शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 00:34 IST

आकाशातील ढगाळ वातावरणामुळे हवामान दमट होऊ लागले आहे. रब्बीला पोषक थंडी अजूनही पडत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

शेलपिंपळगाव  - आकाशातील ढगाळ वातावरणामुळे हवामान दमट होऊ लागले आहे. रब्बीला पोषक थंडी अजूनही पडत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. हातातोंडाशी आलेले रब्बीचे पीक वाचविण्यासाठी शेतकरी पिकांना रासायनिक औषधांचा डोस देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.चालू वर्षी खरीप; तसेच रब्बी हंगामात दूषित हवामानाशी दोनहात करीत पिकांचे उत्पादन काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे; मात्र अशा विपरीत परिस्थितीने बळीराजाचे शेतीविषयक आर्थिक बजेट पूर्ण कोलमडून शेतकरी चिंतातूर होऊ लागला आहे. रब्बी हंगामातील कांदा पिकावर लागवडीपासून आजपर्यंत दोन ते तीन वेळा रासायनिक औषधांची फवारणी शेतकºयांनी केली आहे. तरीसुद्धा कांद्यावरील रोगराईचे सावट काही केल्या दूर होत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. पर्यायी पिकांवर चौथ्यांदा फवारणीचा फेरा शेतकºयांनी सुरू केला आहे.खेडच्या पूर्व; तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने खरीप व रब्बीच्या मुख्य दोन हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. विशेषत: या हंगामात कांदा, ज्वारी, मका, फूलझाडे, पालेभाज्या व फळपिकांकडे शेतकरी अधिक आकर्षित झालेला असून, या पिकांव्यातिरिक्त कोबी, फ्लॉवर, मका, पालेभाज्या, वेलवर्गीय व तोडीव पिकांची शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे; मात्र बहुतांशी सर्वच पिकांना लहरी हवामानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.आगाप कांदा पीक अगदीच लागवडीपासून धोक्यात असून, विविध रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिके खराब होऊन वाढ खुंटली आहे. दमट वातावरणामुळे पिकांवर करपा, मावा व पीळ रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे आर्थिक झळ सोसून महागडी रासायनिक औषधांची फवारणी शेतकरी करू लागला आहे.रब्बी हंगामाच्या दृष्टीने ढगाळ वातावरण नेहमीच धोकादायक असते. थंड वातावरण पिकांच्या; तसेच उत्पादनवाढीच्या दृष्टीने अनुकूल असते. चालू हंगामात ढगाळ वातावरण सारखे-सारखे पसरत असल्याने दमट हवामान होऊन त्याचा पिकांवर विपरीत परिणाम घडून येत असल्याने आर्थिक झळ सहन करून महागडी रासायनिक औषधे पिकांवर मारावी लागत आहे.- जानकू दौंडकर, शेलपिंपळगावप्रतीक्षा थंडीची...खेड; तसेच शिरूर तालुक्यात प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मुबलक पाणी ही शेतकºयांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे; मात्र हवामानाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता वातावरणातील थंडावाच पिकाला पोषक ठरणार आहे.तोडणीची पिकेही आजारी...रब्बी हंगामातील तोडीव पिकांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे बाजारभावही तेजीत आहेत. परिणामी मिरची, गवार, भेंडी, वालवर, वांगी आदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहे;परंतु तोडीव पिकांही रोगराईच्या सावटाखाली असल्याने उत्पादनात घट घडून येऊ लागली आहे.

टॅग्स :agricultureशेतीPuneपुणे