शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

रोगाच्या भीतीने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:44 AM

दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे फळबागा, वेलवर्गीय पिकांवर भुरी, मर या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी जिल्ह्यातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

बारामती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे फळबागा, वेलवर्गीय पिकांवर भुरी, मर या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी जिल्ह्यातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याचे आवाहन कृषितज्ज्ञांच्या वतीने केले आहे.जिल्ह्यात सध्या रब्बीच्या ज्वारी, गहू या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. तसेच, ९० टक्के द्राक्षबागांमधील द्राक्षकाढणी पूर्ण झाली आहे. त्यामुुळे सध्या केवळ वेलवर्गीय पिके, उर्वरित द्राक्षबागांना ढगाळ हवामानाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. बारामती शहर परिसरात जानेवारीमध्ये १०.७ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती. तसेच, जानेवारीतच काही प्रमाणात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. वाढत्या थंडीचा,पावसाचा द्राक्षबागा, भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होण्याची टांगती तलवार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात बारामती परिसरात पाऊस झाला. त्याचाही फटका द्राक्षउत्पादकांना बसण्याची भीती होती. ढगाळ हवामान, तुरळक पावसामुळे दुपारी १२ पर्यंत हवेत कमालीचा गारवा होता. मार्च महिन्यात पंधरवड्यानंतर पुन्हा ढगाळ हवामान निर्माण झाले आहे.बारामती, इंदापूर या तालुक्यांत द्राक्षबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. जवळपास ९० टक्के द्राक्षबागांची काढणी पूर्ण झाली आहे. उर्वरित १० टक्के बागांची काढणी सध्या सुरू आहे. द्राक्षांना दरदेखील सध्या चांगले मिळत आहेत. या १० टक्के बागांमध्ये सध्या पडणाºया ढगाळ हवामान, पावसाने द्राक्षांना तडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षीदेखील शेवटच्या महिन्यात ओखी वादळाचा फटका द्राक्षबागांना बसला होता. त्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीलाच घसरलेल्या तपमानाची टांगती तलवार द्राक्ष उत्पादक शेतकºयांवर होती.त्यानंतर पुन्हा हवामानबदलाच्या फेºयात द्राक्षबागा अडकल्या आहेत. द्राक्षांना तडे जाण्याबरोबरच द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीदेखील भीती आहे. याशिवाय भाजीपाला, कडधान्य पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. डाळिंबबागांवर वाढती थंडी, ढगाळ हवामान व पावसामुळे तेल्या रोगाचे सावट आहे. वातावरणातील या बदलाची परिस्थिती अशीच कायम राहिली, तर या पिकांच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.दोन दिवसांपासून हवामान बदलले आहे. बदललेल्या तपमानामुळे हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर भुरी, डाउनी या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. द्राक्षावर बुरशीजन्य रोगांची शक्यता अधिक आहे. पिकांची अन्नप्रक्रिया मंदावली आहे. उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल, मका या पिकांचे पोषण कु मकुवत होण्याची भीती आहे. शेतकºयांनी बुरशीनाशक, गंधकाचा वापर करावा. वेलवर्गीय कलिंगड, खरबूज, दोडका यासारख्या पिकांवर ट्रायकोडर्मासारख्या जैविक मित्र बुरशीचा वापर करावा. या काळात पाण्याचे नियोजन पिकांची गरज पाहून करावे. मररोगाला हे पोषक वातावरण आहे. गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी फळझाडे, वेलवर्गीय पिकांवर करावी. डॉ. मिलिंद जोशी,कृषिविज्ञान केंद्रप्रमुख