शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 00:34 IST

आकाशातील ढगाळ वातावरणामुळे हवामान दमट होऊ लागले आहे. रब्बीला पोषक थंडी अजूनही पडत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

शेलपिंपळगाव  - आकाशातील ढगाळ वातावरणामुळे हवामान दमट होऊ लागले आहे. रब्बीला पोषक थंडी अजूनही पडत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. हातातोंडाशी आलेले रब्बीचे पीक वाचविण्यासाठी शेतकरी पिकांना रासायनिक औषधांचा डोस देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.चालू वर्षी खरीप; तसेच रब्बी हंगामात दूषित हवामानाशी दोनहात करीत पिकांचे उत्पादन काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे; मात्र अशा विपरीत परिस्थितीने बळीराजाचे शेतीविषयक आर्थिक बजेट पूर्ण कोलमडून शेतकरी चिंतातूर होऊ लागला आहे. रब्बी हंगामातील कांदा पिकावर लागवडीपासून आजपर्यंत दोन ते तीन वेळा रासायनिक औषधांची फवारणी शेतकºयांनी केली आहे. तरीसुद्धा कांद्यावरील रोगराईचे सावट काही केल्या दूर होत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. पर्यायी पिकांवर चौथ्यांदा फवारणीचा फेरा शेतकºयांनी सुरू केला आहे.खेडच्या पूर्व; तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने खरीप व रब्बीच्या मुख्य दोन हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. विशेषत: या हंगामात कांदा, ज्वारी, मका, फूलझाडे, पालेभाज्या व फळपिकांकडे शेतकरी अधिक आकर्षित झालेला असून, या पिकांव्यातिरिक्त कोबी, फ्लॉवर, मका, पालेभाज्या, वेलवर्गीय व तोडीव पिकांची शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे; मात्र बहुतांशी सर्वच पिकांना लहरी हवामानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.आगाप कांदा पीक अगदीच लागवडीपासून धोक्यात असून, विविध रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिके खराब होऊन वाढ खुंटली आहे. दमट वातावरणामुळे पिकांवर करपा, मावा व पीळ रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे आर्थिक झळ सोसून महागडी रासायनिक औषधांची फवारणी शेतकरी करू लागला आहे.रब्बी हंगामाच्या दृष्टीने ढगाळ वातावरण नेहमीच धोकादायक असते. थंड वातावरण पिकांच्या; तसेच उत्पादनवाढीच्या दृष्टीने अनुकूल असते. चालू हंगामात ढगाळ वातावरण सारखे-सारखे पसरत असल्याने दमट हवामान होऊन त्याचा पिकांवर विपरीत परिणाम घडून येत असल्याने आर्थिक झळ सहन करून महागडी रासायनिक औषधे पिकांवर मारावी लागत आहे.- जानकू दौंडकर, शेलपिंपळगावप्रतीक्षा थंडीची...खेड; तसेच शिरूर तालुक्यात प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मुबलक पाणी ही शेतकºयांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे; मात्र हवामानाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता वातावरणातील थंडावाच पिकाला पोषक ठरणार आहे.तोडणीची पिकेही आजारी...रब्बी हंगामातील तोडीव पिकांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे बाजारभावही तेजीत आहेत. परिणामी मिरची, गवार, भेंडी, वालवर, वांगी आदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहे;परंतु तोडीव पिकांही रोगराईच्या सावटाखाली असल्याने उत्पादनात घट घडून येऊ लागली आहे.

टॅग्स :agricultureशेतीPuneपुणे