओढले आहेत. पण त्यानंतरही ब्रेकडाऊन किंवा बसला आग लागण्याचे प्रकार सुरूच आहे. ठेकेदारांप्रमाणेच पीएमपीच्या मालकीच्या बसही अधुनमधून पेट घेतात. ब्रेकडाऊनचे प्रमाणही लक्षणीय आहे. शेकडो बस १० वर्षांपुढील असल्याने या बसेसच्या क्षमतेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात. पण सध्यातरी पीएमपीकडे या बसेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जुनाट, खिळखिळया झालेल्या बस मार्गावर आणणे गरजेचे आहे. पण हे करत असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

दररोज सुमारे दहा लाख प्रवासी पीएमपीला पसंती देतात. पीएमपीच्या भरवशावर त्यांचा दिवस सुरू होता आणि संपतो. पण त्यांना सक्षम बससेवा पुरविण्यात प्रशासन कमी पडत आहे. यासाठी केवळ पीएमपी प्रशासन जबाबदार नसून दोन्ही महापालिकांमधील तत्कालीन व सध्याचे सत्ताधारीही कारणीभुत आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ‘पीएमपी’कडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्रवासी संघटना करतात. ---------------