शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मुळशी प्रादेशिककडून २० गावांचे पाणी बंद, थकबाकीमुळे कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:26 IST

मुळशी प्रादेशिक योजनेच्या पाण्याचा लाभ घेणाºया काही ग्रामपंचायतींनी सुरुवातीपासून आतापर्यंत, तर काही ग्रामपंचायतींनी काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या सर्व ग्रामपंचातींचा मुळशी प्रादेशिककडून १ जानेवारीपासून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पौड - मुळशी प्रादेशिक योजनेच्या पाण्याचा लाभ घेणाºया काही ग्रामपंचायतींनी सुरुवातीपासून आतापर्यंत, तर काही ग्रामपंचायतींनी काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या सर्व ग्रामपंचातींचा मुळशी प्रादेशिककडून १ जानेवारीपासून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यासंबंधीची लेखी सूचना तत्पूर्वी मुळशी प्राधिकरण कार्यालयाकडून संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आली होती. थकबाकी जमा न झाल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.मुळशी प्रादेशिककडून पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर पिरंगुट, पौड या ठिकाणच्या ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पिरंगुट, पौड, कासार आंबोली या ठिकाणी घरांच्या चाळी बांधून त्या भाड्याने देण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळे या ठिकाणी या गावांमध्ये हजारो भाडेकरू वास्तव्यास आहेत.विशेषत:, पिरंगुट हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव असल्याने तेथे बहुतांश मंडळी भाडेकरू म्हणून राहतात. ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा काही कारणाने बंद झाला, तर घरमालकाकडून पर्यायी पाण्याची व्यवस्था होत नसल्याने अनेकांना खासगी टँकर किंवा बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. काही ठिकाणी तर ५ ते १० रुपयांना पाण्याचा एक हंडा विकत घ्यावा लागत आहे.मुळशी तालुक्यात सर्वाधिक ४५ लाख रुपयांची थकबाकी असणारी ग्रामपंचायत म्हणून पौडचा पहिला क्रमांक, तर २७ लाख रुपये थकबाकी असणारी पिरंगुट ही दुसºया क्रमांकाची थकबाकीदार ग्रामपंचायत ठरली आहे. काही ग्रामपंचायती नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करतात; पण ते पैसे थकबाकी भरण्यासाठी न वापरता अन्य कामांसाठी वापरतात.आतापर्यंत एकूण २० ग्रामपंचायतींची मिळून सुमारे १ कोटी ३१ लाख रुपये थकबाकी असून, त्यातील काही ग्रामपंचायतींनी थकबाकी जमा करण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी खूपच वाढली असल्याने हा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती शाखा अभियंता विश्वनाथ फुलारी यांनी दिली. नागरिकांनी आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत भरून सहकार्य करावे. ग्रामपंचयातींनी जमा झालेल्या रकमेतून ताबडतोब थकीत पाणीपट्टी मुळशी प्राधिकरणाकडे भरावी; अन्यथा ही थकबाकी अशीच वाढत गेल्यास कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेली ही पाणी योजना कायमची बंद पडण्याची वेळ येऊ शकते.त्यामुळे नागरिक व ग्रामपंचायतींनी सहकार्य करण्याचे आवाहन मुळशी प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे