शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दुष्काळी परिस्थिती, महाराष्ट्र अस्वस्थ तर भाजपा सुडाच्या राजकारणात व्यस्त: सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 16:40 IST

भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार ईडीच्या माध्यमातून सुडाच्या राजकारणात व्यस्त...

दौंड (पुणे) : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत जनता अस्वस्थ आहे; मात्र भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार ईडीच्या माध्यमातून सुडाच्या राजकारणात व्यस्त असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, शासन आपल्या दारी यासह अन्य काही माध्यमातून महाराष्ट्रातील सरकार केवळ प्रसिद्धी करून टिमकी वाजवत आहे; मात्र दुष्काळी दौरा करायला त्यांना वेळ नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल. राज्यात पाऊस नाही, तेव्हा शासनाने शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफी केली पाहिजे. मराठा, धनगर समाज यासह अन्य काही समाजांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सध्याचे शासन अपयशी ठरलेले आहे. जनतेचा उद्रेक वाढत चाललेला आहे. विरोधकांवर ईडीची कारवाई केली जाते, मग भाजपसारख्या पक्षात ईडीची कारवाई करण्याइतपत राजकीय मंडळी नाही का, असा प्रश्न उपस्थित करून भाजपचे कारनामे सत्तेपुढे दडपले जात आहेत. तेव्हा भाजपचे दडपलेले कारनामे जनता रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.

 पुढे बोलताना त्या म्हणाल्या, शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर केवळ पैशांची उधळपट्टी करून जाहिरातबाजी केली जात आहे. मात्र जनतेच्या प्रश्नांकडे सोयीस्कररीत्या सध्याचे शासन दुर्लक्ष करीत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी कुठलेही नियोजन नसलेले हे सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरलेले असून या सरकारला निश्चितच जनता विचारेल. भाजपने प्रादेशिक पक्षात फोडाफोडीचे राजकारण करून राजकारणासह समाजात अस्वस्थता निर्माण केली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसdaund-acदौंड