शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

ग्रामसेवकांच्या संपामुळे हवेली तालुक्यातील गावगाडा झाला ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 16:23 IST

संपूर्ण महाराष्ट्रात २२ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली असून गावातील नागरिकांना शासकीय व वैयक्तिक कामांसाठी लागणारे दाखले मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रासह हवेली तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात २२ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली असून गावातील नागरिकांना शासकीय व वैयक्तिक कामांसाठी लागणारे दाखले मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रासह हवेली तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

        ग्रामसेवकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील २२ हजार ग्रामसेवकांनी सविस्तर मागण्या पूर्ण न झाल्यास संप करण्यात येणार असल्याची कल्पना २२ जुलै रोजी शासनाला दिली होती. ग्रामसेवकांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या नसल्याने ९ ऑगस्ट पासून असहकार आंदोलन सुरु केले. मात्र तरीही शासनाने निर्णय न घेतल्याने २२ ऑगस्ट पासून ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे स्वच्छ भारत सर्वेक्षणाचे काम थांबलेले असून , नागरिकांना विविध प्रमाणपत्र मिळत नाही, शासन स्तरावर कोणत्याही विभागाला अहवाल प्राप्त होत नाही,  शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करणे,वृक्षलागवड व वृक्षसंगोपन,अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे कामे व आराखडा थांबलेला आहे, विविध लाभाच्या योजना अशी सर्व शासकीय कामे शासनाच्या ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबतच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत थांबुन राहिलेली आहेत. यावेळी मधुकर दाते,कानिफनाथ थोरात,संतोष नेवसे,अंकुश जाधव,सविता भुजबळ, अनिल बगाटे, गणेश वालकोळी,कैलास कोळी, धनराज श्रीरसागर,प्रल्हाद पवार,हरिभाऊ पवार,पोपटराव वेताळ,ज्ञानेश्वर पोटे,नवनाथ झोळ,नंदकुमार चव्हाण,माधवी हरपळे व अर्चना चिंधे आदी ग्रामसेवक उपस्थित होते. 

शासनाकडे मुख्य मागण्या१. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करुन पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करणे२. ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करणे३. सुधारित प्रवासभत्ता,ग्रामसेवक शैक्षणिक पात्रता पदविका 12 वी बदलुन पदवीधर करणे४. २०११च्या जनगणणेनुसार ग्रामविकास अधिकारी सजे निर्माण करणे५. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दुर करणे६.  सन 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागु करणे७. आदर्श ग्रामसेवक एक वेतनवाढ दिली जावी८. ग्रामसेवकांवरील अतिरिक्त इतर विभागाच्या कामाचा बोजा करणे

2017 मधील आंदोलन आम्ही पुढे घेऊन जात असताना आता सदर मागण्यांना निर्णायक स्वरुप प्राप्त होणे गरजेचे आहे. ग्रामसेवक राज्य संघटनेची मंत्रालय स्तरावर सकारात्मक चर्चा सुरु असुन आंदोलनावर लवकरच तोडगा निघून मागण्यांबाबत निर्णय अपेक्षित आहे. - अनिल कुंभार,राज्य कार्याध्यक्ष,ग्रामसेवक संघटना.

ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर सकारात्मक चर्चा सुरु असताना ग्रामसेवकांना आंदोलनापासुन परावृत्त होणेसाठी नो वर्क- नो पेमेंटची भिती जिल्हा स्तरीय प्रशासनाकडुन दाखविण्यात येत असून प्रत्यक्षात मागण्यांना निर्णायक स्वरुप येत नाही तोपर्यंत माघार नाही- बाळासाहेब गावडे, तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना, हवेली

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत