शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जादा पाणी मागायला धजावेना महापालिका; मंत्र्यांपुढे पदाधिकारी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 06:02 IST

शहरासाठी १ हजार ३५० एमएलडी पाणीच मिळणार आहे, असे ठासून सांगणाऱ्या महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने पाटबंधारे खात्याला ‘दिवाळीपर्यंत थांबा, त्यानंतर आम्ही १ हजार १५० एमएलडीच पाणी घेऊ’ अशी विनंती केली आहे.

पुणे : शहरासाठी १ हजार ३५० एमएलडी पाणीच मिळणार आहे, असे ठासून सांगणाऱ्या महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने पाटबंधारे खात्याला ‘दिवाळीपर्यंत थांबा, त्यानंतर आम्ही १ हजार १५० एमएलडीच पाणी घेऊ’ अशी विनंती केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे महापालिकेतील पदाधिकारी हतबल झाल्याचेच चित्र स्पष्ट झाले आहे. हे पत्र अतिरिक्त आयुक्तांनी पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांना पाठवले आहे.त्याआधी पाटबंधारे विभागाने महापालिकेला पत्र पाठवले होते. त्यात कालवा समितीत महापालिकेने १ हजार १५० एमएलडी पाणी घेण्याचा निर्णय झाला आहे, त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा कारवाई करावी लागेल, अशी तंबीच दिली आहे. महापालिका प्रशासनाने त्या पत्राची दखलच घेतली नाही. पाणी उचलणे सुरूच राहिले. त्यामागे ते काहीच करणार नाहीत, अशीच खात्री होती. मात्र, यावेळी पाटबंधारे विभागाने थेट पोलीस घेऊनच पंप बंदच करून टाकले. त्याची माहितीही महापालिकेला दिली नाही.पंप बंद होऊन विरोधक तसेच पाणी न मिळालेल्या भागाचा रोष वाढू लागल्यावर पदाधिकाºयांना जाग आली. मात्र त्यातही सूसंगती दिसत नाही. सांगताना महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच पदाधिकाºयांनी महापालिकेच्या पाण्यात कपात झालेली नाही. आधी घेत होतो तेवढेच म्हणजे १ हजार ३५० एमएलडीच पाणी मिळणार आहे, असे सांगितले. प्रत्यक्षात महापालिकेने पाटबंधारे खात्याला पाठवलेले पत्र मात्र दिवाळीपर्यंत थांबा व नंतर आम्हीच १ हजार १५० एमएलडी पाणी घेऊ, असे विनंती करणारेच आहे.अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना हे पत्र लिहिले आहे. तेही त्यांचे कालवा समितीच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करा, अशी तंबी देणाºया पत्रानंतर बºयाच दिवसांनी लिहिलेले आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहे. अशावेळी पाणी पुरवठा कमी झाला तर नागरिकांचा रोष होईल. आम्ही १ हजार १५० एमएलडी पाण्याच्या वितरणाचे नियोजन करू व दिवाळीनंतर तेवढेच पाणी घेऊ, असे त्यात स्पष्टपणे म्हटले आहे.

टॅग्स :Waterपाणी