शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

एक थेंबही पुण्याला देणार नाही

By admin | Updated: October 26, 2015 01:50 IST

भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मिटल्याशिवाय एक थेंबही पाणी पुणे महगनगरपालिकेला मिळणार नाही. जलवाहिनेचे मशिनरी फोडून बंद केलेले काम हे केवळ शासनाला जागे करण्यासाठी दिलेली समज होती

पाईट : भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मिटल्याशिवाय एक थेंबही पाणी पुणे महगनगरपालिकेला मिळणार नाही. जलवाहिनेचे मशिनरी फोडून बंद केलेले काम हे केवळ शासनाला जागे करण्यासाठी दिलेली समज होती. आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावयास भाग पाडू नका, असा इशारा आमदार सुरेश गोरे यांनी दिला.भामा आसखेड धरणातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची पुनर्वसनच्या नियोजनासठी व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी करंजविहिरे येथे बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, प्रकाश वाडेकर, चासकमान धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष कदम, भामा असखेड कृती समिती अध्यक्ष रोहिदास गडदे, चांगदेव शिवेकर, दत्ता रौंधळ, लक्ष्मण जाधव, महादेव लिंभोरे, सुभाष मांडेकर, दत्ता होले, आशा साकोरे, सुभाष डांगले, संभाजी कोळेकर, किरण मांजरे, सत्यवान नवले, गुलाब शिवेकर, सयाजी कोळेकर, नंदू शिवेकर, रामदास खेंगले, रमेश कोळेकर उपस्थित होते.गोरे म्हणाले, ज्यांना श्रेय घ्यायचे आहे, त्यांनी अवश्य घ्या. मला श्रेय घेण्यासाठी नाही, तर धरणग्रस्तांना न्याय देण्यासाठी लढा द्यायचा आहे. तर माजी आमदार दिलीप मोहिते यांचे नाव न घेता, ते म्हणाले, या पूर्वीच्या लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांचा विचार न करता धरणातील सर्व पाणीच विकून टाकले आहे. त्यांना आता या विषयावर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही.मागील आमदार व खासदार या लोकप्रतिनिधींनी भामा आसखेड धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याने पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रकल्पातील अवघ्या १४५ शेतकऱ्यांनापाणी देण्यासाठी पाणी शिल्लक नाही, असे कृती समितीचे अध्यक्ष रोहिदास गडदे यांनी सांगितले.दत्ता होले यांनी एक वर्षापूर्वी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्या वेळी केलेल्या मागण्यांवर ‘जैसे थे’ स्थिती असून त्या वेळच्या १२ मागण्या एक वर्षात पूर्ण होत नसेल, तर अगोदर पुनर्वसना नंतरच जलवाहिनीला सुरुवात ही मागणी कायम आहे, असे गोरे या वेळी म्हणाले. या वेळी प्रकाश वाडेकर, शिवाजी वर्पे, किरण मांजरे, दत्ता रौंधळ, रामदास खेंगले, किरण चोरघे, महादेव लिंभोरे, संभाजी कोळेकर, चांगदेव शिवेकर आदींनी भूमिका मांडली.