शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

मुळशी प्रादेशिककडून २० गावांचे पाणी बंद, थकबाकीमुळे कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:26 IST

मुळशी प्रादेशिक योजनेच्या पाण्याचा लाभ घेणाºया काही ग्रामपंचायतींनी सुरुवातीपासून आतापर्यंत, तर काही ग्रामपंचायतींनी काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या सर्व ग्रामपंचातींचा मुळशी प्रादेशिककडून १ जानेवारीपासून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पौड - मुळशी प्रादेशिक योजनेच्या पाण्याचा लाभ घेणाºया काही ग्रामपंचायतींनी सुरुवातीपासून आतापर्यंत, तर काही ग्रामपंचायतींनी काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या सर्व ग्रामपंचातींचा मुळशी प्रादेशिककडून १ जानेवारीपासून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यासंबंधीची लेखी सूचना तत्पूर्वी मुळशी प्राधिकरण कार्यालयाकडून संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आली होती. थकबाकी जमा न झाल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.मुळशी प्रादेशिककडून पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर पिरंगुट, पौड या ठिकाणच्या ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पिरंगुट, पौड, कासार आंबोली या ठिकाणी घरांच्या चाळी बांधून त्या भाड्याने देण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळे या ठिकाणी या गावांमध्ये हजारो भाडेकरू वास्तव्यास आहेत.विशेषत:, पिरंगुट हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव असल्याने तेथे बहुतांश मंडळी भाडेकरू म्हणून राहतात. ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा काही कारणाने बंद झाला, तर घरमालकाकडून पर्यायी पाण्याची व्यवस्था होत नसल्याने अनेकांना खासगी टँकर किंवा बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. काही ठिकाणी तर ५ ते १० रुपयांना पाण्याचा एक हंडा विकत घ्यावा लागत आहे.मुळशी तालुक्यात सर्वाधिक ४५ लाख रुपयांची थकबाकी असणारी ग्रामपंचायत म्हणून पौडचा पहिला क्रमांक, तर २७ लाख रुपये थकबाकी असणारी पिरंगुट ही दुसºया क्रमांकाची थकबाकीदार ग्रामपंचायत ठरली आहे. काही ग्रामपंचायती नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करतात; पण ते पैसे थकबाकी भरण्यासाठी न वापरता अन्य कामांसाठी वापरतात.आतापर्यंत एकूण २० ग्रामपंचायतींची मिळून सुमारे १ कोटी ३१ लाख रुपये थकबाकी असून, त्यातील काही ग्रामपंचायतींनी थकबाकी जमा करण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी खूपच वाढली असल्याने हा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती शाखा अभियंता विश्वनाथ फुलारी यांनी दिली. नागरिकांनी आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत भरून सहकार्य करावे. ग्रामपंचयातींनी जमा झालेल्या रकमेतून ताबडतोब थकीत पाणीपट्टी मुळशी प्राधिकरणाकडे भरावी; अन्यथा ही थकबाकी अशीच वाढत गेल्यास कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेली ही पाणी योजना कायमची बंद पडण्याची वेळ येऊ शकते.त्यामुळे नागरिक व ग्रामपंचायतींनी सहकार्य करण्याचे आवाहन मुळशी प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे