शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

ग्रामसेवकांच्या संपामुळे हवेली तालुक्यातील गावगाडा झाला ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 16:23 IST

संपूर्ण महाराष्ट्रात २२ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली असून गावातील नागरिकांना शासकीय व वैयक्तिक कामांसाठी लागणारे दाखले मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रासह हवेली तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात २२ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली असून गावातील नागरिकांना शासकीय व वैयक्तिक कामांसाठी लागणारे दाखले मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रासह हवेली तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

        ग्रामसेवकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील २२ हजार ग्रामसेवकांनी सविस्तर मागण्या पूर्ण न झाल्यास संप करण्यात येणार असल्याची कल्पना २२ जुलै रोजी शासनाला दिली होती. ग्रामसेवकांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या नसल्याने ९ ऑगस्ट पासून असहकार आंदोलन सुरु केले. मात्र तरीही शासनाने निर्णय न घेतल्याने २२ ऑगस्ट पासून ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे स्वच्छ भारत सर्वेक्षणाचे काम थांबलेले असून , नागरिकांना विविध प्रमाणपत्र मिळत नाही, शासन स्तरावर कोणत्याही विभागाला अहवाल प्राप्त होत नाही,  शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करणे,वृक्षलागवड व वृक्षसंगोपन,अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे कामे व आराखडा थांबलेला आहे, विविध लाभाच्या योजना अशी सर्व शासकीय कामे शासनाच्या ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबतच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत थांबुन राहिलेली आहेत. यावेळी मधुकर दाते,कानिफनाथ थोरात,संतोष नेवसे,अंकुश जाधव,सविता भुजबळ, अनिल बगाटे, गणेश वालकोळी,कैलास कोळी, धनराज श्रीरसागर,प्रल्हाद पवार,हरिभाऊ पवार,पोपटराव वेताळ,ज्ञानेश्वर पोटे,नवनाथ झोळ,नंदकुमार चव्हाण,माधवी हरपळे व अर्चना चिंधे आदी ग्रामसेवक उपस्थित होते. 

शासनाकडे मुख्य मागण्या१. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करुन पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करणे२. ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करणे३. सुधारित प्रवासभत्ता,ग्रामसेवक शैक्षणिक पात्रता पदविका 12 वी बदलुन पदवीधर करणे४. २०११च्या जनगणणेनुसार ग्रामविकास अधिकारी सजे निर्माण करणे५. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दुर करणे६.  सन 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागु करणे७. आदर्श ग्रामसेवक एक वेतनवाढ दिली जावी८. ग्रामसेवकांवरील अतिरिक्त इतर विभागाच्या कामाचा बोजा करणे

2017 मधील आंदोलन आम्ही पुढे घेऊन जात असताना आता सदर मागण्यांना निर्णायक स्वरुप प्राप्त होणे गरजेचे आहे. ग्रामसेवक राज्य संघटनेची मंत्रालय स्तरावर सकारात्मक चर्चा सुरु असुन आंदोलनावर लवकरच तोडगा निघून मागण्यांबाबत निर्णय अपेक्षित आहे. - अनिल कुंभार,राज्य कार्याध्यक्ष,ग्रामसेवक संघटना.

ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर सकारात्मक चर्चा सुरु असताना ग्रामसेवकांना आंदोलनापासुन परावृत्त होणेसाठी नो वर्क- नो पेमेंटची भिती जिल्हा स्तरीय प्रशासनाकडुन दाखविण्यात येत असून प्रत्यक्षात मागण्यांना निर्णायक स्वरुप येत नाही तोपर्यंत माघार नाही- बाळासाहेब गावडे, तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना, हवेली

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत