शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भोर तालुक्यात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 00:37 IST

धोमबलकवडी कालव्याला सोडलेले पाणी बंद होण्याची वेळ आली, तरी चिखलगाव-धोंडेवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नसल्याने व म्हकोशी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने चार गावांतील शेतीला व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे.

भोर : धोमबलकवडी कालव्याला सोडलेले पाणी बंद होण्याची वेळ आली, तरी चिखलगाव-धोंडेवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नसल्याने व म्हकोशी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने चार गावांतील शेतीला व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. पाणी सोडण्याबाबत वाई पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची शेतक-यांनी भेट घेऊन निवेदन देऊनही पाणी सोडत नसल्याने संतप्त शेतकºयांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.वीसगाव व आंबवडे खोºयातील बागायती पिके वाळून जात असल्याने शेतक-यांनी शेतीला पाण्याचे आर्वतन सोडण्याची मागणी केली होती त्यानुसार मागील आठवडाभरापासून धोमबलकवडी धरणाच्या कालव्यातून पाण्याचे आर्वतन सुरू आहे. मात्र, चिखलगाव येथील धोंडवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नाही. त्यामुळे टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हकोशी, चिखलगाव येथील बागायती पिके पाण्याआभावी जळू लागली आहेत. तर, म्हाकोशी बंधाºयातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने बंधाºयाच्या पाण्यावर असलेल्या टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हकोशी येथील नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे.टिटेघर गावातील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांनी आणि शेतकºयांनी वाई पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.त्या वेळी लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र अद्याप पाणी सोडलेले नसून धोमबलकवडी धरणाच्या कालव्याचे पाणी सोडण्याचे २८ डिसेंबरला बंद करण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास पोटचाºयांना पाणी मिळणार नसल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी पुरवठा योजना उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच अडचणीत येतील. यामुळे संतप्त शेतकरी नाराज झाले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान, धोमबलकवडी धरणाच्या पोटचाºयांना पाणी सोडावे म्हणून सोपान नवघणे, अरविंद जाधव, मोहन जेधे, राजेंद्र साळेकर, चंद्रकांत साळेकर यांनी व शेतकºयांनी आमदार संग्राम थोपटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. धोमबलकवडी धरणाच्या कालव्यातून शेतीला व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू असून कालव्यातून धोंडेवाडी येथील पोटचाºयांना पाणी सोडण्याच्या सूचना वाई पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. पाणी सुरू होईल, असे आमदार संग्राम थोपटेयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे