शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

भोर तालुक्यात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 00:37 IST

धोमबलकवडी कालव्याला सोडलेले पाणी बंद होण्याची वेळ आली, तरी चिखलगाव-धोंडेवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नसल्याने व म्हकोशी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने चार गावांतील शेतीला व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे.

भोर : धोमबलकवडी कालव्याला सोडलेले पाणी बंद होण्याची वेळ आली, तरी चिखलगाव-धोंडेवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नसल्याने व म्हकोशी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने चार गावांतील शेतीला व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. पाणी सोडण्याबाबत वाई पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची शेतक-यांनी भेट घेऊन निवेदन देऊनही पाणी सोडत नसल्याने संतप्त शेतकºयांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.वीसगाव व आंबवडे खोºयातील बागायती पिके वाळून जात असल्याने शेतक-यांनी शेतीला पाण्याचे आर्वतन सोडण्याची मागणी केली होती त्यानुसार मागील आठवडाभरापासून धोमबलकवडी धरणाच्या कालव्यातून पाण्याचे आर्वतन सुरू आहे. मात्र, चिखलगाव येथील धोंडवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नाही. त्यामुळे टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हकोशी, चिखलगाव येथील बागायती पिके पाण्याआभावी जळू लागली आहेत. तर, म्हाकोशी बंधाºयातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने बंधाºयाच्या पाण्यावर असलेल्या टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हकोशी येथील नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे.टिटेघर गावातील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांनी आणि शेतकºयांनी वाई पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.त्या वेळी लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र अद्याप पाणी सोडलेले नसून धोमबलकवडी धरणाच्या कालव्याचे पाणी सोडण्याचे २८ डिसेंबरला बंद करण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास पोटचाºयांना पाणी मिळणार नसल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी पुरवठा योजना उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच अडचणीत येतील. यामुळे संतप्त शेतकरी नाराज झाले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान, धोमबलकवडी धरणाच्या पोटचाºयांना पाणी सोडावे म्हणून सोपान नवघणे, अरविंद जाधव, मोहन जेधे, राजेंद्र साळेकर, चंद्रकांत साळेकर यांनी व शेतकºयांनी आमदार संग्राम थोपटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. धोमबलकवडी धरणाच्या कालव्यातून शेतीला व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू असून कालव्यातून धोंडेवाडी येथील पोटचाºयांना पाणी सोडण्याच्या सूचना वाई पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. पाणी सुरू होईल, असे आमदार संग्राम थोपटेयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे