शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुळशी प्रादेशिककडून २० गावांचे पाणी बंद, थकबाकीमुळे कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:26 IST

मुळशी प्रादेशिक योजनेच्या पाण्याचा लाभ घेणाºया काही ग्रामपंचायतींनी सुरुवातीपासून आतापर्यंत, तर काही ग्रामपंचायतींनी काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या सर्व ग्रामपंचातींचा मुळशी प्रादेशिककडून १ जानेवारीपासून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पौड - मुळशी प्रादेशिक योजनेच्या पाण्याचा लाभ घेणाºया काही ग्रामपंचायतींनी सुरुवातीपासून आतापर्यंत, तर काही ग्रामपंचायतींनी काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या सर्व ग्रामपंचातींचा मुळशी प्रादेशिककडून १ जानेवारीपासून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यासंबंधीची लेखी सूचना तत्पूर्वी मुळशी प्राधिकरण कार्यालयाकडून संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आली होती. थकबाकी जमा न झाल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला.मुळशी प्रादेशिककडून पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर पिरंगुट, पौड या ठिकाणच्या ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पिरंगुट, पौड, कासार आंबोली या ठिकाणी घरांच्या चाळी बांधून त्या भाड्याने देण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळे या ठिकाणी या गावांमध्ये हजारो भाडेकरू वास्तव्यास आहेत.विशेषत:, पिरंगुट हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव असल्याने तेथे बहुतांश मंडळी भाडेकरू म्हणून राहतात. ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा काही कारणाने बंद झाला, तर घरमालकाकडून पर्यायी पाण्याची व्यवस्था होत नसल्याने अनेकांना खासगी टँकर किंवा बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. काही ठिकाणी तर ५ ते १० रुपयांना पाण्याचा एक हंडा विकत घ्यावा लागत आहे.मुळशी तालुक्यात सर्वाधिक ४५ लाख रुपयांची थकबाकी असणारी ग्रामपंचायत म्हणून पौडचा पहिला क्रमांक, तर २७ लाख रुपये थकबाकी असणारी पिरंगुट ही दुसºया क्रमांकाची थकबाकीदार ग्रामपंचायत ठरली आहे. काही ग्रामपंचायती नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करतात; पण ते पैसे थकबाकी भरण्यासाठी न वापरता अन्य कामांसाठी वापरतात.आतापर्यंत एकूण २० ग्रामपंचायतींची मिळून सुमारे १ कोटी ३१ लाख रुपये थकबाकी असून, त्यातील काही ग्रामपंचायतींनी थकबाकी जमा करण्यास सुरुवात केली आहे. थकबाकी खूपच वाढली असल्याने हा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती शाखा अभियंता विश्वनाथ फुलारी यांनी दिली. नागरिकांनी आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत भरून सहकार्य करावे. ग्रामपंचयातींनी जमा झालेल्या रकमेतून ताबडतोब थकीत पाणीपट्टी मुळशी प्राधिकरणाकडे भरावी; अन्यथा ही थकबाकी अशीच वाढत गेल्यास कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेली ही पाणी योजना कायमची बंद पडण्याची वेळ येऊ शकते.त्यामुळे नागरिक व ग्रामपंचायतींनी सहकार्य करण्याचे आवाहन मुळशी प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे