शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील रस्ता पंधरा दिवसांत काढा

By admin | Updated: January 15, 2015 00:17 IST

सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात येणारा रस्ता पूररेषेबाहेर हलविण्याचा आदेश

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात येणारा रस्ता पूररेषेबाहेर हलविण्याचा आदेश दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने बुधवारी महापालिकेस दिले आहेत. तसेच, या आदेशानंतर पंधरा दिवसांच्या महापालिकेने रस्त्यासाठी बांधलेले सर्व साहित्य, तसेच टाकलेला राडारोडा काढून घ्यावा ़आणि त्याचा खर्च महापालिकेनेच करावा, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेस हा रस्ता उखडावा लागणार असून, त्यासाठी केलेला तब्बल १५ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च पाण्यात जाणार आहे. नदीपात्राच्या बाजूला बांधण्यात येणाऱ्या या २.३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याविरोधात पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवाडकर, अ‍ॅड. असिम सरोदे यांंनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्याच्या पहिल्या सुनावणीत महापालिकेने उर्वरित रस्त्याचे काम पूररेषेबाहेर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच तो इलेव्हेटेड (खांब उभारून पुलासारखा) करावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. परंतु महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष करून पूररेषेतच काम सुरू केले. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान असल्याने याचिकाकर्त्यांनी २९ जानेवारी २0१४ मध्ये न्यायालय अवमानप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी झाली. तसेच महापालिकेने आपले म्हणणेदेखील सादर केले होते. मात्र, न्यायालयाने गेल्या महिन्याभरापासून निकाल राखीव ठेवला होता. तो निकाल आज न्यायालयाने दिला आहे, तर अशा प्रकारे नदीत बांधकामे केल्याने उत्तराखंड, जम्मू काश्मीरप्रमाणे नैसर्गिक आपत्तीला निमंत्रण देता का, अशा शब्दांत लवादाने महापालिकेस खडसावले आहे. याबाबत बोलताना याचिकाकर्ते यादवाडकर म्हणाले की, या रस्त्यासाठी महापालिकेने नदीपात्रात टाकलेले डेब्रिज, राडारोडा, तसेच पूररेषेत बांधण्यात आलेली रिटेनिंग वॉल काढून टाकण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. हे काम महापालिकेने १५ दिवसांच्या आत सुरू करावयाचे आहे. तसेच त्याचा खर्चही महापालिकेने करायचा असून हे काम तीन महिन्यांच्या आत पूर्ण करायचे आहे. तसे न केल्यास ही जबाबदारी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्याची असेल. असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या कामासाठी सुमारे ३५ हजार ट्रक राडारोडा टाकण्यात आल्याने नदीची वहनक्षमता २५ टक्क्यांनी घटली असल्याचेही यादवडकर म्हणाले. (प्रतिनिधी)