शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शासनाकडून डीपीची पुन्हा चालढकल?

By admin | Updated: April 14, 2015 01:32 IST

शासनाकडून चालढकल केली जात असल्याचा आणखी एक प्रकार विकास आराखड्याच्या (डीपी) मुख्य सभेत सोमवारी समोर आला.

पुणे : शहरात भाजपाचा एक आमदार आणि आठ खासदार असतानाही, महापालिकेच्या पत्रांना उत्तर देण्यात राज्य शासनाकडून चालढकल केली जात असल्याचा आणखी एक प्रकार विकास आराखड्याच्या (डीपी) मुख्य सभेत सोमवारी समोर आला. राज्य शासनाने डीपी ताब्यात घेतल्यानंतर महापालिकेने प्रशासनास शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचे आदेश दिले होते. त्यावर महापालिकेच्या विधी सल्लागारांनी दिलेल्या अभिप्रायानुसार, शासन आणि महापालिकेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने उच्च अधिकार समिती नेमली आहे का? याची विचारणा करण्यासाठी आठवडाभरापूर्वी महापालिकेने शासनाकडे विचारणा केली आहे. मात्र, त्याबाबत कोणतेही उत्तर शासनाकडून पालिकेस देण्यात आलेले नाही. त्यामुळे आधी डीपी ताब्यात घेतल्याची माहिती तब्बल ९ दिवस उशिरा कळविणाऱ्या शासनाकडून आता महापालिकेस उच्चाधिकार समितीबाबत माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे.डीपी राज्य शासनाने ताब्यात घेतला असला; तरी अद्याप त्यावर निर्णय घेण्यासाठी बोलाविण्यात आलेली सभा सुरूच आहे. आज सभा सुरू होताच सभागृह नेते सुभाष जगताप यांनी मुख्य सभेने प्रशासनास न्यायालयात जाण्याबाबत केलेल्या ठरावाचे काय झाले, अशी विचारणा केली. त्यानुसार, महापौरांनी याबाबत खुलासा करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या. मात्र, शासनाने डीपी ताब्यात घेतल्याने तसेच या बाबत उच्च न्यायालयातही दावा दाखल झाल्याने ही सभाच बेकायदेशीर असून, हे प्रकरण न्यायालयात असल्याने चर्चा करता येणार नसल्याची भूमिका घेत विधी विभागाने खुलासा करण्याची मागणी करीत गोंधळ घातला. या वेळी विधी विभागाच्या वतीने विधी सल्लागार मंजूषा इधाटे यांनी या प्रकरणी एक याचिका न्यायालयात दाखल केली असून, त्यात महापालिकेस वादी बनविण्यात आले आहे. तसेच त्याची नोटीसही पालिकेस काढण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे डीपीवर चर्चा न करता केवळ प्रशासनाने काय केले याचा खुलासा करणे शक्य असल्याचे स्पष्ट केले.डीपीबाबत सहा महिन्यांत अंतिम निर्णय - वृत्त/३४महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी खुलासा केला. मुख्य सभेच्या न्यायालयात जाण्याच्या ठरावानुसार, राज्य सरकारविरोधात पालिकेला न्यायालयात जाता येईल का, याबाबत निवृत्त न्यायमूर्ती दिलीप कर्णिक यांच्याकडून अभिप्राय मागविला होता. त्यामध्ये, थेट न्यायालयात जाता येणार नाही; मात्र महापालिका आणि राज्य शासन ही दोन्ही शासनाचीच अंगे असल्याने या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उच्चाधिकार समिती (हाय पॉवर कमिटी) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. डीपीबाबत दाद मागण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे का? याची विचारणा करणारे पत्र पालिकेने प्रधान सचिवांना पाठविले आहे.