शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खड्डे, खोदकामांमुळे वाहनचालक त्रस्त, महापालिकेचा ढिसाळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 01:42 IST

पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली कामे अद्याप सुरूच आहेत. विशेष म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केलेली रस्ते खोदाई अद्यापही सुरू आहे

पिंपळे गुरव : पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली कामे अद्याप सुरूच आहेत. विशेष म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केलेली रस्ते खोदाई अद्यापही सुरू आहे. पिंपळे गुरवमधील महत्त्वाच्या सर्वच रस्त्यांवर खोदाई सुरू आहे, यामुळे वाहनचालक व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अमरसिंह आदियाल म्हणाले की, खोदाईमुळे आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यामुळे महापालिकेने अगोदर खोदाई झालेली कामे पूर्ण करावीत आणि नंतर अन्यत्र खोदाई करावी.राजेंद्र जगताप म्हणाले, प्रत्येक काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र, सध्या सर्वच ठिकाणी खोदाई केल्यामुळे नागरिकांच्या समस्यांत भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांना नेमकी तक्रार कुणाकडे करायची? तक्रारींचा निपटारा करणे गरजेचे असते. प्रशासनाने खोदाई झालेली कामे प्रथम पूर्ण करावीत. नंतर बाकी ठिकाणी खोदाई करावी. रस्त्यांवर पडलेले खड्डे दिसत नाहीत काय?

श्याम जगताप यांनी सांगितले, पावसाळ्यापूर्वी खोदाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. तरीही सांगवी, पिंपळे गुरव परिसरात अद्याप कामे सुरूच आहेत. खड्डयांनी तर कहरच केला आहे. खोदाई आणि खड्डे यामुळे वाहनचालक व नागरिक त्रासले आहेत. विद्यमान नगरसेवकांचे प्रभागात चाललेल्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे परिसरातील बहुतांश रस्ते चिखलमय झाले आहेत. शिवाजी पाडुळे यांनी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती, त्या वेळी अशी गैरसोय कधीच झाली नव्हती. खड्ड्यांमुळे शहरात सातत्याने अपघातात वाढ झालेली आहे.दुरुस्तीच्या नावाखाली खोदाईनवी सांगवीतील एम़ एस़ काटे चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौक, काटेपुरम चौक ते महापालिका शाळा, तुळजाभवानी मंदिर ते सृष्टी चौक या महत्त्वाच्या रस्त्यांवर चेंबर दुरुस्तीच्या नावाखाली खोदाई सुरू आहे़ शिवाय अंतर्गत रस्त्यांवरदेखील अनेक ठिकाणी ही कामे सुरू आहेत. त्यामुळे पिंपळे गुरवमधील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. काम पूर्ण झाल्याशिवाय अन्य ठिकाणी खोदाई करू नये, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा त्रस्त नागरिक, वाहनचालक, विद्यार्थ्यांमधून बोलून दाखवली जात आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक