शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 00:34 IST

आकाशातील ढगाळ वातावरणामुळे हवामान दमट होऊ लागले आहे. रब्बीला पोषक थंडी अजूनही पडत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

शेलपिंपळगाव  - आकाशातील ढगाळ वातावरणामुळे हवामान दमट होऊ लागले आहे. रब्बीला पोषक थंडी अजूनही पडत नसल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. हातातोंडाशी आलेले रब्बीचे पीक वाचविण्यासाठी शेतकरी पिकांना रासायनिक औषधांचा डोस देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.चालू वर्षी खरीप; तसेच रब्बी हंगामात दूषित हवामानाशी दोनहात करीत पिकांचे उत्पादन काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे; मात्र अशा विपरीत परिस्थितीने बळीराजाचे शेतीविषयक आर्थिक बजेट पूर्ण कोलमडून शेतकरी चिंतातूर होऊ लागला आहे. रब्बी हंगामातील कांदा पिकावर लागवडीपासून आजपर्यंत दोन ते तीन वेळा रासायनिक औषधांची फवारणी शेतकºयांनी केली आहे. तरीसुद्धा कांद्यावरील रोगराईचे सावट काही केल्या दूर होत नसल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. पर्यायी पिकांवर चौथ्यांदा फवारणीचा फेरा शेतकºयांनी सुरू केला आहे.खेडच्या पूर्व; तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने खरीप व रब्बीच्या मुख्य दोन हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. विशेषत: या हंगामात कांदा, ज्वारी, मका, फूलझाडे, पालेभाज्या व फळपिकांकडे शेतकरी अधिक आकर्षित झालेला असून, या पिकांव्यातिरिक्त कोबी, फ्लॉवर, मका, पालेभाज्या, वेलवर्गीय व तोडीव पिकांची शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे; मात्र बहुतांशी सर्वच पिकांना लहरी हवामानाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.आगाप कांदा पीक अगदीच लागवडीपासून धोक्यात असून, विविध रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पिके खराब होऊन वाढ खुंटली आहे. दमट वातावरणामुळे पिकांवर करपा, मावा व पीळ रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे आर्थिक झळ सोसून महागडी रासायनिक औषधांची फवारणी शेतकरी करू लागला आहे.रब्बी हंगामाच्या दृष्टीने ढगाळ वातावरण नेहमीच धोकादायक असते. थंड वातावरण पिकांच्या; तसेच उत्पादनवाढीच्या दृष्टीने अनुकूल असते. चालू हंगामात ढगाळ वातावरण सारखे-सारखे पसरत असल्याने दमट हवामान होऊन त्याचा पिकांवर विपरीत परिणाम घडून येत असल्याने आर्थिक झळ सहन करून महागडी रासायनिक औषधे पिकांवर मारावी लागत आहे.- जानकू दौंडकर, शेलपिंपळगावप्रतीक्षा थंडीची...खेड; तसेच शिरूर तालुक्यात प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मुबलक पाणी ही शेतकºयांसाठी जमेची बाजू ठरत आलेली आहे; मात्र हवामानाची साथ मिळत नसल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता वातावरणातील थंडावाच पिकाला पोषक ठरणार आहे.तोडणीची पिकेही आजारी...रब्बी हंगामातील तोडीव पिकांना बाजारात चांगली मागणी असल्याने त्यांचे बाजारभावही तेजीत आहेत. परिणामी मिरची, गवार, भेंडी, वालवर, वांगी आदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहे;परंतु तोडीव पिकांही रोगराईच्या सावटाखाली असल्याने उत्पादनात घट घडून येऊ लागली आहे.

टॅग्स :agricultureशेतीPuneपुणे