शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जादा पाणी मागायला धजावेना महापालिका; मंत्र्यांपुढे पदाधिकारी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 06:02 IST

शहरासाठी १ हजार ३५० एमएलडी पाणीच मिळणार आहे, असे ठासून सांगणाऱ्या महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने पाटबंधारे खात्याला ‘दिवाळीपर्यंत थांबा, त्यानंतर आम्ही १ हजार १५० एमएलडीच पाणी घेऊ’ अशी विनंती केली आहे.

पुणे : शहरासाठी १ हजार ३५० एमएलडी पाणीच मिळणार आहे, असे ठासून सांगणाऱ्या महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने पाटबंधारे खात्याला ‘दिवाळीपर्यंत थांबा, त्यानंतर आम्ही १ हजार १५० एमएलडीच पाणी घेऊ’ अशी विनंती केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे महापालिकेतील पदाधिकारी हतबल झाल्याचेच चित्र स्पष्ट झाले आहे. हे पत्र अतिरिक्त आयुक्तांनी पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांना पाठवले आहे.त्याआधी पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवले होते. त्यात कालवा समितीत महापालिकेने १ हजार १५० एमएलडी पाणी घेण्याचा निर्णय झाला आहे, त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा कारवाई करावी लागेल, अशी तंबीच दिली आहे. महापालिका प्रशासनाने त्या पत्राची दखलच घेतली नाही. पाणी उचलणे सुरूच राहिले. त्यामागे ते काहीच करणार नाहीत, अशीच खात्री होती. मात्र, यावेळी पाटबंधारे विभागाने थेट पोलीस घेऊनच पंप बंदच करून टाकले. त्याची माहितीही महापालिकेला दिली नाही.पंप बंद होऊन विरोधक तसेच पाणी न मिळालेल्या भागाचा रोष वाढू लागल्यावर पदाधिकाºयांना जाग आली. मात्र त्यातही सूसंगती दिसत नाही. सांगताना महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच पदाधिकाºयांनी महापालिकेच्या पाण्यात कपात झालेली नाही. आधी घेत होतो तेवढेच म्हणजे १ हजार ३५० एमएलडीच पाणी मिळणार आहे, असे सांगितले. प्रत्यक्षात महापालिकेने पाटबंधारे खात्याला पाठवलेले पत्र मात्र दिवाळीपर्यंत थांबा व नंतर आम्हीच १ हजार १५० एमएलडी पाणी घेऊ, असे विनंती करणारेच आहे.अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना हे पत्र लिहिले आहे. तेही त्यांचे कालवा समितीच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करा, अशी तंबी देणाºया पत्रानंतर बºयाच दिवसांनी लिहिलेले आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहे. अशावेळी पाणी पुरवठा कमी झाला तर नागरिकांचा रोष होईल. आम्ही १ हजार १५० एमएलडी पाण्याच्या वितरणाचे नियोजन करू व दिवाळीनंतर तेवढेच पाणी घेऊ, असे त्यात स्पष्टपणे म्हटले आहे.

टॅग्स :Waterपाणी