शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्र अस्वस्थ तर भाजपा सुडाच्या राजकारणात व्यस्त: सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 16:40 IST

भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार ईडीच्या माध्यमातून सुडाच्या राजकारणात व्यस्त...

दौंड (पुणे) : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत जनता अस्वस्थ आहे; मात्र भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार ईडीच्या माध्यमातून सुडाच्या राजकारणात व्यस्त असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, शासन आपल्या दारी यासह अन्य काही माध्यमातून महाराष्ट्रातील सरकार केवळ प्रसिद्धी करून टिमकी वाजवत आहे; मात्र दुष्काळी दौरा करायला त्यांना वेळ नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल. राज्यात पाऊस नाही, तेव्हा शासनाने शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी केली पाहिजे. मराठा, धनगर समाज यासह अन्य काही समाजांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सध्याचे शासन अपयशी ठरलेले आहे. जनतेचा उद्रेक वाढत चाललेला आहे. विरोधकांवर ईडीची कारवाई केली जाते, मग भाजपसारख्या पक्षात ईडीची कारवाई करण्याइतपत राजकीय मंडळी नाही का, असा प्रश्न उपस्थित करून भाजपचे कारनामे सत्तेपुढे दडपले जात आहेत. तेव्हा भाजपचे दडपलेले कारनामे जनता रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.

 पुढे बोलताना त्या म्हणाल्या, शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर केवळ पैशांची उधळपट्टी करून जाहिरातबाजी केली जात आहे. मात्र जनतेच्या प्रश्नांकडे सोयीस्कररीत्या सध्याचे शासन दुर्लक्ष करीत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी कुठलेही नियोजन नसलेले हे सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरलेले असून या सरकारला निश्चितच जनता विचारेल. भाजपने प्रादेशिक पक्षात फोडाफोडीचे राजकारण करून राजकारणासह समाजात अस्वस्थता निर्माण केली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसdaund-acदौंड