शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 06:42 IST

राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय महसूल व वनविभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांच्या आदेशाने जारी केला आहे.

पुणे : संगणकीकरण व मनुष्यबळाचा खर्च वाढल्याचे कारण देत राज्याच्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने दस्तांच्या पानांच्या हाताळणी शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही शुल्क वाढ २० रुपये प्रतिपानावरून ४० रुपये प्रतिपान करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. 

राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय महसूल व वनविभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांच्या आदेशाने जारी केला आहे. मात्र, दस्त हाताळणी शुल्कात वाढ करायची असेल तर नोंदणी शुल्क कशासाठी आकारण्यात येते, असा सवाल असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडरने उपस्थित केला आहे. 

सध्या राज्यभरात प्रत्येक महिन्यात सरासरी साडेतीन लाख दस्तांची नोंदणी होते. त्यानुसार दरमहा सुमारे सव्वाचार हजार कोटींचा महसूल गोळा होतो. ही शुल्क वाढ ४० रुपये प्रतिपान केल्याने महसुलातही वाढ होणार आहे. परंतु त्याची अचूक आकडेवारी देता येणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

वाढ करण्याची दोन कारणे?

नोंदणी मुद्रांक विभागाचे अनेक उपक्रमांत संगणकीकरणाचे प्रमाण वाढले. विविध कामांसाठी ३५ प्रणाली कार्यान्वित आहेत. सॉफ्टवेअर विकास व देखभालीचा खर्च वाढत आहे. नेटवर्कवरील खर्च वाढला. 

जिल्हा, विभागीय, राज्यस्तरावर यंत्रणा आहे. त्यात सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्क आणि सर्व्हरविषयक कुशल तांत्रिक मनुष्यबळ नियुक्त केले आहे. त्या मनुष्यबळावरील खर्चामुळे संगणकीकरणाच्या खर्चात पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMONEYपैसाState Governmentराज्य सरकार